१३ मार्च, २०१२

नाते मैत्रीचे पालकांचे मुलांचे

सं वाद तेथेच शक्यव असतो, जेथे निखळ, पारदर्शी, विश्वा्सपूर्ण मैत्रीचे नाते असते. मुलांबरोबर खऱ्या अर्थाने संवाद साधायचा असेल; तर पालकांनी व शिक्षकांनी प्रथम मुलांबरोबर मैत्रीचे नाते जोपासायला हवे. यासाठी कुटुंबाचा आपसातील सुसंवाद आवश्य क आहे; तसेच मुलांचे वय व त्या वयातील मानसिक व शारीरिक वाढीच्या आवश्यचकतेनुसार तो अधिक निकोप व सुदृढ व्हायला हवा.

आज बऱ्याच घरांमध्ये जेथे उत्साही आजी-आजोबा असतात, तेथे घरात व घराच्या बाहेरसुद्धा मुलांची वृत्ती, वागणूक अधिक मनमोकळी व आनंददायी असते. यातील वेगळेपण बघितले, तर आईबाबांसारखेच आजी-आजोबासुद्धा प्रेमाने हवे-नको बघत असतात, इतरही काळजी घेत असतात. त्याहीपेक्षा स्वतःचे वय विसरून मुलांबरोबर लहान मूल होऊन निखळ मैत्रीच्या नात्याने संवाद साधतात. मुलांनी उत्साहाने, उत्सुकतेने सांगितलेल्या शाळा, अभ्यास, खेळ, मित्रमैत्रिणी, यश-अपयश याविषयीच्या गप्पा ऐकतात. त्याचबरोबर मुलांचे भावविश्वे, असंख्य प्रश्न्, कुतूहल, त्यांचे भन्नाट स्वप्नविश्व , आकलनशक्ती, अफाट कल्पनाशक्ती, निर्णयक्षमता, छोट्या-मोठ्या सर्व गोष्टींबद्दलचे मुलांचे निकष, भावभावना, स्वतःविषयी व घरातील सदस्यांविषयीचे विचार, अपेक्षा या सर्व गोष्टींमध्ये त्यांना रस असतो. आपली सर्व कामे बाजूला ठेवून केवळ मुलांसाठी ते हवा तेवढा वेळ देतात. त्यामुळेच मुलांनासुद्धा ते अधिक सुरक्षित, हक्काचे, प्रेमाचे, विश्वातसाचे ठिकाण वाटते.

मुलांना समजून घेण्यासाठी त्यांना वेळ देणे, प्रसंगी त्यांच्या विश्वाीत आपणही रममाण होणे आवश्यनक आहे. केवळ चुका दाखविणे, उपदेश करणे, स्वतःच्याच मतांचा आग्रह धरणे, असे न करता थोड्या वेगळ्या स्वरूपात (उदा. "हेच काम किंवा अभ्यास तू जर थोड्या वेगळ्या सोप्या पद्धतीने केलास तर तू ते अधिक चांगले करशील, असा मला विश्वा्स आहे) सांगायला हवे. यामुळे एका कार्यसिद्धीसाठी अनेक सोप्या वाटा, उपाय सहजतेने उलगडत गेल्याने चौफेर, व्यापक विचार करण्याची व त्यानुसार प्रत्येक काम अधिकाधिक नेटके व यशस्वी करण्याची अभ्यासूवृत्ती जोपासली जाते व पुढील आयुष्याच्या वाटचालीत कुठल्याही प्रसंगात आत्मविश्वाचस वाढवणारी ठरते.

आजी-आजोबांकडून मुलांची कधीही कोणाबरोबर तुलना होत नाही. "तुझे- माझे' "आपले-परके' हा भेदभाव नसतो. तेथे फक्त प्रकर्षाने सहकार्याची, बरोबरीची व आपुलकीची भावना असते. आईबाबांनीसुद्धा आपल्या कार्यबाहुल्यातून रोज थोडा वेळ तरी मुलांसाठी जरूर द्यायला हवा. त्यासाठी त्यांनी आपले करिअर, पैसा, संधी व आव्हाने यामध्ये थोडी तडजोड करून मुलांचे उमलते भावविश्व , स्वप्न, अपेक्षा जाणून घेऊन मदतीच्या भावनेने नियमित व गुणात्मक संवाद साधायला हवा. घरातूनच ही सवय असेल तर घराबाहेरही मुले इतरांबरोबर मैत्री करू शकतील. वाहतुकीचे नियम पाळणे, खोटे न बोलणे, दिलेली वेळ व दिलेले काम यासाठी अधिक काटेकोर राहणे, स्वच्छता, वैयक्तिक कामांची जबाबदारी व त्याची सवय स्वतःला असणे, हे कुटुंबातील प्रत्येकाने लक्षात ठेवले तर साहजिकच असे योग्य संदेश घरातूनच मिळाल्याने मुले अधिक सक्षम होत जातात. आपल्या आनंदात; तसेच अडचणींमध्ये, यश-अपयश, संकटातही आपले पालक, कुटुंब सदैव आपल्याबरोबर आहे, ही आधाराची-स्थैर्याची भावना त्यांचे आयुष्य अधिक निकोप, सकारात्मक व प्रगल्भ बनविते.

अनामिक

पालकत्व - पूर्वीचे आणि आत्ताचे

नमस्कार,

सुजाण पालक हो आज बरेच दिवसांनी ब्लॉग वर लिहायला वेल झाला ,आणि एक छानसा लेख आपल्यासाठी




काळ बदलला, त्यानुसार पालकत्वाची संकल्पनाही बदलली आहे. या बदलांना अनुसरून आता पालकांनी मुलांसोबत संवाद साधायला हवा.

"आजकालची पिढी ना खूप बिघडत चालली आहे. आगाऊपणा आणि उद्धटपणा खूप वाढला आहे. कुणाचा धाक म्हणून नाहीये या मुलांना. खूप काळजी करण्यासारखे चित्र आहे.'' अशा प्रकारचे संवाद अनेक ठिकाणी आजकाल ऐकायला मिळतात. घरात, शाळेत सीनियर सिटिझन्सच्या कट्ट्यावर, पालकांच्या मिटींगमध्ये अगदी लग्न समारंभात सुद्धा असे संवाद ऐकायला मिळतात. खरा विचार केला, तर मुले बिघडली आहेत का? असा प्रश्नस पडतो, काळ बदलला आहे, पिढी बदलली आहे हे आजकाल स्वीकारलेच जात नाही. अजूनही "आम्ही 30-40 वर्षापूर्वी कसे होतो?' यातच मन रमत आहे. "आम्ही कसे आई-वडिलांच्या धाकात होतो, एवढे आगाऊ नव्हतो' याच विचारात आजकालचे पालक आहेत आणि त्याचप्रमाणे मुलांच्याकडून अपेक्षा करत आहेत, असे वाटते.

पूर्वीचे पालकत्व म्हणजे घरामध्ये कमीत कमी चार मुलांचा ट्रेंड होता. कुटुंब नियोजनाची पद्धत उपलब्ध नव्हती किंवा मुले ही देवाची देणगी आहे, असे समजून होतील तेवढी मुले होऊ द्यायची असा शिरस्ता होता. मग मुले वाढवण्यासाठी पुरेसे आर्थिक बळ, शारीरिक बळ आहे की नाही याचा विचार केला जात नसे. शिवाय एकत्र कुटुंब पद्धती रूढ होती. त्यामुळे बरीच भावंडे, त्यांची सर्वांची मुले एकत्र नांदायची. त्यामुळे मुले आपोआप वाढतात यावर ठाम विश्वावस होता. मुलांना दुखले, खुपले, काही समस्या आल्या, शाळेमध्ये काही समस्या आल्या, तर हे गृहीत धरले जायचे की हे आपापलेच बघायचे. घरामध्ये क्व चित कोणते प्रॉब्लेम्स्‌ घेऊन मुले पालकांपाशी यायची. त्यामुळे घरात पालकांशी संवाद किंवा मुले पालकांशी मोकळेपणाने बोलायला धजावायची नाहीत. वडील कडक किंवा एकतर्फी संवाद करणारे आणि आईची भूमिकाही मुलांना खाऊ-पिऊ घालणे, आजारी असेल तर सेवा-शुश्रूषा करणे एवढीच असायची. कित्येकदा घरामध्ये मुलगा किंवा मुलगी कोणत्या इयत्तेत आहे हेही ठाऊक नसायचे. मुलेसुद्धा शाळा ते घर, घर ते शाळा एवढ्याच परिघात असायची. अगदीच शाळेत काही कार्यक्रम किंवा शाळेच्यावतीने काही क्रीडा, स्पर्धा वगैरे असतील, तर त्यामध्ये मुले भाग घ्यायची. बाकी शाळेतून आल्यावर गल्लीबोळात खेळ खेळायचे हे ठरलेले असायचे. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात काय चालले आहे हे बघण्याची पालकांना आवश्यअकता वाटत नसे. मुलांना सहाव्या वर्षी बालवाडीत प्रवेश घ्यायचा आणि फक्त पहिले आठ दिवस मुलांना शाळेत सोडायचे की पुढे मुले आपोआप शाळेत ऍडजेस्ट होतात असा पालकांचा समज असे.

पूर्वी वयात येण्याचा काळसुद्धा उशिराच असे. म्हणजे मुली बाराव्या-तेराव्या वर्षी आणि मुले चौदा वर्षाच्या पुढे वयात येत असत. तेव्हाही पालकांना या गोष्टीची माहिती व्हायचीच असे नाही. मुलींच्याबाबतीत मात्र पालक दक्ष असायचे. वयात आलेल्या मुली मैत्रींणीबरोबर गुजगोष्टी करायच्या. लाजाळूपणा, नम्रपणा, मोठ्यांशी आदरानेच वागणे, लग्नाच्या आणि सासरी जाण्याच्या तयारीने घरातील कामे शिकून घेणे, घरातल्या पुरुषांशी किंवा एकंदर मुलांशी, पुरुषांशी मर्यादेने वागणे हे सर्व गृहीत धरले जायचे. प्रेमप्रकरण वगैरे तर दूरच; पण मुलगी एखाद्या मुलाशी चुकून बोलली, तरी तिला मारणे, कोंडून ठेवणे, घर की इज्जत वगैरे दाखवून देणे असे प्रकार पालकांकडून केले जात.

मुलांच्या बाबतीत घराबाहेर मित्रांबरोबर हिंडणे, चोरून सिनेमाला जाणे, मुलींना चिडविणे, छेड काढणे, शाळेत मारामाऱ्या करणे आणि पालकांकडून क्विचित मार मिळणे ही सर्व वयात येणाऱ्या मुलांची वैशिष्ट्य होती; पण कौतुकच जास्ती असायचे. वंशाचा दिवा म्हणून मुलांना मान मिळायचा, घरातील कोणतेही काम त्यांना सांगितले जात नसे. मुलांना जास्त खाऊ-पिऊ घालणे, मुलींना त्या मानाने अन्न कमी देणे असे प्रकारसुद्धा पालकांच्याकडून घडत असत.

पूर्वी पालक मुलींच्या शिक्षणाबाबतीत अनुत्सुक असायचे. मुलींनी शिकून काय करायचे? चूल आणि मूल हेच अपेक्षित असल्यामुळे मुलींच्या शिक्षणावर भर कमी दिला जात असे; मग तिला घरकाम, विणकाम, स्वयपांक या सर्व गोष्टी करण्याची सक्ती होती. मुलीने संसार नेटका करावा या दृष्टीने सर्व काही शिकवले जात असे. मुलींनाही या गोष्टींचा ऍक्सेदप्टन्स होता आणि त्याप्रमाणे सोळाव्या - सतराव्या वर्षी त्या लग्न करायला सज्ज असत.

मुलांच्या बाबतीत शिक्षणाला बऱ्यापैकी महत्त्व होते आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन त्यांनी सरकारी नोकरी किंवा बॅंकेत, पोस्ट खात्यात नोकरी करावी यासाठी प्रयत्न असायचे. "एकदा मुलाला चांगली नोकरी मिळाली की आयुष्याचे कल्याण' अशी पालकांची समजूत असे. त्यामुळे शाळेत नापास झाले ,तर पालक बदडून काढण्यासाठी मागेपुढे पाहात नसत.

जसजसे स्त्रियांनी शिक्षण घेण्याचा प्रघात आला, तेव्हा हळूहळू पालकत्व आणि पाल्य यांच्यामध्ये लक्षात येण्याइतपत फरक जाणवू लागला. शिक्षण, नवे तंत्रज्ञान, बऱ्याच गोष्टींची नव्याने ओळख (उदा. मोबाईल, इंटरनेट इ.) जागतिकीकरण, आधुनिकीकरण या सर्वांमुळे आजकालच्या मुलांची बऱ्याच गोष्टींशी ओळख झाली. मुख्य म्हणजे कुटुंब नियोजनाच्या अनेक पद्धती आल्यामुळे विभक्त कुटुंब पद्धती जन्माला आली आणि त्यातूनच "हम दो हमारे दो' असा प्रघात पडला.

आजकाल पालकांना एक किंवा दोन मुले असल्यामुळे आणि एकंदरीतच मुलांचे संगोपन याबाबतीत सर्व पातळीवर जागृती निर्माण झाल्यामुळे पालकांना मुलांकडे लक्ष देणे भाग पडत आहे. आजचे पालकत्व जास्त जबाबदारीचे आणि जोखमीचे झाले आहे. आजकाल मूल जन्माला येण्याआधीच नियोजनाला सुरवात झालेली असते. अगदी गंमतीने असेही म्हटले जाते की, मूल जन्माला येणार असे कळल्यावरच शाळेच्या ऍडमिशन घेण्यासाठी पालकांना धावाधाव करावी लागते. अगदी गर्भसंस्कारापासून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक व्याख्याने, कार्यशाळा आयोजित केल्या जातात. त्यामुळे साहजिकच आपले मूल सर्व गुण संपन्न व्हावे या अपेक्षेने पालक या सर्व मार्गांचा अवलंब करतात.

पालकांचे समुपदेशन करताना असेही लक्षात आले आहे की, एकंदर आजकालचे पालक धास्तावलेले आणि आत्मविश्वाेस कमी असलेले जाणवतात. मुलांना हाताळण्यात, त्यांचे प्रॉब्लेम्स समजून घेण्यात आपण कुठेतरी चुकतो आहोत किंवा कमी पडत आहोत अशीच भावना रुजलेली दिसते. पालकांच्यात अपराधीपणाची भावना, तसेच हताशपणा, मुलांच्या भविष्याबाबतीत केलेल्या महाभयंकर कल्पना (उदा. ः त्याने, तिने अभ्यास केला नाही तर तो /ती वाया जाईल, त्याचे/तिचे करिअरच घडणार नाही / अशा टोकाला लगेच पोचतात) यामुळे पालक त्रस्त असतात. दुसऱ्या बाजूने पालकांचा विचार केला तर पालक आधुनिकीकरणाचा स्वीकार करतानाही दिसतात. जसे मुलांना मोबाईल देणे, घरामध्ये कॉम्प्युटर असणे, शिक्षणाच्या बाबतीत ठाम असणे आणि त्यासाठी कितीही कष्ट करण्याची तयारी असणे हे सर्वही कौतुकास्पदरित्या बदलेले आहे.

आजकाल वयात येणाऱ्या, म्हणजे टिनएनर्ज मुलांबद्दल समाजामध्ये बऱ्यापैकी नकारात्मकता निर्माण झाली आहे. एकंदरीत पालक, ज्येष्ठ मंडळी, शाळेतील शिक्षक वर्ग, सर्वच वर्गात एक प्रकारची नाराजी दिसून येते. वयात येतानाचे वयही आता खूप अलीकडे आलेले आहे. तज्ज्ञांच्या मताप्रमाणे आजच्या पिढीला अनेक गोष्टींचे एक्पोयजर मिळाल्यामुळे मेंदू लवकर प्रगल्भ होऊन, मुले लवकर पौंगडावस्थेमध्ये प्रवेश करताना दिसतात. आठव्या, नवव्या वर्षीच पौगंडावस्थेतील लक्षणे दिसायला लागतात. अचानक झालेल्या संप्रेरकांच्या बदलांमुळे (कीोपरश्र उहरपसशी) मुलामुलींमध्ये शारीरिक बदल तर होतातच; पण त्याचबरोबर मानसिक, भावनिक, सामाजिक, वैचारिक, बौद्धिक, सांस्कृतिक, सर्जनशील, कलात्मक, क्रिडात्मक असे अनेक पातळ्यांवर बदल होतात आणि हे बदल साधारण नवव्या वर्षीपासूनच सुरू होतात आणि साधारण विसाव्या वर्षीपर्यंत चालूच असतात; पण हे वय धड लहान नाही, धड मोठे नाही. त्यामुळे पालक आणि मुले दोघेही संभ्रमात असतात आणि त्यामुळे या पालकांचे वयातील मुलांशी एक प्रकारचे कटुतेचे नाते निर्माण होते आणि याचे मुख्य कारण म्हणजे पाल्यामध्ये होणारे बदल स्वीकारण्याची पालकांची मनापासून तयारी नसते. मुलींच्या बाबतीत हा स्वीकार होतो की मुलगी वयात येते आहे; पण तिची वर्तणूक अजिबात मान्य नसते त्यामुळे पूर्वीच्याच समजाप्रमाणे मुलीला लैंगितेच्या विळख्यातून सोडवले पाहिजे या वयात जपले पाहिजे असाच कल पालकांचा दिसतो.

आजच्या पिढीला सर्व तांत्रिक सोयीसुविधा मिळतात, बंधने कमी झाली आहेत, भरपूर स्वातंत्र्यही दिले जाते. याबद्दल "आम्हाला हे सर्व काहीही मिळत नव्हेत आणि या मुलांना मिळते आहे त्याचा ते गैरवापर करत आहेत' असा आरोप या मुलांवर सहजपणे होतो. खरे पाहायला गेलो, तर यामध्ये या मुलांचा काय दोष आहे? किंवा त्यांच्यात जे बदल होतात आणि त्यातून त्यांची वागणूक होते ती जाणून बुजूनच केली जाते असाही पालकांचा गैरसमज होतो. या बदलांशी जुळवून घेणे आणि त्याप्रमाणे स्वतःची प्रतिमा सांभाळणे ही या मुलांच्या दृष्टिकोनातून तारेवरची कसरत असते. त्यामुळे पौगंडावस्थेतील मुलांचे पालकत्व हे आणखी अवघड होऊन बसले आहे. पालकत्वाचा बाऊ होऊन बसला आहे.

मुलांची नैसर्गिक वाढ मान्य करून पाल्याला नैसर्गिकरीत्या वाढू देणे आणि पालक म्हणून स्वतःवर विश्वािस ठेवून चुकत शिकतच पालकत्व निभावण्यात आनंद आहे, हे आजचा पालकवर्ग हे विसरून गेला आहे. पूर्वीचे आणि आजचे पालकत्व यात निश्चिपतच मोठा बदल झालेला आहे; पण आजकालचे पालक पूर्वीच्या पालकत्वाची तुलना करून मुलांना त्याची जेव्हा जाणीव देतात तेव्हा मुले संभ्रमात पडतात की, त्याचा संदर्भ देणे खरच उचित आहे का? पूर्वीच्या पालकत्वाचे काही फायदे जरूर करून घेणे आवश्यलक आहे; पण त्याचबरोबर पिढीनुसार झालेले बदलही स्वीकारणे तितकेच गरजेचे आहे. आज पालकत्व निभावण्यासाठी काय करणे गरजेचे आहे हे समुपदेशनाद्वारे समजून घेणे गरजेचे आहे.

शुभांगी खासनीस, प्रसन्न रबडे