tag:blogger.com,1999:blog-32231664460585443292024-03-08T17:04:10.334+05:30POSITIVE PARENTING अर्थात सुजाण पालकत्वआपल्यायला काय वाटत!आपली मुले चांगली व्हावी,यशस्वी व्हावीत असे प्रत्येक पालकाला वाटत,पण आपण एक सुजाण पालक म्हणून त्यासाठी काय करतो? आज वयाची ३ वर्ष पूर्ण नाही झाली तर आपण नर्सरी /पाळणाघरात टाकून मोकळे.आपण आपला किती आणि कसा वेळ देतो आपल्या मुलांसाठी ह्याचा कधी विचार केला का?
पोटच्या मुलांना प्रेम देण्याइतका वेळ जर आज पालकांकडे नसेल तर !!
"पालक असणं वेगळ आणि सुजाण पालक होणे वेगळ"
आजच्या काळात पालक होणे हे एक घडणे आहेAnonymoushttp://www.blogger.com/profile/07785008605705105955noreply@blogger.comBlogger23125tag:blogger.com,1999:blog-3223166446058544329.post-57489429687594274122014-08-15T01:00:00.000+05:302015-12-21T15:26:18.447+05:30मुले खोटे का बोलतात ? – मंगला गोडबोले<b><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br /></div>
मुलांना वाढवताना काही प्रसंग मोठे बाके यायचे. म्हणजे उदाहरणार्थ, नेमकी मी घरात नसताना आणि नेमकी दोन्ही कार्टी घरात असताना घरातली सर्वांत सुंदर फुलदाणी फुटणे वगैरे. कोणी फोडली विचारले की, दोघेही कानावर हात ठेवायची. दोघांपैकी कोणीही तिला धक्का, हात किंवा बोटही लावलेले नसायचे; फार काय तिच्याकडे कटाक्षही टाकलेला नसायचा. पुराव्यादाखल एक मूल देवाची शपथ घ्यायचे, दुसरे माझी शपथ घ्यायचे. म्हणजे मामला आटोपलाच. घरामध्ये या दोघांखेरीज तिसरे भूत आढळलेले नसल्याने भुताटकीची शक्यताही नाकारावी लागायची. मग खात्रीचा निष्कर्ष काय काढायचा?
मुले खोटे बोलताहेत एवढाच!
मुले अधूनमधून खोटे बोलायचीच. अजूनही बोलतात. बदल असेल तर तो खोटे बोलण्याच्या हेतूमध्ये आहे एवढेच. लहानपणी ती मार चुकवायला खोटे बोलत असतील, तर आता कुमारवयात एखादा आळ चुकवायला खोटे बोलतात. तेव्हा एखादवेळेस स्वत:चा निष्पापपणा सिद्ध करायला खोटे बोलत असतील तर आता आपले खाजगीपण किंवा प्रायव्हसी सिद्ध करायला खोटे बोलून जातील. म्हणजे दर वळणावर कमीअधिक खोटे आहेच.
खरे बोलायचे तर मुलांनी अधूनमधून खोटे बोलणे अटळच आहे. बिचा:यांवर नाना अडचणी येत असतात. नेमके क्लासच्या वेळात टी.व्ही.वाले चांगला सिनेमा दाखवायला निघाले की, क्लास बुडवताना खोट्याचा आधार लागतो. शाळेत आपल्या हातून प्रयोग करताना टेस्ट-ट्यूब फुटली आहे हे घरी कळू द्यायचे नसते. खडूस मास्तरांच्या शिक्षेच्या संकटातून मित्राला वाचवायचे असते. (मित्राऐवजी मैत्रीण संकटात आली तर ही जबाबदारी अनेक पटींनी वाढते.) काही वेळा मित्रमैत्रिणींवर ‘इम्प्रे’ टाकण्यासाठी कल्पनाविलासात्मक खोटे बोलावे लागते. कपिलदेव किंवा माधुरी दीक्षित आपल्याला ‘हॅलो’ म्हणाले असे अनेक मुले एकदा ना एकदा सांगतात. काहींना हळूहळू स्वत:लाही ते खरे वाटायला लागते. तेवढाच त्यांचा वेळ बरा जातो. अशा निरुपद्रवी खोट्यांपासूनच बहुतेक मुलेमुली थापेबाजीला सुरुवात करतात. शिवाय घरातल्या थापविलासाचे दर्शनही होत असतेच. टी.व्ही.वरची टेस्ट मॅच बघण्यासाठी ऑफिसला दांडी मारून घरी राहिलेले बाबा ऑफिसमध्ये खोटी सिकनोट पाठवतात. आपला ‘स्पेअर बर्शेन सिलिंडर’ मैत्रिणीला द्यावा लागू नये म्हणून आई अभिनयाची पराकाष्ठा करत मैत्रिणीला म्हणते, ”तुला दिलाच असता गंऽ पण आज आमच्याकडे पार्टी आहे ना…” मुलांवरती या सगळ्यांचा कळत-नकळत परिणाम होतच असणार.
पण गंभीर परिणाम होतो तो आई-वडिलांवर. मुलांच्या खोटारडेपणाने आई-वडील खोलवर दुखावतात. ‘बिचा:या आपल्या मुलांचा नैतिक अध:पात होईल’ यासाठीचे हे दु:ख अर्थातच नसते. दु:ख असते अविश्वासाचे, फसवणुकीचे, आपली सत्ता नाकारल्याचे. पहिल्या मुलाचे पहिले खोटे अनेक पालकांना जड जाते ते यामुळेच. पुढे सवय होते किंवा करून घ्यावी लागते. खोट्यांचे विश्वरूपदर्शन रोज उठून घडायला लागते. सगळी खोटी ही स्पष्टपणे खोटी नसतात. त्यांच्या नाना छटा असतात. साधारणपणे तिसरी-चौथीपासूनच, बाहेरच्या किती गोष्ट घरात सांगाव्यात व किती सांगू नयेत याची आपापली गणिते मुले बसवायला लागतात. असे ‘निवडक सत्य’ (Partialtruth) हेही एका परीने खोटेच की. फसवणे…लपवणे…वाढवून सांगणे यात कमीजास्त मार्क कसे देणार? प्रश्न मोठा बिकट असतो.
”सत्य सदा बोलावे, सांगे गुरू आणि आपुला बाप! असत्य भाषण करणे, सज्जन म्हणतात हे महापाप॥” असे ऐकत, म्हणत मोठ्या झालेल्या पालकपिढीला तर तो फारच बिकट वाटायला लागतो. ‘खोटे कधी बोलू नये,’ ‘बरे सत्य बोला…’, ‘सत्यमेव जयते…’ हे सगळे काय उगाचच शिकवले जात होते? मला असे अजिबात वाटत नाही.उलट वाटते, तसे शिकवले हे बरेच झाले. निदान सत्याच्या बाबत तरी, ”आम्हीही सुंदर झालो असतो…” असे म्हणण्याची वेळ आजच्या पालकपिढीवर त्यांच्या अगोदरच्यांनी येऊ दिली नाही. त्यांनी शिकवायचे ते शिकवले, यांनी घ्यायचे ते घेतले. त्यांनी आदर्श पुढे ठेवला, यांनी त्यात वास्तवाचे पाणी घालून तो हवा तेवढा पातळ करून घेतला. सत्यही राहिले, त्यामध्ये प्रत्येकाची आवड, ऐपत, सोय हेही गरजेप्रमाणे मिसळून गेले.
पुढची पिढी ही सर्वच बाबतींमध्ये पुढची. त्यामुळे स्वत:ला हवे ते करणारच आहे. वाढते स्वातंत्र्य, वाढती प्रलोभने यांमध्ये सत्याची पीछेहाट होणारच आहे. पालकांनी ती कशी स्वीकारावी हे कळणे ही काळाची गरज आहे.अनुभवावरून आणि वाचन-विचारांवरून मला असे वाटते, मुलांच्या कोणत्याही खोट्यावर एकदम आणि तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करणे पालकांनी टाळायला हवे. खोटे बोलण्यामागचे कारण काय आहे हे प्रसौम्यच घ्यायला हवी. म्हणजे समजा, प्राथमिक शाळेतल्या मुलाला कपिलदेवने ‘हॅलो’ म्हटले असेल तर ते तसे म्हणू द्यावे. ‘हॅलो’ म्हणायला हरकत घेणारे आपण कोण? तसेच गमतीने रुपयाचे नाणे गिळायला जाणारे प्रत्येक मूल काही मोठेपणी एक्साइज इन्स्पेक्टर होत नाही हेही समजून घ्यावे. ही गंमत गमतीच्याच पातळीवर राहते आहे हे बघितले म्हणजे पुरे. थापेसाठी थाप, मजेसाठी खोटे बोलणे इतपत निरुपद्रवी असत्य फारच तात्कालिक असते, त्याला तितक्याच गांभीर्याने वागवावे. शिक्षेच्या भीतीने, स्वत:ला किंवा दुस:याला वाचवण्यासाठी बोललेले खोटे जरा तपशिलाने बघावे. शिक्षेची वेळच मुळात का यावी? वाचवण्यासाठी आटापिटा का करावा लागला याचा विचार व्हावा, याबद्दल मुलांशी सल्लामसलत व्हावी, ही वेळ वरचेवर येऊ नये म्हणून मार्गदर्शनही द्यावे. केवळ कौतुक करून घेण्यासाठी मूल खोटे बोलत असेल तर त्याची कौतुकाबाबत फार उपासमार तर होत नाही ना हेही बघितले जावे. कौतुकाची गरज काही मुलांना जास्त वाटते, जसे, स्वातंत्र्य किंवा प्रायव्हसीचे आकर्षण काही मुलांना इतरांपेक्षा लवकर वाटायला लागते. त्यांना त्या हौशी भागवण्यासाठी खोटे बोलायला लागणार नाही, यासाठी पालकांनी जागरूक राहावे. काम किंवा कर्तव्य टाळण्यासाठी, हेतुत: फसविण्यासाठी, कोडग्या स्वार्थासाठी, हीन स्पर्धेसाठी खोटे बोलणे मात्र केव्हाही क्षम्य समजू नये, दुर्लक्षू नये.थम समजावून घ्यायला हवे. कारण जर फुटकळ किंवा सौम्य असेल तर प्रतिक्रियाही
अशा वेळा बहुधा किशोरवयानंतर जास्त येऊ लागतात. आता आता इवले वाटलेले मूल एकदम मोठे होते, बाहेरच्या विराट दुनियेत फेकले जाते. अशा वेळी त्याचा खोटेपणा वाढला तर पालकांनी एकदम सजग व्हायला हवे. हे मूल शिक्षणाव्यतिरिक्त काय करते, कुठे जाते, कोणात मिसळते, कोणती वाहने चालवते, टी.व्ही.-व्हिडीओवर काय बघते, ड्रग्ज वगैरे तर घेत नाही ना, हे सगळे बारकाईने बघायला हवे आणि कितीही अप्रिय वाटले तरी वेळच्या वेळी याला आळाही घालायला हवा. एक खोटे निस्तरायला दहा खोटी बोलण्यापर्यंत त्याची मजल जाऊ देऊ नये.
मुलांना खरे आणि केवळ खरेच बोलायला लावणे केव्हाही कठीणच होते. आज ते कधी नाही इतके दुर्घट होत चालले आहे. ‘खोटे कधी बोलू नये’ हे वाक्य प्रिय तर खरेच, पण त्या ‘कधी’ पुढे ‘च’ आणि वाक्यापुढे भलाभक्कम पूर्णविराम देण्यापेक्षा, खोटे कधी बोलू नये? हे प्रश्नचिन्हात्मक मार्गदर्शन मला जास्त मोलाचे वाटते ते यामुळेच. जिथे आपल्यावर विश्वास टाकला जातो, जिथे वैयक्तिक किंवा सामूहिक नीतीचा प्रश्न येतो, जिथे आपल्या खोट्याने दुस:यावर अन्याय होतो, दुस:याला दु:ख होते, तिथे खोटे नक्कीच बोलू नये, बोलल्यास त्याची गयही करू नये. बाकी किरकोळ एप्रिल फूल बाराही महिने केले तरी चालेल. असा कुठेतरी सत्याशी समझोता व्हायला हवा.
टीप : हा लेख लिहिताना Why Kids Lie या Paul Ekman यांच्या पुस्तकाचा मला विशेष उपयोग झालेला आहे. हे सगळे माझेच आहे असे खोटे कशाला बोला? मंगला गोडबोले<b></b></b>Anonymoushttp://www.blogger.com/profile/07785008605705105955noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3223166446058544329.post-27300125038131093282013-08-30T18:07:00.000+05:302013-08-30T18:07:33.552+05:30सुजाण पालकत्व<div style="background: white; line-height: 13.5pt; margin-bottom: .0001pt; margin: 0cm; text-align: justify;">
<span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">आपण पालक होतो हा एक प्रकारचा
बहुमानच आपल्याला मुल झाल्यामुळे मिळालेला असतो. म्हणजे अप्रत्यक्षपणे आपण त्या
मुलाचे आभार मानायला हवेत. त्याचामुलेच आपण आई किंवा बाबा झालेलो असतो. जसे </span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">“</span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">तुझ्यामुळे मी झाले आई </span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">बाळा होऊ कशी उतराई</span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">” </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">हे तर
ऐकूण काय मुलं आणि पालक या नात्यातील अंतर कमीतकमी असायला हवं. हे नाते संबंध
पाळताना काय-काय गोष्टी अपेक्षित आहेत ते पाहू .</span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";"><o:p></o:p></span></div>
<div style="background: white; line-height: 13.5pt; margin-bottom: .0001pt; margin: 0cm; text-align: justify;">
<span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;"><br /></span></div>
<div style="background: white; line-height: 13.5pt; margin-bottom: .0001pt; margin: 0cm; text-align: justify;">
<span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;"><br /></span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEigCoLcCIN1TJifbxdIXwNqAfTwIZdVrrVzHVnRyJBJRwa2cN778RpoinQdyzqH9YqvHGx2Pj-RYb9_ekHKrIjLTlRxSEU4hrmobAfjd96RLa1AmV1edmkB21fuMQa8DeC-M9ezH2_h4Jo/s1600/mother.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEigCoLcCIN1TJifbxdIXwNqAfTwIZdVrrVzHVnRyJBJRwa2cN778RpoinQdyzqH9YqvHGx2Pj-RYb9_ekHKrIjLTlRxSEU4hrmobAfjd96RLa1AmV1edmkB21fuMQa8DeC-M9ezH2_h4Jo/s320/mother.jpg" width="263" /></a></div>
<div style="background: white; line-height: 13.5pt; margin-bottom: .0001pt; margin: 0cm; text-align: justify;">
<span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;"><br /></span></div>
<div style="background: white; line-height: 13.5pt; margin-bottom: .0001pt; margin: 0cm; text-align: justify;">
<span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;"><br /></span></div>
<div style="background: white; line-height: 13.5pt; margin-bottom: .0001pt; margin: 0cm; text-align: justify;">
<span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">
</span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">मुलांचा सर्वप्रथम पहिला शिक्षक
</span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">“</span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">आई</span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">” </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">हाच असतो . किंवा पालक जो कोणी असतो तो . आई असल्याचा विलक्षण
अभिमान तिला असतो . नकळतच तिचं हे जग<span lang="MR" style="font-size: 12pt; line-height: 115%;">णे </span>प<span lang="MR" style="font-size: 12pt; line-height: 115%;">ण</span> आनंदमयी होऊन गेलेले असते. त्याच्या </span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">“</span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">आई</span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">” </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">ह्या
संबोधनाने पुकारण्याचा त्या कोवळ्या जीवावरून ती आपला जीव ओवाळून टाकत असते .
ह्याच उच्यारांसाठी तिचे कान आतुरलेले असतात.ती धन्य झालेली असते . भूक लागली कि
रडायचे हे काय आई किंवा पालक शिकवीत नाही . प्रेमाचा आणि मायेचा स्पर्श आपण
मुलांना देतो . तो ओळखायला ती अंतप्रेरणेने शिकतात . त्याच अंतप्रेरणेतून ती ईतरही
गोष्टी शिकतात . मुख्य म्हणजे पालकांनी आपल्या पाल्याचा आय क्यू ओळखून मुलांच्याकडून त्या प्रमाणात
अपेक्षा केली पाहिजे . मुलांच्या मेंदूची वाढच मुले ३ वर्ष होईपर्यंत झालेली नसते.हे ओळखून त्याच्या शरीरिक वाढीसाठी आणि मग मानसिक वाढीसाठी प्रयत्न करायला
पाहिजे. ३ वर्षापर्यंत तरी मुलं डोक्यावती पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे .
सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत सतत पाठपुरावा </span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">धाकदाखून शिकवू पाहणारे पालक </span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">आणि प्रथम आपण कृती करून त्यातून चांगल्या गोष्टी उचलणारे मुलं
ह्या दोन्ही परस्पर्विरोधी गोष्टी आहेत . परंतु मुले आपल्या कृतीतूनच घडत असतात .
उत्तम मुल </span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">,
</span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">उत्तम विद्यार्थी </span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">किंवा उत्तम नागरिक म्हणून कलागुण त्याचे जोपासायचे असतील तर
आपल्या चांगल्या गोष्टीचे अनुकरण ती करत असतात . आपल्या सर्व गोष्टींचे मुलं
निरीक्षण </span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">बारकाईने आपल्या सर्व गोष्टी मुलं </span><span style="background-color: transparent; color: #333333; font-family: Mangal, serif; font-size: 12pt; line-height: 115%;">न्या</span><span lang="MR" style="color: #333333; font-family: Mangal, serif; line-height: 13.5pt;">हाळत असतात . आणि त्यातूनच मुलं घडत असतात . त्या निरीक्षणातूनच त्यांच्यातला
खरे-खोटेपणा सिद्ध होत असतो . म्हणजेच पर्यायाने आपली जबाबदारी फारच वाढलेली असते
. आपली प्रत्येक कृती </span><span style="color: #333333; font-family: Arial, sans-serif; line-height: 13.5pt;">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: Mangal, serif; line-height: 13.5pt;">मग ती
अगदी छोटोशीच का असो . चांगल्याची </span><span style="color: #333333; font-family: Arial, sans-serif; line-height: 13.5pt;">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: Mangal, serif; line-height: 13.5pt;">पवित्रपणाची</span><span style="color: #333333; font-family: Arial, sans-serif; line-height: 13.5pt;">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: Mangal, serif; line-height: 13.5pt;">प्रमानिकपणाची</span><span style="color: #333333; font-family: Arial, sans-serif; line-height: 13.5pt;">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: Mangal, serif; line-height: 13.5pt;">प्रेमाची</span><span style="color: #333333; font-family: Arial, sans-serif; line-height: 13.5pt;">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: Mangal, serif; line-height: 13.5pt;">स्नेहाची </span><span style="color: #333333; font-family: Arial, sans-serif; line-height: 13.5pt;">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: Mangal, serif; line-height: 13.5pt;">त्यागाची</span><span style="color: #333333; font-family: Arial, sans-serif; line-height: 13.5pt;">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: Mangal, serif; line-height: 13.5pt;">बुद्धीची असायला हवी . मुख्य म्हणजे त्यांचा सदगुण वाढीस
लावणे हे पालकांनी करायला हवे . खऱ्या अर्थाने सद्गुणांचा विकास म्हणजेच मानवतेचा
विकास आहे . ह्या गुणामुळे तो मोठा होतोच पण सामाज्यासाठी आणि देशासाठी
त्याच्याकडून चांगले कार्य घडते . त्या गुणामुळेच सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला तो
हवाहवासा वाटतो . त्याच्या सहवासात आनंदच मिळतो . हे कशामुळे शक्य झालेले असते तर
चांगल्या गुणांची जोपासना करायला हवी.पालकांनी मुलांचे बालपण हिरावून घेऊ नये .
कारण त्यांचे हे दिवस परत येनारे नसतात. त्यांना फक्त प्रेमानेच जिंकायचे असते .
कावळा दिसला कि हातातले बिस्कीट पुढे करणारे मुल हे उपजतच अंतप्रेर</span><span style="color: #333333; font-family: Mangal, serif;">णेने </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: Mangal, serif; line-height: 13.5pt;">होत असते .
हि त्यांची भावना वाढीस लावण्याचे काम पालकांनी करावयाचे असते . एक तीळ सात जणांनी
वाटून खायचा हे जपणारी आपली संस्कृती पालकांनी आपल्या मुलांकडून चालू ठेवायची </span><span style="color: #333333; font-family: Arial, sans-serif; line-height: 13.5pt;">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: Mangal, serif; line-height: 13.5pt;">दिल्याने आनंद वाढतो हे पालकांनीच मुलांना शिकवायचे असते .
अगदीच हटी् मुलं असेल तर रागवायचे पण ते कौशल्याने त्यांचा अहंकार दुखावणार नाही
या बेताने.</span></div>
<div style="background: white; line-height: 13.5pt; margin-bottom: .0001pt; margin: 0cm; text-align: justify;">
<span lang="MR" style="color: #333333; font-family: Mangal, serif; line-height: 13.5pt;">खरं म्हणजे निरोगी मन असते .पण आधी </span><span style="color: #333333; font-family: Mangal, serif;">शरीर </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: Mangal, serif; line-height: 13.5pt;">निरोगी असायला हवे.तरच मन
प्रसन्न ताजे-तावाने राहते . आणि ते शरीर निरोगी ठेवायची जबाबदारी पालकांची असते .
मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा असेल तर शारीरिक सुदृढता हवी . सर्व प्रकारचे
अन्न घटक शरीरात गेल्यामुळे मन व शरीर सुदृढ बनते . असे आयुर्वेदाचे म्हणणे आहे .
त्यांना सगळ्या चवींची गोडी लावण्याचे काम आईचे आहे . ॠतुमानानुसार खाण्यात बदल
करायला हवा . थंडीच्या दिवसात तेलाचे करायला हवे . थंडीचा ४ महिन्यात जर
लक्षपूर्वक आहार विहार ठेवला तर पुढचे ८ महिने निर्धास्त राहायला हरकत नाही . अशी
जुनी पिढी सांगत असते . त्यांच्या सांगण्याचं तथ्य तसेच </span><span style="color: #333333; font-family: Arial, sans-serif; line-height: 13.5pt;">“</span><span lang="MR" style="color: #333333; font-family: Mangal, serif; line-height: 13.5pt;">झोप</span><span style="color: #333333; font-family: Arial, sans-serif; line-height: 13.5pt;">” </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: Mangal, serif; line-height: 13.5pt;">विश्रांती
हि सुद्धा पूर्ण झालेली असेल तरच ते मुल तरतरीत दिसते . नाहीतर ते अथरुनातूनच रडत
उठते . म्हणजे त्यांचे काहीतरी बिघडलेले असते हे पालकांनी ओळखायला हवे . निरोगी
विचारच पुढच्या आयुष्यातील काम सोपे करतात . मुलांच्या मनात जिव्हाळा आणि कृतक्षता
या दोन्ही भावना वाढीस लावायच्या त्या रुजवल्या कि आपोआप वाढीस लागतात . कारण या
दोन भावनाच आपल्या संबंधात आलेल्या व्यक्तीशी</span><span style="color: #333333; font-family: Arial, sans-serif; line-height: 13.5pt;">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: Mangal, serif; line-height: 13.5pt;">सामाजाशी आणि पर्यायाने विश्वाशी नातेसंबंध जिवंत ठेऊ शकतात .
माणुसकीने वागल्यामुळे त्याचे थोरपण ठरत असते . आणि मग ते मुल कुणाचे आहे </span><span style="color: #333333; font-family: Arial, sans-serif; line-height: 13.5pt;">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: Mangal, serif; line-height: 13.5pt;">याची विचारणा होते . पर्यायाने संस्कारातून या गोष्टी पुढे
जाऊ शकतात . उत्तम संस्कार माणसाला मोठे करतात . शिक्षणाने जसा अज्ञानाचा अंधकार
दूर होतो . तसे माणसाने आपल्यातले माणूसपण टिकवायचे असते . माणुसकी हि खरी जात आहे
. हे माणसाला कळले पाहिजे .</span></div>
<div style="background: white; line-height: 13.5pt; margin-bottom: .0001pt; margin: 0cm; text-align: justify;">
<span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">
</span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">एकविसाव्या शतकातली गतिमानता
नवीन नवीन रोगांना आमंत्रण देते . एवढेच नव्हे तर पूर्वी म्हतारपणी होणारे रोग
तरुणपणात व्हायला लागलेत . तेव्हा चंगळवादामुळे हे घडते . आळसामुळे रोगाची मुळे
शरीरात जोर धरू लागतात . आहार-विहार आणि विचाराला धरबंध नसेल तर पुढील पिढीत असेच
चित्र दिसेल . म्हणूनच आताच्या शिशूंना शिस्तीचे स्वावलंबनाचे वेळापत्रक असणे
आवश्यक आहे . आणि ते आपल्यापासूनच ॠढ व्हायला हवे . ताण-तणाव नको म्हणून आई
वडिलांचे निकोप नाते हवे . कारण मुल जास्त वेळ घरात असते . तीथें ते निर्भय असते .
त्यांचा कोणत्याही तऱ्हेचा कोंडमारा होता कामा नये . नंतर मोठे झाल्यावर त्यांची
मित्र-मंडळी कशी आहेत </span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">याच्यावर
पालकांचे लक्ष हवे . ती सुदधा चांगल्या संस्कारांच्या घरांतील मुले आहेत कि नाही
हे पालकांनी तपासायला हवे . मुळे खोटं बोलत नाही ना </span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">? </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">कोणत्याही प्रकारची लबाडी मुळे करत नाही ना </span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">? </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">याकडे पालकांचे विशेष लक्ष पाहिजे . वडिलांचे मुलाशी
मित्रासारखे नाते हवे . आईचे मुलीशी मैत्रीनिसारखे नाते हवे . पालकांचे वागणे
पारदर्शी पाहिजे. / मुळे आपोआप शहाणी होतात . आनंद देतात . त्यांच्यातला कलागुण
ओळखून त्याला योग्य तऱ्हेने वाव देणे पालकांचे कर्तव्य आहे . त्यांच्या चुकांबद्दल
योग्य समज देणे </span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">,
</span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">चांगल्या कामगीरीबद्धल शाबासकी
देणे . या दोन्हींचा मेळ घालता आला पाहिजे . मुलांना आई वडिलांचा अभिमान वाटला
पाहिजे . आपले आदरयुक्त प्रेम असेल तर मुळे अपोअपच पालकांना आपले आदर्श मानतात .</span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";"><o:p></o:p></span></div>
<div style="background: white; line-height: 13.5pt; margin-bottom: .0001pt; margin: 0cm;">
<span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">
</span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">दिवसभर नोकरी आणि संध्याकाळी
मुल यात गुरफटलेली स्त्री आपल्या मुलाकडे न थकता लक्ष देते . हे तिचे खरे कौशल्य
आहे . त्याच्या चौकसबुद्धीला खात-पाणी घालते . मुळे फक्त अभ्यासात हुशार असली
पाहिजे असे नव्हे </span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">तर
त्याच्यातला छंद मुलांना जोपासता आला पाहिजे . व्यवहार चतुर कशी होतील हे सुजान
पालकांनी शिकवले पाहिजे . त्यांचा अपमान करू नये . त्यांना चांगल्या शब्दात समाज
द्यावि . मोठ्या माणसांशी कसे वागावे हे लहानपणीच शिकवावे .</span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";"><o:p></o:p></span></div>
<div style="background: white; line-height: 13.5pt; margin-bottom: .0001pt; margin: 0cm; text-align: justify;">
<span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">आई हि सुसंस्कारांची जननि आहे .
आईच्या प्रत्येक कृतीत </span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">प्रत्येक
शब्दात </span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">प्रत्येक सल्ला व उपदेशात सुसंस्कार व
नैतिक मूल्य भरलेली असतात . आई</span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">वडील</span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">शाळा</span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">गुरु हे
संस्कारांचे अधिष्ठान आहे . गुरु</span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">विद्या
संभाषन नेतृत्व असे विविध पैलू शिष्यावर पाडत असतो . चांगल्या नेतृत्वाची समाज्यात
गरज आहे . आणि चांगल्या नेतृत्वाची समाज कदर पण करतो समाज जर समृद्ध आणि सकस हवं
असेल तर हे बाळकडू लहानपणीच मुलाना पाजावे लागेल.
घरातील नात्यामधील जिव्हाळा</span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">एकमेकांशी
सुसंवाद </span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">सुसंस्कार आपलेपणा </span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">एकमेकांसाठी करत राहण्याची वृत्ती यामधून मुलानमध्ये आनंदाचे
झाड जागवण्याचा प्रयत्न प्रत्येक पालकांनी केला पाहिजे . मुलांनी खूप मोठ्मोटया
पदव्या घेऊन खूप पैसे कमावण्यापेक्षा साधे राहून एकमेकांवर प्रेम करून
दुसऱ्यांच्या गरजेला साहाय्य करून </span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">,</span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">धाउन
जाऊन अशा आशीर्वादात जगलं पाहिजे . अलीकडे एकमेकांशी सुसंवाद संपल्याची खंत वाटते </span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">,</span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">त्यामुळे स्वभावात तुटकता अलयाचे जाणवते </span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">एकटेपणा आवडतो </span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">त्यामुळे
स्वार्थी दृष्टी बनते . हे पालकांनी सांभाळले पाहिजे . तुकाराम महाराज म्हणतात </span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">“</span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">मना करा रे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण</span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">” , </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">मन मुळात प्रसन्न पाहिजे मग जग
जिंकल्याचा अनंद मिळेल . उत्साह</span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">सकारात्मक
जगण्याची वृत्तीच आनंदि ठेवते . उपासना कशासाठी आहे</span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">मनाच्या स्वास्थासाठी कोणतीही उपासना करा . मन स्थिर आणि आनंदी
राहण्यासाठी या गोष्टी आहेत . जसे योग आणि ध्यानधारणा यासुद्धा आनंदी जीवनासाठी
उत्तम आहेत. मुलांमध्ये या आवडी
लहानपणापासूनच लावल्या पाहिजेत . वाचनाची आवड रुजवली पाहिजे . शिस्त </span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">काटकसर </span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">वेळेचे
नियोजन या गुणांमुळे मुले नकिच यशस्वी होतील . मुलांकडून मिळणाऱ्या आनंदापेक्षा
पालकांना आणि कशाचीच अपेक्षा नसते . आपली ऐपत असली तरी मुलांना मागितली वस्तू कि
लगेच देऊ नये . त्यांना पैशाची </span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">वस्तूची
किंमत राहत नाही . अपण सारेच आपल्या मुलांवर प्रेम करत असतो . त्यांच्या सुखासाठी
क्षण-क्षण वेचीत असतो . त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी आपला प्रत्येक आनंद सुख
बलिदान करीत असतो . तेच आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी केलेले असते . याची जाणीव
ठेऊन त्यांच्या आयुष्याच्या सायंकाळी त्यांना आपुलकी </span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">प्रेम </span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">, </span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">सुरक्षा
मिळणे हाच त्यांचा अधिकार असतो . तो देणे आपले कर्तव्य आहे . आजी आजोबांचे प्रेम
त्यांना मिळावे हि धडपड प्रत्येक आई वडिलांनी केली पाहिजे . ते सुधा आपल्याच
कुटुंबाचा एक भाग असतात. सोईच्या दृष्टीने ते वेगळे राहत असले तरी त्यांच्याशिवाय
आपले कुटुंब अर्धावर आहे . अपुरे आहे . याची जाणीव हवी . आपल्या मुलांना वाढवताना
त्यांच्या गरजा पूर्ण करण्याकडे जसे लक्ष देता तसेच आपल्या आई वडिलांच्या मानसिक
गरजा भागविणे त्यांची देखभाल करणे त्यांना सुखी व आनंदी ठेवणे हे आपले कर्तव्य आहे
.</span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";"><o:p></o:p></span></div>
<div style="background: white; line-height: 13.5pt; margin-bottom: .0001pt; margin: 0cm;">
<span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">नाती वडिलांकडील किंवा आईकडील असो .
सारीच मैत्रीची असावीत जीवनासाठी ती गरजेची आहे.उत्तम व्यक्तिमत्व निर्मितीसाठी
योग्य मानसिक विकासासाठी सुख शांती</span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">,</span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">समाधानासाठी</span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";">,</span><span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">सर्वांशी
उत्तम संबंध असणे आवश्यक आहे . शेजारी-पाजारी तसेच इतर नातेवाईक सर्वांशी प्रेमाने
असावे म्हणूनच अडूपण विसरून सर्वांशी स्नेहसंबंध मजबूत करायला हवे . मुलांना हे
नात्याचे मोल समजून द्यायला हवे . आणि सकारात्मक दृष्टीकोन हाच सुखी जीवनाचा आहार
आहे . </span></div>
<div style="background: white; line-height: 13.5pt; margin-bottom: .0001pt; margin: 0cm;">
<span lang="MR" style="color: #333333; font-family: "Mangal","serif"; mso-ascii-font-family: Arial; mso-hansi-font-family: Arial;">भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. ती वाढविणे आणि तिची जोपासना करणे हे
प्रत्येकाचेच कर्तव्य आहे</span><span style="color: #333333; font-family: "Arial","sans-serif";"><o:p></o:p></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white; line-height: 14.4pt; margin-bottom: .0001pt; margin-bottom: 0cm; mso-outline-level: 2;">
<br /></div>
<div class="MsoNormal" style="background: white; line-height: 14.4pt; margin-bottom: .0001pt; margin-bottom: 0cm; mso-outline-level: 2;">
<br /></div>
<br />
<div class="MsoNormal" style="margin-bottom: .0001pt; margin-bottom: 0cm;">
<br /></div>
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07785008605705105955noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3223166446058544329.post-53526283966510028132013-08-21T15:51:00.000+05:302013-08-21T15:51:03.304+05:30तंत्रयुगातील पालकत्व <div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiimQQ_Xprwt943k-UMzBKY2fg9C_nEawU0o_rrjIQo0Kj6jckj7DEX2XdAChvgvcziiPpNooDH6l46bkkEIeX70rOsu3vV6APZqFGb1T05HnyUZP4Aw0gv8NLjRbXlvwn_KVoDJ700Qu8/s1600/I+5.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="223" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiimQQ_Xprwt943k-UMzBKY2fg9C_nEawU0o_rrjIQo0Kj6jckj7DEX2XdAChvgvcziiPpNooDH6l46bkkEIeX70rOsu3vV6APZqFGb1T05HnyUZP4Aw0gv8NLjRbXlvwn_KVoDJ700Qu8/s320/I+5.jpg" width="320" /></a></div>
<br />
<br />
<br />
ही गोष्ट आहे अमेरिकेतील जेनेल हॉफमन या मातेची. आपल्या १३ वर्षांच्या ग्रेग या मुलाला तिने आयफोन घेऊन दिला. मोबाइल फोन ही गरज बनलेल्या आजच्या काळामध्ये भारतातही आठ-दहा वर्षांच्या मुलांच्या हातात मोबाइल पडतो आहे. त्यामुळे मुलाला आयफोन देऊन तिने अगदी जगावेगळे असे काहीसुद्धा केले नाही. मात्र , जेनेलने आपल्या मुलाला फक्त फोनच घेऊन दिला नाही , तर फोनबरोबर एक १८ कलमी यादी देऊन तिने आपला वेगळेपणा सिद्ध केला आहे. मुलांनी मोबाइल फोन कसा वापरावा याची आचारसंहिताच या यादीद्वारे तिने तयार केली आहे. मुलांशी- विशेषतः पौगंडावस्थेतील मुलांशी कसा संवाद साधावा या पेचात सतत असणाऱ्या भारतीय पालकांनासुद्धा ही आचारसंहिता मार्गदर्शक ठरू शकेल. जेनेलने आपल्या मुलाला उद्देशून म्हटले आहे , की ' हा फोन मी विकत घेऊन तुला देत आहे. फोनवरील पासवर्ड तू आम्हाला म्हणजे पालकांना सांगायला हवा. आम्ही फोन केल्यानंतर तू तो घ्यायला हवा. दररोज रात्री तू हा फोन आम्हाला द्यायला हवा. सुटीच्या दिवशी तो उशिरापर्यंत फोनवर असला तरी चालेल. अश्लील आणि पोर्न साइट्स तू पाहू नकोस. त्याचबरोबर अश्लाघ्य भाषेतील मजकूर वा आशयही पाहू नकोस. ' जेनेलने लिखित स्वरूपात केलेल्या या सूचना तिच्या मुलालाच नव्हे , तर फोन वापरणाऱ्या जगभरातील सर्वच कुमारवयीन मुलांना लागू आहेत. फोन हरविला , खाली पडला , त्याचे तुकडे झाले किंवा बिघडला तर नवा फोन मिळणार नाही , त्यासाठीची रक्कम जमा करावी लागेल , असेही तिने आपल्या मुलाला सांगितले आहे. मोबाइल वा कम्प्युटरमधील तांत्रिकता ही पालकांपेक्षा मुलांनाच माहीत असते. त्याबद्दल पालकांना अभिमानही वाटत असतो. मात्र , मुले फोनवर वा इंटरनेटवर तास न् तास काय करीत असतात हे ते जाणून घेत नसतात. अभिव्यक्त होण्यासाठी सोशल मीडिया हे चांगले माध्यम असले , तरी त्याचा गैरवापर करणारे अनेकजण असतात. त्या जाळ्यात आपली मुले अडकणार नाहीत , सोशल मीडियाच्या भासमान जगाचे त्यांना व्यसन लागणार नाही , याची काळजी पालकांनी घ्यायलाच हवी. त्यासाठी काय करता येऊ शकते , याचे एक उदाहरण जेनेलने दाखवून दिले आहे. तंत्रज्ञान युगातील पालकत्वाचा हा कित्ता सर्वांनीच गिरवण्यासारखा आहे.
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07785008605705105955noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3223166446058544329.post-22078497178742298852013-08-21T15:21:00.001+05:302013-08-21T15:27:43.821+05:30शाळेची अति घाई-कि आपली सुटका <b>
मुलांना पटापट मोठं करायला निघालेल्या आई-बाबांनो, जरा सबुरीनं.
दीड-दोन वर्षांचं मूल. रडत-भेकत शाळेत जातं.पालकांना वाटतं, मूल लवकर शाळेत गेलं म्हणजे ‘बुद्धिमान’ होईल, लवकर पुढे जाईल,
स्पर्धेत सगळ्यांच्या पुढे राहील. शाळाही त्यांना ‘हुशार’ करण्याचा चंग बांधतात. लेखन, वाचन, पाठांतर. त्यांच्या बोकांडी मारतात.
त्यातून मूल खरंच हुशार होतं?.
झ्या मैत्रिणीनं तिच्या मुलीला शाळेत घातलंय. ती फक्त दीड वर्षांची आहे.’’
‘‘मुलांना लवकरच्या वयात शाळेत घातलं म्हणजे बरं पडतं. त्यांना सवय लागून जाते.’’
‘‘मला आणि त्याच्या बाबांना नोकरीवर जायचं असतं. थोडा वेळ तो शाळेत गेला, म्हणजे आजी-आजोबांना पण सांभाळायला सोपं जातं.’’
‘‘तो खूप रडतो शाळेत जाताना. पण मी तरी काय करू? मला कामावर जावं लागतं.’’
हल्ली अशी वाक्यं खूपच कानावर पडतात. कुठेही जा, एखाद्या गावात, नाही तर शहरात, मुलांना जेवढय़ा लवकर शाळेत घालता येईल तेवढय़ा पटकन त्यांना शाळेत पाठवायचं, असं जणू फॅडच आलंय. दिवसेंदिवस ते वाढतही चाललंय. खूप लहान लहान मुलं अडखळत्या पावलांनी आई-वडिलांबरोबर शाळेची वाट चालू लागली आहेत.
का होतंय असं?
या संदर्भात काही शाळाचालक म्हणतात, ‘आमच्या शाळेत आधी फक्त ‘के.जी.’च होतं. पण पालकांच्या आग्रहामुळे आम्ही ‘मिनी केजी’ आणि त्या आधीच्या
वयासाठी प्ले ग्रुपही सुरू केले.’’ काही शाळाचालक मात्न लहान मुलांना लवकर शाळेत घालण्याचं व्यवस्थित सर्मथन करतात.
.प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं मुलांच्या ‘लवकरच्या शाळे’चा विचार करतात. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की, ज्याला/जिला शाळेत घालायचंय, घातलंय, त्यांचा विचार कोणीच करत नाही.
- त्यांना शाळा हवीये का?
- त्यांना शाळा आवडते का?
- त्यांना शाळा झेपेल का?
- ते शाळेत जाऊन नक्की काय करणार आहेत? काय शिकणार आहेत?
- हे आत्ताच शिकणं आवश्यक आहे का?
- आत्ता मारून-मुटकून शाळेत नाही घातलं तर चालणार नाही का?
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हे दीड-दोन वर्षाचं वय शाळेत जायचं आहे का?
हे प्रश्न प्रत्येकाला पडले पाहिजेत. या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळायला हवीत.
- असा विचार करताना लक्षात येईल की, आपण पहिल्याच प्रश्नाला अडखळलो आहोत. ‘मुलांना शाळा हवी आहे का?’ या प्रश्नाचं काय उत्तर आहे?
यावर कोणीही म्हणेल की, ‘त्याला काय कळतंय शाळा म्हणजे काय ते? हा विचार आपणच करायचा असतो.’
पण आपण तरी करतो का असा विचार? बहुतेक जण शेजार्यानं, मित्नानं, मैत्रिणीनं, नातेवाईकांनी त्यांच्या मुलांना शाळेत घातलं, मग आपणही घालायला पाहिजे, असा विचार करतात. त्यातूनच मग अशा छोट्यांच्या शाळा जन्माला येतात. त्यात मुलं जायलादेखील लागतात. के.जी.च्या आधी मिनी के.जी. आणि त्याआधी प्ले ग्रुप सुरू झालेत.
मुलांना पटापट मोठं करायला निघालेले आई-बाबा आणि त्यासाठी आपला एक एक वर्ग खाली करणारे शाळाचालक यामुळे मुलांना लवकर शाळेत घालायचं पेव फुटलंय. यात सारासार विचार कोणीच करत नाहीये. आई-बाबा नाही आणि शाळाही नाही. अगदी दीड वर्षाचं असताना प्ले ग्रुपला घातलेलं आपलं मूल पटापट अभ्यास करायला लागणार आहे, अतिशय बुद्धिमान होणार आहे, असं सार्यांनाच वाटतंय का? ही मुलं शाळेत जाऊन नक्की काय करणार आहेत? काय शिकणार आहेत? आणि हे आत्ताच शिकणं आवश्यक आहे का?.
सध्या तर असं दिसतंय की, बुद्धीचा विकास वगैरे जाऊ द्या, मुलांच्या साध्या शारीरिक गरजासुद्धा शाळेच्या या सोसापायी पूर्ण होत नाहीयेत. अशा शाळा बहुतेक सकाळी लवकरच्या असतात. झोपेतून उठवून तयार करून शाळेत पाठवणं, खाणं झालंय की नाही, शी झालीये का नाही याकडे दुर्लक्ष करून भराभर आवरून वेळेत सोडून येणं हेच महत्त्वाचं. कितीही रडत असलं तरी त्याकडे दुर्लक्ष करून सोडून येणं, शाळेच्या शिक्षकांनी मुला/मुलीचा ताबा घेणं. हे अशा छोट्या-छोट्या मुला-मुलींच्या बाबतीत रोजच्या रोज घडतं. बर्याच मुलांना हे बदल स्वीकारता येत नाहीत. ते रडत राहतात. शिक्षक काही मिनिटं रडणार्या मुलांना घेऊन बसतात. पण सारखं कोण घेऊन बसणार? काही मुलं तर सहा महिन्यांपर्यंत शाळेत सोडलं की रडत राहतात. अगदीच निरुपाय झाल्यावर केव्हातरी रडणं बंद करतात. या सगळ्य़ातून आई-बाबा आणि शिक्षक काय साधतात? यामुळे मुलांच्या मनावर दीर्घकालीन काय परिणाम होणार आहे हे आई-बाबांनी लक्षात घ्यायला हवं.
एकूण काय, तर योग्य वयात मुलांना शाळेत घातलं तर मुलं शाळा एन्जॉय करतील. अवेळी आलेला पाऊस जसं काही रुजवत-मुरवत नाही उलट नुकसानच करतो तसंच अवेळी शाळेत जाणार्या मुलांच्या कोवळ्या मनावर अवेळी शाळेच्या बळजबरीचे ओरखडे उमटल्याशिवाय राहणार नाही.
पूर्वीची बालवाडी
मुळात बालवाड्या सुरू का झाल्या? याचा विचार कोणी केला आहे का? आता तर बालवाय़ांमधून मुलांचे खेळ कमी आणि शिकणं जास्त होतं. पूर्वीच्या बालवाड्या आणि आताच्या बालवाड्या यात आता बराच फरक पडलाय. बालवाडीसाठी शब्द होता ‘के.जी.’ म्हणजेच ‘किंडरगार्टन.’ या केजीचा जनक फ्रेडारिक फ्रोबेल. त्यांच्या नजरेसमोरचं किंडरगार्टन काही वेगळंच होतं. किंडरगार्टन म्हणजे मुलांची बाग. मुलांनी इथे येऊन बुद्धीला चालना देणारे खेळ खेळावेत अशी त्यांची योजना होती. त्यासाठी फ्रोबेलनं वयानुसार खेळणी तयार केली होती. त्यात प्रामुख्यानं चेंडूचा वापर केला होता. विविध प्रकारचे चेंडूचे खेळ त्यांनी शोधून काढले होते. मुलं चेंडू खेळण्यातून खूप काही शिकतील, असं त्यांना वाटत होतं. फ्रोबेलनंतर पेस्टॉलॉजी या मानसशास्त्नज्ञानंही फ्रोबेलप्रमाणेच आपली बालवाडी चालवली. फ्रोबेल यांच्या मूळ कल्पनांना त्यांनी धक्का लावला नाही. यानंतर मुख्य आणि आपल्याला माहीत असलेलं नाव येतं ते ‘मॉन्टेसरी’चं. मॉन्टेसरी मॅडम यांना वाटायचं की, मुलांच्या बुद्धीला योग्य प्रकारे चालना देण्याचं हेच वय आहे. मुलं खेळ खेळण्यातून काही नवं शिकतील हे त्यांनी बघितलं. खेळताना मुला-मुलींना आवर्जून स्वातंत्र्य दिलं. सगळ्या मुलांना एका वेळी एकाच प्रकारचा खेळ खेळायचा असेल असं नाही. त्या क्षणाला जे खेळायचं आहे ते त्यानं निवडणं, त्याला वाटेल तितका वेळ त्यानं ते खेळणं आणि खेळून झाल्यावर जागेवर ठेवणं यातून खेळ, अभ्यास, शिस्त लागेल हे त्यांनी बघितलं. यातलं महत्त्वाचं काय तर, या तिघांनीही ‘मुलांचं वय लक्षात घेऊन खेळ’ हाच महत्त्वाचा मुद्दा मानला. खेळातून बुद्धीचा विकास होईल हे बघितलं.
आताची बालवाडी
पूर्वीच्या बालवाडीच्या तत्त्वाशी तुलना करता आजच्या बालवाड्यांमध्ये काय दिसतं? तर बुद्धिविकासाच्या दृष्टीनं पूर्ण विरोधी असणारं लेखन, वाचन, पाठांतर असा चक्क ‘अभ्यास’च शाळाशाळांमध्ये सुरू झाला आहे. या अभ्यासामुळे मुलं लवकर लवकर शिकतील, लवकर पुढे जातील, स्पर्धेत पुढे राहतील असं पालकांना वाटतं, पण होतं ते नेमकं याच्या उलट. लवकर, नकळत्या वयात शाळेत टाकल्यामुळे ते शाळेलाही लवकरच कंटाळणार आहेत. म्हणजे जे आई-बाबांना हवंय, त्याच्या नेमकं उलट होण्याची शक्यता. कारण चार ते सहा ही बालवाडीत जाऊन खेळायची वर्षं आहेत. सहा वर्षं पूर्ण झाली की पहिलीत प्रवेश घ्यायचा. ही पद्धत योग्य आहे. कारण या वयात मूल आपल्या विश्वातून थोडंसं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतं. त्याचं सामाजीकरण होण्याची प्रक्रि या चालू असते. मुद्दाम शाळेत घातलं नाही तरी मित्न-मैत्रिणींकडे ओढा वाढणार असतो. बाहेरच्या वातावरणात जाऊन छोटे खेळ खेळणं आवडणार असतं. आपल्या नेहमीच्या सवयीच्या भाषेतली गाणी साभिनय म्हणणं, गोष्टी ऐकणं यातला रस वाढणार असतो. त्या नेमक्या वयात त्याच्यासमोर अतिशय आनंदाच्या वातावरणात बुद्धीला चालना देणारं जर काही ठेवलं तर त्याच्या मेंदूत सकारात्मक बदल घडतील. घरापेक्षा वेगळ्य़ा ठिकाणी, पण आनंदी वातावरणामुळे त्याच्या मनावर अन् भावनांवरही चांगले परिणाम होतील.
‘स्वार्थी’? - आई?
राध्याच्या शाळेचं कसं होणार बाई आता?
- असा प्रश्न पडला असेल का ऐश्वर्या रायला?
‘ऐश्वर्या ढुंढ रही है आराध्या के लिए स्कूल’ अशा ब्रेकिंग न्यूज आपण मध्यतंरी टीव्हीवर पाहिल्या. हे कमीच म्हणून त्यात असाही उल्लेख होता की, शिल्पा शेट्टीचा मुलगा विवानही आता शाळेत जायला लागला. (म्हणून तर तिला डान्स शो, आयपीएलसाठी वेळ मिळतो म्हणे.)
आणि.
आपल्या आमीर खानची बायको किरण, मोठी दिग्दर्शिका. तिचा मुलगा आझादही झाला की, दीड वर्षाचा. तोही आता जायला लागला शाळेत. (त्यामुळे आता किरणला वेळ मिळणार आणि ती पुन्हा झडझडून कामाला लागणार असल्याचे कळते-समजते. टीव्हीच्या बातम्यांवरून.)
मग आराध्या तर दोन वर्षाची होईल नोव्हेंबरात.
अजून ती शाळेत जात नाही, मागे तर नाही पडणार ती इतरांच्या तुलनेत?
- असं वाटत असेल का आजी-आजोबा बच्चन, बाबा बच्चन आणि आई बच्चनला.?
- त्यांना काय वाटत असेल ते त्यांचं ते जाणोत.
पण आपल्यातल्या सामान्य आया.? त्यांना सगळ्याची घाई.
साधारण एकाचवेळी झाली बाळंतपणं तर, झालीच स्पर्धा सुरू. तिचं मूल पालथं पडतं आपलं अजून नाही, अमकीचं बाळ सहाव्या महिन्यातच बसायला लागलं, तमकीचं चौथ्यातच सरकायला लागलं.
धड मान धरता येत नाही त्या बाळांना स्वत:ची, पण इकडे आयांची स्पर्धा सुरू. काही ‘शहाण्या आणि जागरूक’ आया तर इंटरनेटवर ऑनलाइन मुलांच्या प्रगतीचे ‘माईलस्टोन’ तपासत आपल्या बाळाला जन्मत:च जागतिक स्पर्धेत उभं करतात, वजन-उंची-अँक्टिव्हिटीची जागतिक स्पर्धाच सुरू करून टाकतात.
मूल मोठं व्हायला लागतं तशी स्पर्धा वाढते आणि जेमतेम दीड वर्षाच्या मुलासाठी शाळेचा शोधही सुरू होतो. ‘पटापट शिकेल गं सगळं आणि तेवढाच दोन तास आराम आपल्याही जीवाला.’ असं म्हणत मूल दीड वर्षाचं झालं की टाकतात त्याला एखाद्या इंग्रजी ‘प्ले स्कूल’मध्ये.
लगेच सुरू स्टँडिंग लाइन-स्लिपिंग लाइनची स्पर्धा.
वह्या-पुस्तकं-युनिफॉर्मचं ओझं आणि ते घेऊन व्हॅनमध्ये बळजबरी कोंबलेलं, भेदरलेलं-भोकाड पसरलेलं मूल. इतर आयांच्या तुलनेत आपण पुढं राहावं. आपलं मूल आपलं ‘प्रगतिपुस्तक’ बनावं. आणि त्यासाठी त्या बाळानं करावी सुरुवात स्वत:ला सिद्ध करायला.
एवढी ‘स्वार्थी’ असते आई.?
विचारावं स्वत:ला आपणच.!
डॉ.श्रुती पानसे</b>Anonymoushttp://www.blogger.com/profile/07785008605705105955noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3223166446058544329.post-55834177551707328252012-12-06T15:05:00.000+05:302012-12-06T15:05:50.439+05:30संस्कार.......एक द्विधा ??<blockquote></blockquote>
<b>संस्काराचं बाळकडू ..
बालपणीच पाजलेले..
आज मात्र समाजात,
संस्काराचे "बारा" वाजलेले..
समाजात फिरताना जाणवतो,
संगतीचा भारी पगडा...
इकडेच सुरु होतो,
'संस्कार - संगत' झगडा..
मौल्यवान शिक्षणाचे सध्याचे..
समाजातले "दर" पाहून,
'डॉक्टर' , 'इंजिनिअर' अशा "सेवाभावी" इच्छा..
मनातच जातात राहून.,,
आजचे "कॉर्पोरेट विश्व" म्हणजे..
संस्कार जपण्याची बॉर्डर,
कारण क्वालिटी डावलून,
"बार" मध्ये साईन होतात पर्चेस ऑर्डर..
विवाह संस्था ह्या पवित्र प्रथेचे..
बदललेले इक्वेशन.....म्हणजेच
स्वातंत्र्याच्या "स्पेस" साठी...
सजवलेले "लिव इन रिलेशन"
अनेक उदाहरणे देऊन गायली जाते...
नारी शक्तीची गाथा,
सोयीनुसार संस्कारांना डावलून
रुजवली जात आहे...."स्त्री-भ्रूण" हत्येची प्रथा..
"मोठा झाल्यावर नक्की सांभाळेन..."
ही बालपणीच्या संस्काराची भाषा..
अर्थार्जनाच्या हव्यासापोटी पालकांना दाखवते..
एकटेपणा अथवा वृद्धाश्रमाची दिशा..
समाजातल्या अशा विरोधाभासाने,
होऊन देऊ नका स्वतःची "द्विधा"..
बुद्धीचा कस पणाला लावून..
विचारांचा सुवर्णमध्य साधा.
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhroqoOsHgwj-jjUDP9Z2pjys9xFe8jcwsoKgxquLl02lbkwQcg3f-dYwKbX2HGt42-rnsdHwFdRt6tYIJX8c7Lpvnvs4QsK1TlxAJWNb1FvkJfb35HGGFO49d9TlBnRzBda1HgL8YVhvk/s1600/%25E0%25A4%25B8%25E0%25A4%2582%25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%2595%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B0.jpg" imageanchor="1" style="clear:left; float:left;margin-right:1em; margin-bottom:1em"><img border="0" height="192" width="256" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhroqoOsHgwj-jjUDP9Z2pjys9xFe8jcwsoKgxquLl02lbkwQcg3f-dYwKbX2HGt42-rnsdHwFdRt6tYIJX8c7Lpvnvs4QsK1TlxAJWNb1FvkJfb35HGGFO49d9TlBnRzBda1HgL8YVhvk/s320/%25E0%25A4%25B8%25E0%25A4%2582%25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%2595%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B0.jpg" /></a></div>
चांगले संस्कार आणि स्वतःचे विचार
यांचा अचूकपणे घाला मेळ...
आनंदाने जीवन जगण्याचा,
मग रंगात येईल खेळ..
</b>Anonymoushttp://www.blogger.com/profile/07785008605705105955noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-3223166446058544329.post-22149929401812059492012-11-27T14:57:00.000+05:302012-11-27T14:57:19.755+05:30तुम्ही, मी, आपण सारे सुजाण पालक....आहाहा! लेखाचं शीर्षकच कसं कानाला गोड वाटतं!- -प्रा. रमेश सप्रे
पण ते अर्धवट आहे...पुढे जे शब्द आहेत ते मनाला कसे वाटतात पहा.....‘आहोत का? (सुजाण पालक आहोत का?)
नसू तर कसे होऊ?’ असे ते शब्द, खरं तर, प्रश्न आहेत. आजचा हा आपणा सर्वांच्या दृष्टीनं जिवंत नि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्याविषयी अनेक पालक-शिक्षक संघांच्या बैठकांतून प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांच्या मुळाशी मुलांचं वर्तन, अभ्यास यामुळे बिघडलेलं कौटुंबिक आरोग्य असतं.
पण वाटते तेवढी ही परिस्थिती गंभीर नाही. आपण पालकांनी थोडं अंतर्मुख होऊन चिंतन केलं पाहिजे. ‘सुजाण पालकत्व’ (वाइज पेरेंटिंग) ही कल्पना अलीकडच्या काळातील आहे अन् ती महत्त्वाची आहे. ‘जाण’ शब्दात जाणणे, जाणता, जाणीव अशा अर्थांच्या छटा आहेत. आपल्याला मुलांच्या मनाची(मानसिकतेची) खरी जाणीव आहे का? मुलांची मनं सदा प्रसन्न राहावीत यासाठी करायच्या उपायांची आपल्याला जाण आहे का? आपण आई-वडील झालो खरे पण ‘परिपक्व, जाणते पालक’ झालो का? हा खरा प्रश्न आहे. म्हणतात ना, आई-वडील होणं सोपं आहे, ‘पालक’ होणं अवघड आहे. पशुपक्षी सारे आई-वडील बनतात पण पालक नाही बनू शकत कारण त्यासाठी आवश्यक ती बुद्धी, विचारशक्ती म्हणजेच ‘जाण नि जाणीव’ त्यांच्याकडे नसते. प्रा. राईलकर हे गणिताचे प्रसिद्ध शिक्षक. त्यांना सरकारनं पाहणी करून विद्यार्थ्यांच्या अभ्यास -विषयक परिस्थितीबद्दल सूचना करणारा अहवाल सादर करण्यास सांगितलं होतं. त्यांच्या अहवालाचं नावच आहे, ‘पालकांनी चालवलेला मुलांचा छळवाद’. यात दोन मुख्य मुद्दे म्हणजे मुलांवर आरंभापासून पालकांनी लादलेलं इंग्रजी माध्यम आणि त्यांच्यावर लादलेलं अवास्तव अपेक्षांचं ओझं. एकूण बोजा वाहणार्या गाढवासारखी अवस्था मुलांची होते म्हणून ‘छळवाद’ हा शब्द वापरलाय. असो.
‘बालभवन’ म्हणजे मुलांसाठी नंदनवन. शाळा सोडून उरलेल्या वेळात मुलं इथं निरनिराळ्या कला शिकायला, छंदांचा विकास करायला, आनंदात नाचायला, गायला, बागडायला जमतात. गोव्यातही शहरी व ग्रामीण भागात अशी अनेक ‘बालभवनं’ आहेत. महाराष्ट्रातील ‘बालभवन’च्या संचालिका शोभा भागवत या चांगल्या लेखिकाही आहेत. मुलांचं शिक्षण, पालकांच्या अडचणी, सुजाण पालकत्व अशा विषयावर चिंतन व निरीक्षण करून त्यांनी काही पुस्तकंही लिहिली आहेत. त्यांच्या एका लेखाचं नावच बरंच काही सांगून जातं. - ‘पालकांना, शहाणपण देगा देवा!’...मुख्य विचार अर्थातच शिक्षण म्हणजे फक्त मार्क्स-ग्रेड्स-रँक्स-पर्सेंटेज एवढाच उद्देश समोर ठेवणारे अनेक पालक असतात. त्यांना आपण आपल्या मुलांचं ‘मार्क्स मिळवणारं यंत्र’ बनवताना त्यांचं कधीही परत न येणारं लहानपण हिरावून घेतोय याची जाणीव नसते. हे कसले ‘सुजाण पालक!’
पालकत्वाचा सर्वांगीण विचार करणारी(ए टू झेड ऑफ पेरेंटिंग) अनेक पुस्तकं मिळतात. ‘जडण-घडण’, ‘पालक-नीती’, गोव्यातील विद्याभारती -कडून प्रकाशित होणारं ‘पालक मित्र’ अशी अनेक नियतकालिकं आपापल्या परीनं ‘सुजाण पालकत्वासाठी मार्गदर्शन करत असतातच. आपणही थोडं याच दिशेनं सहचिंतन करू या.- शाळेत पालकांना संबोेधित करण्यासाठी बोलवतात तेव्हा एक नेहमीचा विषय असतो - ‘मुलांच्या शिक्षणात किंवा व्यक्तिमत्त्व विकासात पालकांचा सहभाग(पार्टिसिपेशन) किंवा पालकांची भूमिका (रोल ऑफ पेरेंट्स). शहरातील व ग्रामीण भागातील पालकांच्या बर्याच अडचणी समान असल्या तरी काही निराळ्या निश्चित असतात. अशा सभांना पालकांना बोलावणं हे रुटीन कर्मकांड असतं. पण पालकांनी येणं किंवा त्यांना आणणं हे त्या त्या शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचं काम असतं. हल्ली पालकांना जाणीव होऊ लागलीय त्यामुळे पूर्वीपेक्षा खूपच चांगली उपस्थिती अशा बैठकांना असते.
मुलांचा अभ्यास, सवयी, वागणं याविषयी नुसत्या तक्रारी करून भागणार नाही हे आता बहुतेक पालकांना पटलंय. त्याबरोबरच नुसता शिक्षकांवर सर्व भार टाकणं किंवा सध्याच्या परिस्थितीबद्दल त्यांना जबाबदार धरणं हेही योग्य नाही याची जाणीवही पालकांना अधिकाधिक होऊ लागलीय. हे मुलांच्या जीवनाच्या दृष्टीनं शुभचिन्ह आहे.
त्याचप्रमाणे अनेक शाळांच्या पालक-शिक्षक संघांच्या माध्यमातून पालकांसाठी विविध विषयांवर उद्बोधन वर्ग, तज्ज्ञांची व्याख्यानं व प्रश्नोत्तरं सत्रं असे कार्यक्रम सादर होऊ लागले आहेत. ही अत्यंत आवश्यक व आशादायी घटना आहे. पालकांनी अधिकाधिक संख्येनं व सकारात्मक मनोवृत्तीनं यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि हे सारं करताना मनात ‘मुलांचं हित’ हाच मुद्दा असला पाहिजे.
सकाळी ७ ते सायंकाळी ७ असे दिवसाचे सक्रिय १२ तास पालक मुलांपासून दूर असणारी बहुसंख्य उदाहरणं आहेत. मुलांचं दुपारचं जेवण, थोडी विश्रांती, सकस मनोरंजन, गृहपाठादी अभ्यास, मित्रमैत्रिणींशी फोनवरून बोलणं, वृत्तपत्रादींचं थोडं वाचन अशा अनेक बाबींकडे पालक लक्ष देऊच शकत नाहीत. व लक्ष देण्यासाठी ठेवलेले नोकर-चाकर याबाबतीत विशेष काही करू शकत नाहीत. हे खरं कारण आहे जे पालकत्वाच्या निरोगी विकासाच्या आड येतं. पालकांनी संस्कार केव्हा घडवायचे - संध्याकाळी, रात्री की सुटीच्या दिवशी? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. याच्यावर प्रभावी उपाय आहे का याचा विचार आता करू या. मुलं हे आपल्या जीवनाचा प्राण आहेत हे पालकांना सांगावं किंवा शिकवावं लागत नाही. पण ‘मुलं’ही आपल्या दैनंदिन व एकूण जीवनाची प्राथमिकता किंवा अग्रक्रम(प्रायॉरिटी) आहे का? ...हा प्रश्न विचारात टाकणारा आहे.
इतर अनेक कटकटी आपल्या मागे असतात हे खरं आहे. पण हेही सत्य आहे की अनेक अनावश्यक कटकटी आपण आपल्या मागे लावून घेतो आणि त्यामुळे मुलांसाठी वेळच उरत नाही. नाहीतरी आपली एकूणच जीवनपद्धती स्वकेंद्री (सेल्फ सेंटर्ड) होऊ लागलीय. कळत नकळत र्आपल्या अनेक कृतींचा फोकस आपल्या स्वतःच्या सुखसोयींवर, आरामसुविधांवर असतो. त्याप्रमाणात कुुटुंबासाठी, मुलांसाठी वेळ व शक्ती कमी राहते. परिणाम मुलांच्या वागण्यामुळे व अभ्यासाच्या परिस्थितीमुळे सर्वांच्या मनावर सदैव ताण राहतो जो कौटुंबिक शांतिसमाधानाला आणखी मारक असतो. हे दुष्टचक्र भेदलं पाहिजे. यासाठी काय करता येईल?
वेळेचं नियोजन(टाइम मॅनेजमेंट) जरा काटेकोरपणे करून त्यात मुलांना केंद्रबिंदू ठेवलं पाहिजे. सर्वप्रथम व सर्वांत शेवटी अधिकाधिक वेळ मुलांसाठी ठेवलाच पाहिजे. सुदैवानं हल्ली कुटुंबात मुलं कमीच(बहुतेक कुटुंबात एकच) असतात. त्यामुळे लक्ष देणं अवघड नसतं पण विशिष्ट वेळ यासाठी राखून ठेवावाच लागतो.
काम करणार्या पालकांना मुलं सर्वसाधारणपणे सायंकाळीच भेटतात. त्यावेळपर्यंत दिवसभराच्या कष्टानं, केलेल्या वणवणीमुळे शरीर थकून जातं. पण मनाचा उत्साह कायम ठेवला तर मुलांसाठी आवश्यक ती ऊर्जा राखून ठेवता येते. ती ठेवलीच पाहिजे.
शिक्षणाशिवायही मुलांचं जग व जीवन आहे हे पक्कं ठरवलं पाहिजे. शिक्षण कमी महत्त्वाचं नाही पण मुलांबरोबरचं आपलं ‘सहजीवन’ अभ्यास, गृहपाठ, क्लासेस, शिकवण्या यामुळे झाकोळून जाणार नाही याची खबरदारी घेतलीच पाहिजे.
आठवड्याच्या शेवटी(वीकेंड) मुलांबरोबरच राहण्याच्या दृष्टीने नियोजन केलं पाहिजे. हे करताना मुलांच्या मनाचा कल लक्षात ठेवायला हवा याचं भान ठेवलं पाहिजे.
घरातील साध्या साध्या गोष्टीत जी निर्णय घेण्याची प्रक्रिया(डिसिजन मेकिंग) असते त्यात मुलांचा मार्गदर्शित सहभाग (गाइडेड पार्टिसिपेन) असला पाहिजे.
मुलांबरोबर गप्पागोष्टी करण्यासाठी, काव्यशास्त्र विनोदासाठी खास वेळ रोज काढून ठेवला पाहिजे. मुलं मोठी होत जातील तशा अनेक मर्यादा या गोष्टींवर पडतील.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या मित्रमंडळाचा (पीअर ग्रुप्स) त्यांच्या अनेक सवयी, निर्णय, आवडीनावडी यावर व एकूणच वर्तनावर खूप प्रभाव किंवा दबाव(पीअर प्रेशर) असतो ही गोष्ट मान्य केलीच पाहिजे. हल्लीच्या जीवनपद्धतीत वाढत्या वयाच्या मुलामुलींच्या मनावर तर शिक्षक-पालक-इतर वडील मंडळी यांच्यापेक्षा हा प्रभाव अधिक असतो. आईवडिलांनी आपला प्रभाव प्रेम, आपुलकी, कर्तव्यपालन यातून सतत जागता व जिवंत ठेवायला हवा. लहानपणापासून मुलांच्या भावजगताशी व कल्पना किंवा विचार विश्वाशी प्रेमानं जोडलेलं राहणं यासाठी अत्यावश्यक आहे. प्रेमानं जाणीवपूर्वक केलेला स्पर्श हा यासाठी जिवंत सेतु आहे. अजून खूप गोष्टी आहेत त्या पुढच्या वेळी बघू. एक लक्षात ठेवू या - मुलांची स्वतंत्र व्यक्तिमत्वं असतात. त्यांना गृहीत न धरता त्यांचं हित साधण्याचा संकल्प करू या.
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07785008605705105955noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-3223166446058544329.post-49838319259093376172012-05-08T15:41:00.001+05:302012-05-08T15:41:27.390+05:30काही सत्य पालकांसाठी<b>"आपल्या श्वासोच्छवासापासून आपल्या सगळ्या भावभावना नियंत्रित करणाऱ्या मेंदूच्या वाडीतले काही टप्पे पाह्रच रंजक आहेत .ज्या मुलांचे पालक/शिक्षक त्यांना मोठ्यादा गाणी /गोष्टी म्हणून /वाचून दाखवतात आणि तसचं त्याच्यांशी सतत संवाद साधतात त्या मुलांचा मेंदू झपाट्याने विकसित होतो .
मुल भाषा कशी शिकत आणि त्यात मेंदूची भूमिका काय असते हे तपासायचं ठरवल तर वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत जी मुला किमान दोन भाषा शिकतात त्या मुलांच्या मेंदूची रचना एकच भाषा शिकणाऱ्या मुलांच्या मेंदू पेक्षा थोडी वेगळी असते.
ज्या मुलांना लहानपणी ताणतणाव भांडण असे वातावरण अनुभवायला लागत त्या मुलांची अध्ययन क्षमता कमी होते .
तसेच लहानपणी आपल्या घरात मुलांना प्रोत्साहीत करणारे वातावरण असेल तर शिकण्याची क्षमता २५% नं जास्त वाढते अस संशोधनान सिद्ध झालय."
तेव्हा सुजाण पालक हो आता तरी आपल्यला जागे व्हायलाच हवे,
लहान मुला / मुली समोर काय बोलावे काय टाळावे ह्याचा बोध व्हायला हवा तसेच जेव्हडं जमेल तसं आपल्या बिझी शेड्यूल मधून आपल्या पाल्याशी संवाद साधुयात.
</b>Anonymoushttp://www.blogger.com/profile/07785008605705105955noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-3223166446058544329.post-24145929227356754542012-03-13T16:50:00.000+05:302012-03-13T16:50:04.409+05:30नाते मैत्रीचे पालकांचे मुलांचेसं वाद तेथेच शक्यव असतो, जेथे निखळ, पारदर्शी, विश्वा्सपूर्ण मैत्रीचे नाते असते. मुलांबरोबर खऱ्या अर्थाने संवाद साधायचा असेल; तर पालकांनी व शिक्षकांनी प्रथम मुलांबरोबर मैत्रीचे नाते जोपासायला हवे. यासाठी कुटुंबाचा आपसातील सुसंवाद आवश्य क आहे; तसेच मुलांचे वय व त्या वयातील मानसिक व शारीरिक वाढीच्या आवश्यचकतेनुसार तो अधिक निकोप व सुदृढ व्हायला हवा.<br />
<br />
आज बऱ्याच घरांमध्ये जेथे उत्साही आजी-आजोबा असतात, तेथे घरात व घराच्या बाहेरसुद्धा मुलांची वृत्ती, वागणूक अधिक मनमोकळी व आनंददायी असते. यातील वेगळेपण बघितले, तर आईबाबांसारखेच आजी-आजोबासुद्धा प्रेमाने हवे-नको बघत असतात, इतरही काळजी घेत असतात. त्याहीपेक्षा स्वतःचे वय विसरून मुलांबरोबर लहान मूल होऊन निखळ मैत्रीच्या नात्याने संवाद साधतात. मुलांनी उत्साहाने, उत्सुकतेने सांगितलेल्या शाळा, अभ्यास, खेळ, मित्रमैत्रिणी, यश-अपयश याविषयीच्या गप्पा ऐकतात. त्याचबरोबर मुलांचे भावविश्वे, असंख्य प्रश्न्, कुतूहल, त्यांचे भन्नाट स्वप्नविश्व , आकलनशक्ती, अफाट कल्पनाशक्ती, निर्णयक्षमता, छोट्या-मोठ्या सर्व गोष्टींबद्दलचे मुलांचे निकष, भावभावना, स्वतःविषयी व घरातील सदस्यांविषयीचे विचार, अपेक्षा या सर्व गोष्टींमध्ये त्यांना रस असतो. आपली सर्व कामे बाजूला ठेवून केवळ मुलांसाठी ते हवा तेवढा वेळ देतात. त्यामुळेच मुलांनासुद्धा ते अधिक सुरक्षित, हक्काचे, प्रेमाचे, विश्वातसाचे ठिकाण वाटते. <br />
<br />
मुलांना समजून घेण्यासाठी त्यांना वेळ देणे, प्रसंगी त्यांच्या विश्वाीत आपणही रममाण होणे आवश्यनक आहे. केवळ चुका दाखविणे, उपदेश करणे, स्वतःच्याच मतांचा आग्रह धरणे, असे न करता थोड्या वेगळ्या स्वरूपात (उदा. "हेच काम किंवा अभ्यास तू जर थोड्या वेगळ्या सोप्या पद्धतीने केलास तर तू ते अधिक चांगले करशील, असा मला विश्वा्स आहे) सांगायला हवे. यामुळे एका कार्यसिद्धीसाठी अनेक सोप्या वाटा, उपाय सहजतेने उलगडत गेल्याने चौफेर, व्यापक विचार करण्याची व त्यानुसार प्रत्येक काम अधिकाधिक नेटके व यशस्वी करण्याची अभ्यासूवृत्ती जोपासली जाते व पुढील आयुष्याच्या वाटचालीत कुठल्याही प्रसंगात आत्मविश्वाचस वाढवणारी ठरते. <br />
<br />
आजी-आजोबांकडून मुलांची कधीही कोणाबरोबर तुलना होत नाही. "तुझे- माझे' "आपले-परके' हा भेदभाव नसतो. तेथे फक्त प्रकर्षाने सहकार्याची, बरोबरीची व आपुलकीची भावना असते. आईबाबांनीसुद्धा आपल्या कार्यबाहुल्यातून रोज थोडा वेळ तरी मुलांसाठी जरूर द्यायला हवा. त्यासाठी त्यांनी आपले करिअर, पैसा, संधी व आव्हाने यामध्ये थोडी तडजोड करून मुलांचे उमलते भावविश्व , स्वप्न, अपेक्षा जाणून घेऊन मदतीच्या भावनेने नियमित व गुणात्मक संवाद साधायला हवा. घरातूनच ही सवय असेल तर घराबाहेरही मुले इतरांबरोबर मैत्री करू शकतील. वाहतुकीचे नियम पाळणे, खोटे न बोलणे, दिलेली वेळ व दिलेले काम यासाठी अधिक काटेकोर राहणे, स्वच्छता, वैयक्तिक कामांची जबाबदारी व त्याची सवय स्वतःला असणे, हे कुटुंबातील प्रत्येकाने लक्षात ठेवले तर साहजिकच असे योग्य संदेश घरातूनच मिळाल्याने मुले अधिक सक्षम होत जातात. आपल्या आनंदात; तसेच अडचणींमध्ये, यश-अपयश, संकटातही आपले पालक, कुटुंब सदैव आपल्याबरोबर आहे, ही आधाराची-स्थैर्याची भावना त्यांचे आयुष्य अधिक निकोप, सकारात्मक व प्रगल्भ बनविते.<br />
<br />
अनामिकAnonymoushttp://www.blogger.com/profile/07785008605705105955noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3223166446058544329.post-6682082692874919932012-03-13T16:38:00.000+05:302012-03-13T16:38:44.850+05:30पालकत्व - पूर्वीचे आणि आत्ताचे<b>नमस्कार,<br />
<br />
सुजाण पालक हो आज बरेच दिवसांनी ब्लॉग वर लिहायला वेल झाला ,आणि एक छानसा लेख आपल्यासाठी <br />
<br />
<br />
<br />
<br />
काळ बदलला, त्यानुसार पालकत्वाची संकल्पनाही बदलली आहे. या बदलांना अनुसरून आता पालकांनी मुलांसोबत संवाद साधायला हवा. <br />
<br />
"आजकालची पिढी ना खूप बिघडत चालली आहे. आगाऊपणा आणि उद्धटपणा खूप वाढला आहे. कुणाचा धाक म्हणून नाहीये या मुलांना. खूप काळजी करण्यासारखे चित्र आहे.'' अशा प्रकारचे संवाद अनेक ठिकाणी आजकाल ऐकायला मिळतात. घरात, शाळेत सीनियर सिटिझन्सच्या कट्ट्यावर, पालकांच्या मिटींगमध्ये अगदी लग्न समारंभात सुद्धा असे संवाद ऐकायला मिळतात. खरा विचार केला, तर मुले बिघडली आहेत का? असा प्रश्नस पडतो, काळ बदलला आहे, पिढी बदलली आहे हे आजकाल स्वीकारलेच जात नाही. अजूनही "आम्ही 30-40 वर्षापूर्वी कसे होतो?' यातच मन रमत आहे. "आम्ही कसे आई-वडिलांच्या धाकात होतो, एवढे आगाऊ नव्हतो' याच विचारात आजकालचे पालक आहेत आणि त्याचप्रमाणे मुलांच्याकडून अपेक्षा करत आहेत, असे वाटते. <br />
<br />
पूर्वीचे पालकत्व म्हणजे घरामध्ये कमीत कमी चार मुलांचा ट्रेंड होता. कुटुंब नियोजनाची पद्धत उपलब्ध नव्हती किंवा मुले ही देवाची देणगी आहे, असे समजून होतील तेवढी मुले होऊ द्यायची असा शिरस्ता होता. मग मुले वाढवण्यासाठी पुरेसे आर्थिक बळ, शारीरिक बळ आहे की नाही याचा विचार केला जात नसे. शिवाय एकत्र कुटुंब पद्धती रूढ होती. त्यामुळे बरीच भावंडे, त्यांची सर्वांची मुले एकत्र नांदायची. त्यामुळे मुले आपोआप वाढतात यावर ठाम विश्वावस होता. मुलांना दुखले, खुपले, काही समस्या आल्या, शाळेमध्ये काही समस्या आल्या, तर हे गृहीत धरले जायचे की हे आपापलेच बघायचे. घरामध्ये क्व चित कोणते प्रॉब्लेम्स् घेऊन मुले पालकांपाशी यायची. त्यामुळे घरात पालकांशी संवाद किंवा मुले पालकांशी मोकळेपणाने बोलायला धजावायची नाहीत. वडील कडक किंवा एकतर्फी संवाद करणारे आणि आईची भूमिकाही मुलांना खाऊ-पिऊ घालणे, आजारी असेल तर सेवा-शुश्रूषा करणे एवढीच असायची. कित्येकदा घरामध्ये मुलगा किंवा मुलगी कोणत्या इयत्तेत आहे हेही ठाऊक नसायचे. मुलेसुद्धा शाळा ते घर, घर ते शाळा एवढ्याच परिघात असायची. अगदीच शाळेत काही कार्यक्रम किंवा शाळेच्यावतीने काही क्रीडा, स्पर्धा वगैरे असतील, तर त्यामध्ये मुले भाग घ्यायची. बाकी शाळेतून आल्यावर गल्लीबोळात खेळ खेळायचे हे ठरलेले असायचे. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात काय चालले आहे हे बघण्याची पालकांना आवश्यअकता वाटत नसे. मुलांना सहाव्या वर्षी बालवाडीत प्रवेश घ्यायचा आणि फक्त पहिले आठ दिवस मुलांना शाळेत सोडायचे की पुढे मुले आपोआप शाळेत ऍडजेस्ट होतात असा पालकांचा समज असे. <br />
<br />
पूर्वी वयात येण्याचा काळसुद्धा उशिराच असे. म्हणजे मुली बाराव्या-तेराव्या वर्षी आणि मुले चौदा वर्षाच्या पुढे वयात येत असत. तेव्हाही पालकांना या गोष्टीची माहिती व्हायचीच असे नाही. मुलींच्याबाबतीत मात्र पालक दक्ष असायचे. वयात आलेल्या मुली मैत्रींणीबरोबर गुजगोष्टी करायच्या. लाजाळूपणा, नम्रपणा, मोठ्यांशी आदरानेच वागणे, लग्नाच्या आणि सासरी जाण्याच्या तयारीने घरातील कामे शिकून घेणे, घरातल्या पुरुषांशी किंवा एकंदर मुलांशी, पुरुषांशी मर्यादेने वागणे हे सर्व गृहीत धरले जायचे. प्रेमप्रकरण वगैरे तर दूरच; पण मुलगी एखाद्या मुलाशी चुकून बोलली, तरी तिला मारणे, कोंडून ठेवणे, घर की इज्जत वगैरे दाखवून देणे असे प्रकार पालकांकडून केले जात. <br />
<br />
मुलांच्या बाबतीत घराबाहेर मित्रांबरोबर हिंडणे, चोरून सिनेमाला जाणे, मुलींना चिडविणे, छेड काढणे, शाळेत मारामाऱ्या करणे आणि पालकांकडून क्विचित मार मिळणे ही सर्व वयात येणाऱ्या मुलांची वैशिष्ट्य होती; पण कौतुकच जास्ती असायचे. वंशाचा दिवा म्हणून मुलांना मान मिळायचा, घरातील कोणतेही काम त्यांना सांगितले जात नसे. मुलांना जास्त खाऊ-पिऊ घालणे, मुलींना त्या मानाने अन्न कमी देणे असे प्रकारसुद्धा पालकांच्याकडून घडत असत. <br />
<br />
पूर्वी पालक मुलींच्या शिक्षणाबाबतीत अनुत्सुक असायचे. मुलींनी शिकून काय करायचे? चूल आणि मूल हेच अपेक्षित असल्यामुळे मुलींच्या शिक्षणावर भर कमी दिला जात असे; मग तिला घरकाम, विणकाम, स्वयपांक या सर्व गोष्टी करण्याची सक्ती होती. मुलीने संसार नेटका करावा या दृष्टीने सर्व काही शिकवले जात असे. मुलींनाही या गोष्टींचा ऍक्सेदप्टन्स होता आणि त्याप्रमाणे सोळाव्या - सतराव्या वर्षी त्या लग्न करायला सज्ज असत. <br />
<br />
मुलांच्या बाबतीत शिक्षणाला बऱ्यापैकी महत्त्व होते आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन त्यांनी सरकारी नोकरी किंवा बॅंकेत, पोस्ट खात्यात नोकरी करावी यासाठी प्रयत्न असायचे. "एकदा मुलाला चांगली नोकरी मिळाली की आयुष्याचे कल्याण' अशी पालकांची समजूत असे. त्यामुळे शाळेत नापास झाले ,तर पालक बदडून काढण्यासाठी मागेपुढे पाहात नसत. <br />
<br />
जसजसे स्त्रियांनी शिक्षण घेण्याचा प्रघात आला, तेव्हा हळूहळू पालकत्व आणि पाल्य यांच्यामध्ये लक्षात येण्याइतपत फरक जाणवू लागला. शिक्षण, नवे तंत्रज्ञान, बऱ्याच गोष्टींची नव्याने ओळख (उदा. मोबाईल, इंटरनेट इ.) जागतिकीकरण, आधुनिकीकरण या सर्वांमुळे आजकालच्या मुलांची बऱ्याच गोष्टींशी ओळख झाली. मुख्य म्हणजे कुटुंब नियोजनाच्या अनेक पद्धती आल्यामुळे विभक्त कुटुंब पद्धती जन्माला आली आणि त्यातूनच "हम दो हमारे दो' असा प्रघात पडला. <br />
<br />
आजकाल पालकांना एक किंवा दोन मुले असल्यामुळे आणि एकंदरीतच मुलांचे संगोपन याबाबतीत सर्व पातळीवर जागृती निर्माण झाल्यामुळे पालकांना मुलांकडे लक्ष देणे भाग पडत आहे. आजचे पालकत्व जास्त जबाबदारीचे आणि जोखमीचे झाले आहे. आजकाल मूल जन्माला येण्याआधीच नियोजनाला सुरवात झालेली असते. अगदी गंमतीने असेही म्हटले जाते की, मूल जन्माला येणार असे कळल्यावरच शाळेच्या ऍडमिशन घेण्यासाठी पालकांना धावाधाव करावी लागते. अगदी गर्भसंस्कारापासून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक व्याख्याने, कार्यशाळा आयोजित केल्या जातात. त्यामुळे साहजिकच आपले मूल सर्व गुण संपन्न व्हावे या अपेक्षेने पालक या सर्व मार्गांचा अवलंब करतात. <br />
<br />
पालकांचे समुपदेशन करताना असेही लक्षात आले आहे की, एकंदर आजकालचे पालक धास्तावलेले आणि आत्मविश्वाेस कमी असलेले जाणवतात. मुलांना हाताळण्यात, त्यांचे प्रॉब्लेम्स समजून घेण्यात आपण कुठेतरी चुकतो आहोत किंवा कमी पडत आहोत अशीच भावना रुजलेली दिसते. पालकांच्यात अपराधीपणाची भावना, तसेच हताशपणा, मुलांच्या भविष्याबाबतीत केलेल्या महाभयंकर कल्पना (उदा. ः त्याने, तिने अभ्यास केला नाही तर तो /ती वाया जाईल, त्याचे/तिचे करिअरच घडणार नाही / अशा टोकाला लगेच पोचतात) यामुळे पालक त्रस्त असतात. दुसऱ्या बाजूने पालकांचा विचार केला तर पालक आधुनिकीकरणाचा स्वीकार करतानाही दिसतात. जसे मुलांना मोबाईल देणे, घरामध्ये कॉम्प्युटर असणे, शिक्षणाच्या बाबतीत ठाम असणे आणि त्यासाठी कितीही कष्ट करण्याची तयारी असणे हे सर्वही कौतुकास्पदरित्या बदलेले आहे. <br />
<br />
आजकाल वयात येणाऱ्या, म्हणजे टिनएनर्ज मुलांबद्दल समाजामध्ये बऱ्यापैकी नकारात्मकता निर्माण झाली आहे. एकंदरीत पालक, ज्येष्ठ मंडळी, शाळेतील शिक्षक वर्ग, सर्वच वर्गात एक प्रकारची नाराजी दिसून येते. वयात येतानाचे वयही आता खूप अलीकडे आलेले आहे. तज्ज्ञांच्या मताप्रमाणे आजच्या पिढीला अनेक गोष्टींचे एक्पोयजर मिळाल्यामुळे मेंदू लवकर प्रगल्भ होऊन, मुले लवकर पौंगडावस्थेमध्ये प्रवेश करताना दिसतात. आठव्या, नवव्या वर्षीच पौगंडावस्थेतील लक्षणे दिसायला लागतात. अचानक झालेल्या संप्रेरकांच्या बदलांमुळे (कीोपरश्र उहरपसशी) मुलामुलींमध्ये शारीरिक बदल तर होतातच; पण त्याचबरोबर मानसिक, भावनिक, सामाजिक, वैचारिक, बौद्धिक, सांस्कृतिक, सर्जनशील, कलात्मक, क्रिडात्मक असे अनेक पातळ्यांवर बदल होतात आणि हे बदल साधारण नवव्या वर्षीपासूनच सुरू होतात आणि साधारण विसाव्या वर्षीपर्यंत चालूच असतात; पण हे वय धड लहान नाही, धड मोठे नाही. त्यामुळे पालक आणि मुले दोघेही संभ्रमात असतात आणि त्यामुळे या पालकांचे वयातील मुलांशी एक प्रकारचे कटुतेचे नाते निर्माण होते आणि याचे मुख्य कारण म्हणजे पाल्यामध्ये होणारे बदल स्वीकारण्याची पालकांची मनापासून तयारी नसते. मुलींच्या बाबतीत हा स्वीकार होतो की मुलगी वयात येते आहे; पण तिची वर्तणूक अजिबात मान्य नसते त्यामुळे पूर्वीच्याच समजाप्रमाणे मुलीला लैंगितेच्या विळख्यातून सोडवले पाहिजे या वयात जपले पाहिजे असाच कल पालकांचा दिसतो. <br />
<br />
आजच्या पिढीला सर्व तांत्रिक सोयीसुविधा मिळतात, बंधने कमी झाली आहेत, भरपूर स्वातंत्र्यही दिले जाते. याबद्दल "आम्हाला हे सर्व काहीही मिळत नव्हेत आणि या मुलांना मिळते आहे त्याचा ते गैरवापर करत आहेत' असा आरोप या मुलांवर सहजपणे होतो. खरे पाहायला गेलो, तर यामध्ये या मुलांचा काय दोष आहे? किंवा त्यांच्यात जे बदल होतात आणि त्यातून त्यांची वागणूक होते ती जाणून बुजूनच केली जाते असाही पालकांचा गैरसमज होतो. या बदलांशी जुळवून घेणे आणि त्याप्रमाणे स्वतःची प्रतिमा सांभाळणे ही या मुलांच्या दृष्टिकोनातून तारेवरची कसरत असते. त्यामुळे पौगंडावस्थेतील मुलांचे पालकत्व हे आणखी अवघड होऊन बसले आहे. पालकत्वाचा बाऊ होऊन बसला आहे. <br />
<br />
मुलांची नैसर्गिक वाढ मान्य करून पाल्याला नैसर्गिकरीत्या वाढू देणे आणि पालक म्हणून स्वतःवर विश्वािस ठेवून चुकत शिकतच पालकत्व निभावण्यात आनंद आहे, हे आजचा पालकवर्ग हे विसरून गेला आहे. पूर्वीचे आणि आजचे पालकत्व यात निश्चिपतच मोठा बदल झालेला आहे; पण आजकालचे पालक पूर्वीच्या पालकत्वाची तुलना करून मुलांना त्याची जेव्हा जाणीव देतात तेव्हा मुले संभ्रमात पडतात की, त्याचा संदर्भ देणे खरच उचित आहे का? पूर्वीच्या पालकत्वाचे काही फायदे जरूर करून घेणे आवश्यलक आहे; पण त्याचबरोबर पिढीनुसार झालेले बदलही स्वीकारणे तितकेच गरजेचे आहे. आज पालकत्व निभावण्यासाठी काय करणे गरजेचे आहे हे समुपदेशनाद्वारे समजून घेणे गरजेचे आहे. <br />
<br />
शुभांगी खासनीस, प्रसन्न रबडे<br />
</b>Anonymoushttp://www.blogger.com/profile/07785008605705105955noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3223166446058544329.post-75214346317978346522011-08-09T12:16:00.000+05:302011-08-09T12:16:36.212+05:30आदर्श पालक<b>१.पालकत्वाची व्याख्या : जो स्वतःच्या मुलाला त्याच्यातील दोष घालवून त्याच्यात सद्गुण आणण्यासाठी साहाय्य करतो, तोच खरा पालक. सध्याची पालकाची व्याख्या काय ? जास्तीतजास्त महागडे कपडे घेणे, त्यांना हवे ते खायला देणे आणि महागड्या शिकवणीवर्गाला पाठवले की, यांचे कर्तव्य संपले. याने आपण आपल्या मुलाला भोगी बनवत आहोत. भोगाच्या आधाराने अनेक विकार जन्म घेतात. भोगी व्यक्ती अनेक दोषांना जन्म देते. तर त्यागी व्यक्ती सद्गुणांना जन्म देते. तेव्हा पालकांनी अंतर्मुख होऊन विचार करायला हवा की, मी मुलाला खरोखरीचे शिक्षण देत आहे का ? ‘एखाद्या जिवाला सद्गुणी करून त्याचे जीवन आनंदी करणे’, हाच पालकाचा धर्म आहे.<br />
<br />
२. आनंदी पालकच आनंदी पिढी घडवू शकत असणे : आनंदी पालकच आनंदी पिढी घडवू शकतो. पाल्यावर संस्कार करण्यासाठी पालक आणि पाल्य यांच्यात सुसंवाद असायला हवा. स्वतः तणावमुक्त असलेले पालकच आपल्या मुलांना तणावमुक्त जीवन जगायला शिकवू शकतात. आपल्या पाल्याशी सुसंवाद साधू शकतात. मुलांना तणावात असणार्याा पालकांशी संवाद करावासा वाटत नाही. त्यांना सुचणार्याक नवीन कल्पना, विचार आणि स्वतःच्या समस्या तणावग्रस्त असणार्यात पालकाला सांगाव्याशा वाटत नाही; म्हणून प्रथम पालक स्वतः तणावमुक्त असायला हवा.<br />
<br />
३. पालकांच्या मनावर ताण येण्यामागील कारणे <br />
<br />
३ अ. सतत भूतकाळात रहाणे : सतत भूतकाळात वावरणारे पालक मुलांशी संवाद साधू शकत नाहीत. मुले सतत वर्तमानकाळात जगतात; म्हणून ती सतत आनंदी असतात. आपण आपल्या जीवनात घडलेले अनेक प्रसंग आणि घटना सतत आठवत रहातो. ‘शेजार्याीशी घडलेला प्रसंग’, ‘सासूबाई वाईट बोलल्या’, ‘कार्यालयात अधिकारी बोलले’, या विचारांचे ओझे बहुतेकजण वहात असतात. सहाजिकच मुले काही सांगत असतील, तर आपण त्यांचे विचार ऐकण्याच्या स्थितीत नसतो. तेव्हा आपण सतत वर्तमानकाळात रहायला शिकले पाहिजे. आपण भूतकाळाच्या विचारात वावरत असल्याने मुले आणि आपण यांच्यात सुसंवाद होऊ शकत नाही.<br />
<br />
३ आ. नकारात्मक बोलणे : ‘तुला काही येत नाही, तुझा काही उपयोग नाही’, अशा नकारात्मक बोलण्याने मुलांच्या मनावर घाव होतात. एक वेळ स्थूलदेहावर केलेले घाव भरून निघतात; पण जिवाच्या मनावर झालेले घाव आपण भरून काढू शकत नाही. तेव्हा मुलांशी बोलतांना सतत सकारात्मक बोलायला हवे. आपल्या बोलण्यातून मुलांना प्रोत्साहन मिळायला हवे.<br />
<br />
३ इ. स्वतःच्या चुका मुलांसमोर मान्य न करणे : स्वतःच्या चुका मान्य केल्याने मनावरचा ताण अल्प होतो. मुलांच्या मनात आपल्याविषयी आदराचे स्थान निर्माण होते. आपले पाहून मुलेही प्रामाणिकपणे चुका मान्य करायला शिकतात. आपण चूक लपवली, तर प्रथम आपल्या मनावर ताण येतो. मुलांना आपल्या सर्व चुका कळतात. ‘बाबा आणि आई स्वतःच्या चुका मान्य करत नाहीत, मग मी का कराव्यात’, असे त्यांना वाटू लागते. त्यामुळे पालक आणि मुले यांच्यात सूक्ष्म-दरी निर्माण होते.<br />
<br />
३ ई. मुलांचे सतत दोष पहाणे : मुलांमधील दोष सतत पाहिल्याने आपल्या मनावर ताण येतो. आपण मुलांचे गुण पहावेत आणि त्यांचे कौतुक करावे. पर्यायाने मुले स्वतःचे दोष स्वीकारून ते घालवण्यासाठी प्रयत्न करतात; पण बरेच पालक मुलांना सतत दोषच दाखवतात. ‘मुलांचे सतत दोषच पहाणे - तणाव आणि मुलांचे सतत गुण पहाणे - आनंद’, हे सूत्र आचरणात आणले, तर ताण न्यून होण्यास साहाय्य होते.<br />
<br />
३ उ. स्वतःची प्रतिमा जपत बोलणे : पालक व्यवहारातील त्यांच्या पदाला चिकटून बोलतात. ते स्वतःला विसरत नाहीत. ‘मी आधुनिक वैद्य आहे’, ‘मी अभियंता आहे’ किंवा ‘मी अधिकारी आहे’, ही प्रतिमा जागृत ठेवून बोलण्याने पालक आणि मुले यांच्यात सुसंवाद कदापी होणार नाही. उलट पालकांना ताण येतो आणि मुले ऐकत नाहीत. ‘पालक’ या भूमिकेत येऊन मुलांशी सहजतेने बोलायला हवे. ‘व्यवहारातील प्रतिमा ठेवून बोलणे - ताण आणि मुलांचा पालक म्हणून बोलणे - आनंद’, हे सूत्र लक्षात ठेवायला हवे.<br />
<br />
३ ऊ. अधिकारवाणीने बोलणे : आपण मुलांशी बोलतांना अधिकारवाणीने बोललो, तर त्यांना ताण येतो. मुलांना आपले बोलणे आवडत नाही. अधिकारापेक्षा आपण त्यांच्याशी प्रेमाने बोलायला हवे. आपणाला स्वतःलाही कोणी एखादी गोष्ट अधिकारवाणीने सांगितली, तर ती स्वीकारावीशी वाटत नाही. तसेच हे आहे. ‘आधिकारवाणीने बोलणे - तणाव आणि प्रेमाने बोलणे - आनंद’, हे सूत्र आचरणात आणायला हवे.<br />
<br />
३ ए. ‘मुलांमध्ये ईश्वरीतत्त्व आहे’, असा विचार न करणे : ‘प्रत्येक मुलात देव आहे’, याची जाणीव ठेवून संवाद साधायला हवा. मुलातील ईश्वरी तत्त्वाचा आदर करूनच बोलावे. मी ‘व्यक्तीशी बोलत नसून तत्त्वाशी बोलत आहे’, असा सतत विचार केला, तर मुलांशी सहज संवाद होईल आणि तणाव दूर होईल. त्यासाठी ‘व्यक्ती म्हणून बोलणे - तणाव आणि ईश्वरी तत्त्वाशी बोलणे - आनंद’, या सूत्राकडे सतत लक्ष ठेवायला हवे.<br />
<br />
३ ऐ. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’, हे तत्त्व समजून व्यवहार न करणे : पालकांनो, व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. आपल्या मुलाची प्रकृती कोणती आहे, त्याची आवड, कुवत, शारीरिक आणि मानसिक क्षमता या सर्वांचा विचार पालकांनी करायला हवा. स्पर्धावृत्ती आणि समाजातील स्वतःची प्रतिमा यांनुसार काही पालक मुलांशी व्यवहार करतात. पर्यायाने मुले आणि पालक यांच्यात तणाव निर्माण होतो. असे होऊ नये, याकरिता ‘मुलाची प्रकृती समजून संवाद - आनंद आणि मुलाची प्रकृती समजून न घेता संवाद - तणाव’, हे सूत्र लक्षात ठेवणे आवश्यक आहे.<br />
<br />
३ ओ. समजावून न सांगणे : मुलांना प्रत्येक गोष्ट समजावूनच सांगावी. सम म्हणजे मुलांच्या स्तराला जाऊन सांगणे. मुलगा पहिलीत असेल, तर पालकांनी त्याच्या स्तराला येऊन संवाद साधावा. यामुळे मुले आपले ऐकतात; पण पालक स्वतःच्याच स्तरावर रहातात. त्यामुळे मुले ऐकत नाहीत. पालकांच्या अहंकारामुळे असे घडते. ‘मुलांच्या स्तराला येऊन बोलणे - आनंद आणि स्वतःच्या स्तराला राहून बोलणे - तणाव’, हे सूत्र आचरणात आणले, तर तणाव न्यून होतो.<br />
<br />
३ औ. मुलांशी संवाद नसणे : सध्या मुलांच्या समस्या ऐकून घेणारे कोणीच नसते. पालक म्हणतात, ‘आम्हाला कामे आहेत’, तर शिक्षक म्हणतात, ‘आम्हाला आमचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे.’ पर्यायाने आज मुलांची फार मोठी मानसिक कोंडी झाली आहे. त्यामुळे पालकांविषयी मुलांच्या मनात आदर आणि विश्वास राहिला नाही. मग मुले ऐकत नाहीत; म्हणून पालकांच्या मनावर ताण येतो. अनौपचारिक बोलल्यामुळे मने जुळतात. याकरिता मुलांशी प्रतिदिन १५ मिनिटे अनौपचारिक बोलणे आवश्यक आहे. यातून मुले मोकळी होतात. ‘प्रतिदिन मुलांशी १५ मिनिटांचे अनौपचारिक बोलणे - आनंद आणि प्रतिदिन अनौपचारिक बैठक नसणे - तणाव’, हे सूत्र लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागल्यास पालक मुलांशी चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतात.<br />
<br />
३ अं. अपेक्षा करणे : आपण मुलांकडून अपेक्षा ठेवून व्यवहार करत असू, तर मुलांना आपले बोलणे आवडत नाही. त्यांच्यात अहं अल्प असल्यामुळे त्यांना अपेक्षेची स्पंदने कळतात. आपण निरपेक्षपणे त्यांच्याशी व्यवहार करावा. जेथे निरपेक्षता आहे, तेथेच प्रेम आहे. ‘म्हातारपणी मुलगा माझा सांभाळ करील. समाजातील माझी पत टिकविल आणि वाढविल’, अशी अपेक्षा करण्यापेक्षा ‘देव माझा सांभाळ करील’, असा विचार करणे योग्य ठरेल; कारण ‘अपेक्षा करून व्यवहार - तणाव आणि निरपेक्षपणे व्यवहार - आनंद.’<br />
<br />
पालकांनो, वरील सर्व सूत्रे कृतीत आणल्यानंतर आपण आनंदी होऊ. पर्यायाने आपण सुसंस्कारित पिढी घडवू शकू. ही सर्व सूत्रे कृतीत आणण्यासाठी आपण कुलदेवतेची उपासना करायला हवी. (उपासना सांगावी.)<br />
<br />
</b> - श्री. राजेंद्र पावसकर, पनवेल<br />
<br />
Anonymoushttp://www.blogger.com/profile/07785008605705105955noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-3223166446058544329.post-56023844404885489092011-04-11T17:54:00.000+05:302011-04-11T17:54:30.275+05:30आपले मुल<b>मुलांवर सतत टीका केली तर दोष द्यायला शिकतील<br />
<br />
मुलांला वैरभावात राहावे लागले तर ते भाडायला शिकेल<br />
<br />
मुल भीतीदायक वातावरणात राहिले तर ते भयभीत व्हायला शिकेल<br />
<br />
मुल दयेवर जगले तर ते स्वत:बद्दल दु:ख करायला शिकेल<br />
<br />
मुल मत्सरी परिवेशात वाढले तर ते अपराधी व्हायला शिकेल<br />
<br />
मुलाला उतेजन दिले तर ते आत्मविश्वास शिकेल<br />
<br />
मुलाला सहिष्णुता मिळाली तर ते सोशिकपणा शिकेल<br />
<br />
मुलाची स्तुती केली तर ते मर्मज्ञता शिकेल<br />
<br />
मुलाला स्वीकाराचे वातावरण लाभले तर त एप्रेम करायला शिकेल<br />
<br />
मुलाला पसंती दर्शवली तर ते स्वत:च स्वताला आवडू लागेल<br />
<br />
मुलांना जर ओळख प्राप्त करून दिली तर ते ध्येय बाळगायला शिकेल<br />
<br />
मुलांना जर न्याय दिला तर ते न्याय करायला शिकेल<br />
<br />
मुल जर प्रामाणीकपणा अनुभवेल तर ते खरे पणा शिकेल<br />
<br />
मुल जर सुरक्षितता अनुभवेल तर ते स्वत: मध्ये व इतरांवर विश्वास ठेवायला शिकेल<br />
<br />
मुल जर मैत्रीपूर्ण वातावरणात राहिले तर ते जगातील चांगुलपणावर विश्वास ठेवायला शिकेल </b>Anonymoushttp://www.blogger.com/profile/07785008605705105955noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3223166446058544329.post-80945543029959459352011-02-21T15:16:00.000+05:302011-02-21T15:16:05.073+05:30आपण पालकांनी , सुसंस्कारीत पिढी घडवायला हवि<b></b>आपले मूल सुसंस्कारित व्हावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते; मात्र त्यासाठी त्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्नत करणे, हे त्यांचे कर्तव्य ठरते. आपल्या मुलावर सुसंस्कार करतांना आपण भारताचा भावी नागरिक घडवत आहोत, असा व्यापक दृष्टीकोन प्रत्येक पालकाने ठेवायला हवा ! त्यामुळे केवळ आपल्या मुलावर संस्कार करणे, एवढेच त्यांचे संकुचित ध्येय उरणार नाही, तर राष्ट्रउभारणीसाठी अप्रत्यक्षरीत्या केलेले ते प्रयत्नएच ठरतील ! प्रत्येक मुलाच्या आयुष्यात त्याचे आई-वडील हे सर्वांत पहिले व महत्त्वाचे शिक्षक असतात. एकमेकांवर प्रेम करण्यास आणि एकमेकांशी जमवून घेण्यास प्रथम आई-वडीलच मुलाला शिकवतात. लहापणापासून मुलाला प्रोत्साहन दिले, तर कोणतीही गोष्ट हाताळण्यास ते पटकन शिकते. मुलाला चमच्याने कसे जेवावे इथपासून मलमूत्रविसर्जनानंतर स्वच्छता कशी पाळावी, येथपर्यंत सारे पालक शिकवतात. लहान मुलांना गोष्टी वाचून दाखवल्याने त्यांना वाचनाची आवड निर्माण होते. मुले अनुकरणप्रिय असल्याने पालकांनी जोपासलेल्या छंदांचे ज्ञान त्यांना आपसूक होते. <br />
<br />
आदर्श जीवनाचे तत्त्वज्ञान मुलांना शिकवायला हवे !<br />
<br />
अडीअडचणीच्या वेळी कोणावर किती विश्वा स ठेवायचा याचे ज्ञानही मुलांना त्यांचे पालक देऊ शकतात. जिवनातील वेगवेगळया प्रसंगांना कसे तोंड द्यावे, हे पालक त्यांना सांगू शकतात. कोणत्या परिस्थितीत कसे वागावे, हे पालकांनी मुलांना सांगायला हवे. जीवनाचे ध्येय, जीवनाचे आदर्श हे सारे पालकांनी जबाबदारीने व विचारपूर्वक मुलांसमोर मांडायला हवे आणि मुलांनी त्याच्या दिशेने करावयाच्या वाटचालीच्या संदर्भात त्यांना मार्गदर्शनही करायला हवे. या वेळी त्यांना काय योग्य व काय अयोग्य हे नेमकेपणाने सांगायला हवे; मात्र त्यांची मते त्यांच्यावर लादता कामा नयेत. त्यांचे निर्णय त्यांना घेण्याची मुभा जरूर द्यावी; मात्र पालकांनी सांगितलेल्या योग्य-अयोग्याच्या संकल्पना या एवढ्या स्पष्ट स्वरूपात त्याच्या मनावर बिंबायला हव्यात की मुलाने गैरवर्तन करताच कामा नये ! थोडक्यात पालकांनी आदर्श जीवनाचे तत्त्वज्ञान त्यांना शिकवायला हवे. मुलांच्या आयुष्याला दिशा देणारा तात्त्विक मुद्दा असू दे किंवा त्यांना शिकवायच्या छोट्या-मोठ्या सवयी असू दे, हे सारे संस्कार धार्मिकतेच्या पायावरीलच हवेत. हल्लीच्या बहुतांश पालकांचे स्वत:चे जीवनविषयक तत्त्वज्ञान हेच पाश्चात्त्य संस्कृतीवर आधारलेले व चंगळवादी बनलेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मुलांवरही त्याच विचारांचे व कृतींचे संस्कार केले जातात. <br />
<br />
अधिक गुण, गुणांची स्पर्धा, त्यांच्या प्रत्येक गोष्टीची स्पर्धा, पैसा, त्यासाठी करियर हा पालकांचा मुलांच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन झाला आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण व स्वसंस्कृतीचे विस्मरण यामुळे सध्याची लाडकी मुले `ऐकत नाहीत' असेच चित्र बहुतांश बघायला मिळते. यासाठी पालक त्यांना जास्तीतजास्त विविध छंद आणि शिकवणीवर्गांना घालून व्यस्त ठेवण्याच्या मागे असतात. त्यांच्यावर सुसंस्कार व्हावेत, अशी बहुतांश सुशिक्षित पालकांची मनापासून इच्छा असते. मात्र अशा स्थितीत नेमके काय करावे, हे त्यांनाही कळत नसते. <br />
<br />
आपण पालकांनी , सुसंस्कारीत पिढी घडवायला हवि <br />
<br />
हे सुसंस्कार होणार कसे ? मुले सदवर्तनी होण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे पालकांनी स्वत: सद्वर्तनी असायला हवे आणि दुसरे म्हणजे त्यांना शिस्त लावण्याच्या जोडीला आपण हि काही गोष्टी टाळायला हव्यात , <br />
१. मुलांसमोर शक्यतो व्यसन नको (बिडी,सिगरेट ,तंबाखु .गुटखा ,दारू )<br />
<br />
२. कोणत्याही कारणस्तव लहान मुलांसमोर खोटे बोलणे नको<br />
<br />
३. आई -वडील किवा घरातील इतर वडीलधाऱ्या मंडळी मध्ये वाद नकोत , त्याचे मुलावर फार वाईट परिणाम होतात , मुले एक्क्लकोणी होणे ,बोटे चोखणे , घाबरून अबोल होणे हे सगळे त्याचेच परिणाम आहेत.<br />
<br />
४. शक्यतो घरात जेवताना सर्वांनी एकदा तरी एकत्र जेवण घ्यावे लहान मुलांन पण घेऊन बसावे आणि जेवतात टीव्ही टाळावाच . छान गप्पा गोष्टी करत जेवण घ्यावे.<br />
<br />
५.आजच्या तारखेला मुंबई सारख्या मेट्रो सिटी मधली सर्वांत मोठी समस्या म्हणजे "वेळ" आपण आपल्या रुटीन मधला किती वेळ मुलांना देतो. २४ तासातील रोज थोडा वेळ तरी फक्त आपल्या मुलांसोबत घालवता आला पाहिजे <br />
<br />
साधनेचे किंवा उपासनेचे पाठबळ असेल, तर मुलांमध्ये सद्गुण चटकन अंगी बाणतात. हट्टी किंवा न ऐकणार्या मुलांना बदलण्याची शक्ती ही भगवंताच्या नामात आहे आणि याचा अनुभव कित्येकांनी घेतला आहे. प्रथम पालकांनी भक्तीचे बीज स्वत:त पेरायला हवे, मगच ते बीज आपल्या मुलात निर्माण होणार. `वाल्याचा वाल्मिकी झाला' अशा गोष्टी आपण सांगतो. म्हणजेच भगवंताच्या नामातच मुलांमध्ये अमूलाग्र बदल करण्याची क्षमता आहे, याची जाणीव आपण सर्व पालकांनी ठेवली पाहिजे<b></b>Anonymoushttp://www.blogger.com/profile/07785008605705105955noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3223166446058544329.post-101093369984736372011-02-16T17:33:00.000+05:302011-02-16T17:33:23.331+05:30संस्कार - कालचे आणि आजचे<b>मुलांना संस्कार नाहीत, ते देण्यात आई वडील कमी पडतात, विभक्त कुटुंब पद्धती, घरात आजी आजोबांचे नसणे .... ह्या आणि अश्या अनेक कारणांचे खापर आजच्या पिढीवर फोडल्या जात. <br />
मुलांना संस्कार देण्याची जबाबदारी आधी आई वडिलांची, मग शिक्षकांची आहे हे पिढ्यानपिढ्या आपण गुहीत धरत आलो आहोत. एखादा मुलगा वडीलधारयाशी वाद घालताना दिसला किंवा मुलगी एखाद्या मुलाबरोबर फिरताना दिसली कि आई वडिलांचा उद्धार आज हि होताना दिसतो.<br />
<br />
पंधरा वीस वर्षापूर्वीपर्यंतची परिस्थिती साधारण पणे अशी होती. मुल जन्माला आल्यानंतर आईच्या जवळच असायचं, त्या नंतर हळूहळू त्याच्या विश्वाच्या कक्षा रुंदावून त्यात वडील, भावंड, आजी आजोबा ह्यांचा समावेश होत असे. मुल शाळेत जाई पर्यंत त्याचं विश्व, हे फक्त त्याच कुटुंबच होत. त्यामुळे आईवडील आणि आजी आजोबा जे सांगतील ते आणि तेच बरोबर, हा विश्वास आपोआप त्या मुलामध्ये रुजायचा. आज मुल जन्माला येत आईच्या कुशीत पण वाढत आयाच्या मांडीवर किंवा पाळणाघरात. त्याला नजर येते ती टीव्ही वरची गाणी बघता बघता. टीव्ही वर कार्टून लागलं नसेल तर ते दुध पीत नाही. हातात पेन्सील धरता येत नसली तरी रिमोट ची बटण बरोबर दाबून हवं ते च्यानल लावता येत. रांगणारी मुल सुद्धा खुळखुळ्या ऐवजी मोबाईल शी खेळण पसंत करतात. आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे आपण ह्याच कौतुक सुद्धा करतो. <br />
<br />
घरात रोज देवा जवळ दिवा लावल्या जात होता, शुभंकरोती आणि रामरक्षा आजी म्हणत असे ती आपसूक मुल आत्मसात करत होती. देवानंतर पहिला नमस्कार आईवडिलांना, हे आजीने शिकवलं त्यातून देवा नंतर च स्थान आई वडिलांचं हे कोणी न सांगताच मनावर कोरल्या जात होतं. मुल शाळेत जाई पर्यंत हा संस्कारांचा पाया मजबूत होत होता. घरातल्या व्यक्तीबद्दल चा आदर आणि विश्वास त्याचा आत्मविश्वास वाढवत होता. आज घरामध्ये आई वडील भाऊ बहिण आजी आजोबा ह्यांच्या बरोबर टीव्ही मालिका मधली characters , त्यातले भडकपणे दाखवल्या जाणारे प्रसंग हे सुद्धा त्या बालमनावर संस्कार करतात. <br />
<br />
पूर्वी, घरात आईने एक आणि आजीने दुसरं सांगितला तर कोणतं स्वीकारायच ह्या संभ्रमात मुलं बावचळून जात होती. मग आता चाहु बाजूने चार अतिशय भिन्न संस्कार त्यांच्यावर घडले तर ते किती गोंधळून जात असतील? नोकरी करणारे आईवडील त्यांना जेवढा वेळ देवू शकतात त्याही पेक्षा हे टीव्ही आणि कॉम्पुटर त्यांची जास्ती सोबत करतो. घरातल्या वडील मंडळींकडून कितीही सात्विक संस्कार मिळाले तरी ह्या माध्यमातला चमचमीतपणा त्याला आकर्षित करणारच. मग आई वडील यांच्या पेक्षा ते ह्या यंत्रांवर विश्वास ठेवतात. <br />
<br />
पूर्वी सकाळची न्याहारी आणि रात्रीच जेवण हे संपूर्ण कुटुंब एकत्र करत असत. त्यामुळे पंक्ती प्रपंच, वाढलेले पदार्थ न टाकता सगळे संपवणे, अन्नाचा मान राखणे, हे जेवताना अपेक्षित असलेल वळण, वेगळं लावाव लागत नव्हत.पूर्वी वडील संध्याकाळी घरी आले, कि संध्याकाळी नाष्टा चहा होत असे आणि रात्री सगळेजण एकत्र येवून, गप्पा मारत, मजेत जेवण होत असत. आता नोकरीच्या वेळा बदलल्या. आई वडील घरी पोचेपर्यंत जेवणाची वेळ टाळून गेली असेल तर मुलं आपल्याच हातानी फक्त आवडेल तेच पदार्थ वाढून टीव्ही समोर बसून जेवतात. ह्यात त्या गृहिणीचा हि दोष नाही किंवा मुलांचा तर अजिबात नाही. आज एकतरी घर असं आहे, कि जिथे टीव्ही नाही? टीव्ही कॉम्पुटर ह्या आता गरजेच्या वस्तू झाल्या आहेत. <br />
<br />
घरी वडीलधारया माणसांचा आदर ठेवावा आणि तोच विश्वास शिक्षकांवर ठेवावा हि शिकवण घरातून मिळत होती. सगळेच शिक्षक उत्कृष्ट शिकवत होते असा त्याही काळी नव्हत पण शिक्षकांचं स्थान पूजनीय होत. त्यांच्या शिक्षकी पेश्यामध्ये पुस्तकी ज्ञान देण्याबरोबर समाज घडवण्याची जबाबदारी सुद्धा गृहीत धरली होती. मुलाला शाळेत घातलं कि त्या मुलाच आयुष्य घडवण्याची जबाबदारी शिक्षक स्वीकारत होते. <br />
आज मुळात शिक्षकी पेशा आवडीने आणि त्यातली जबाबदारी समजून तो स्विकारणारे शिक्षक दुर्मिळ झाले आहेत. त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट अशी कि पूर्वी ज्ञान मिळण्याचा एकमेव आधार हा शिक्षक होता. आज संगणक तंत्रज्ञान इतकं पुढे गेलं आहे कि मुलांना हवी ती माहिती एका 'click ' वर मिळते. <br />
<br />
पूर्वी मनातला कोणताही प्रश्न वडीलधाऱ्या व्यक्तीला विचारला कि मिळेल ते उत्तर बरोबरच आहे असा गृहीत धरून मुलं ते आत्मसात करत होती. त्या विरुध्द बोलण्याची मुलांची हिम्मत नव्हती आणि वडीलधार्या माणसाना सुद्धा तो अपमान वाटत असे. आज मुलं मोकळेपणी चर्चा करतात, विचारतात, पण त्यानंतर गुगल वर जावून पडताळून बघतात. तुमच उत्तर जर त्या उत्तराशी समन्वय साधणार नसेल तर ते तुम्हाला स्पष्ट पणे सांगायला मागे पुढे बघत नाहीत. पण त्या मागचा त्यांचा हेतू तुमचा अपमान करण्याचा नसतो.<br />
<br />
पूर्वी दोन पिढ्यांमध्ये साधारणपणे २० वर्षाच अन्तर असत असं म्हणाल्या जायचं. आता ते पाचच वर्ष झालं आहे. म्हणजे आपल्या मध्ये आणि आपल्या मुलांमध्ये साधारणपणे चार पिढ्यांचं अंतर पडत. हि ग्याप कमी करण्यासाठी आपण थोडं जोरात धावायचं कि मुलांना मागे ओढायच? आपण दोन पावलं पुढे गेलो तर मुलं मागे वळून तरी नक्कीच बघतील.<br />
</b>Anonymoushttp://www.blogger.com/profile/07785008605705105955noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3223166446058544329.post-26837701872382978932010-12-10T15:57:00.000+05:302013-08-21T15:59:28.447+05:30टीव्ही नावाचा सैतान<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhMf3RSNxsVA5twO2D_L1JYnqPItHQLUEAU-lDOEFTm25bybK7YUUCTPOslkoCrYiRzNVRapturI8EmtpWhsxk7EZ8EkdzKKWKi8NxIh9qmXR4S3wzfvFDkyHa-jK_S62gxbf-HVjGSXLg/s1600/TV.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhMf3RSNxsVA5twO2D_L1JYnqPItHQLUEAU-lDOEFTm25bybK7YUUCTPOslkoCrYiRzNVRapturI8EmtpWhsxk7EZ8EkdzKKWKi8NxIh9qmXR4S3wzfvFDkyHa-jK_S62gxbf-HVjGSXLg/s1600/TV.jpg" /></a></div>
<br />
<br />
<br />
*<b> माझी मुलगी सात वर्षांची आहे. सध्या सुट्टी सुरू झाल्यापासून तिचा एकच उद्योग असतो, टीव्ही बघणं. सकाळपासून रात्रीपर्यंत जवळजवळ सहा तास ती <br />
<br />
टीव्हीच बघते. टीव्ही बंद केला, की जोराजोराने आरडाओरडा करते... आदळआपट करते. नाइलाजाने तिला टीव्ही बघू द्यावाच लागतो. तिचं जेवणही तिथेच चालतं. आम्हाला असहाय्य वाटतं. तिचं टीव्ही पाहणं आम्ही कसं थांबवू? <br />
<br />
पहिली गोष्ट म्हणजे त्यातला 'नाइलाजाचा', 'असहाय्यतेचा' भाग तुम्हाला वजा करावा लागेल. स्वत:च्या असहाय्यतेकडे तुम्ही पाहिलंत, तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही तिच्या हट्टाला घाबरताय आणि त्यालाच 'नाइलाज' आणि 'असहाय्यता' म्हणताय. काही बाबतीत तुम्ही खंबीर असणं गरजेचं आहे. मुलांची ऊर्जा सक्रियतेने वापरली जाणं महत्त्वाचं असतं. नाहीतर ती आळसावतात आणि निष्क्रिय बनतात. पालकांनी मुलांना दिलेला वेळ ही मुलांसाठी पर्वणी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची गुंतवणूक असते. तुमच्या मुलीला तुमचा वेळ वेगळया तऱ्हेने मिळणं आवश्यक आहे. जर तुम्ही तिच्याशी खेळलात, तिच्याशी गप्पा मारल्यात, तिला ज्या गोष्टीत रस आहे त्या गोष्टी करायला तिला जास्त वाव दिलात, तर तिची ऊर्जा विधायक दिशेने वळेल. आपोआपच टीव्ही बघण्यासारख्या निष्क्रिय कामासाठी तिच्याकडे कमी ऊर्जा शिल्लक राहील. त्यातून तुमचं आणि तिचं नातंही निरोगी होईल. तुम्हाला तिचा टीव्ही 'थांबवायचा' नाही तर टीव्हीला चांगले पर्याय निर्माण करायचे आहेत, ज्यामुळे तिची टीव्हीची गरज कमी होईल. हे करण्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील व्हावं लागेल. तिच्यात बदल होईपर्यंत धीर धरावा लागेल आणि मुख्य हणजे तिच्या आक्रस्ताळ्या तंत्रांना बळी पडणं थांबवावं लागेल.</b><br />
<b><br /></b>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh-nz-Sgn3TkdgF9xUq5MskhQ9RS3nivDI-PGqV1MnMjONQn_N73oj1x9d5JRwQNFENM7WNeONQCYpbcTBR9m9wOWmSFpbO81KNjo00PtWl_qDwpx0eAGfD6G_EfGRa8e4ITBr5dCWv-tE/s1600/TV+1.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh-nz-Sgn3TkdgF9xUq5MskhQ9RS3nivDI-PGqV1MnMjONQn_N73oj1x9d5JRwQNFENM7WNeONQCYpbcTBR9m9wOWmSFpbO81KNjo00PtWl_qDwpx0eAGfD6G_EfGRa8e4ITBr5dCWv-tE/s1600/TV+1.jpg" /></a></div>
<b><br />
<br />
</b><br />
<b>* माझा मुलगा चार वर्षांचा आहे आणि मुलगी दोन वर्षांची आहे. त्यांना आम्ही शक्यतो टीव्हीपासून लांब ठेवतो. टीव्ही ही आम्हाला पुढे जाऊन त्यांच्यासाठी समस्या व्हायला नकोय. आम्ही काय खबरदारी घेऊ? <br />
<br />
तुम्ही या गोष्टीकडे जाणीवपूर्वक पाहिल्याबद्दल तुमचं अभिनंदन! तुम्हाला अभिप्रेत असलेल्या 'खबरदारी'बद्दल अमेरिकन बालरोगतज्ज्ञांच्या परिषदेने काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. त्या सांगतो, टीव्हीला घराच्या सजावटीत सर्वात मध्यवतीर् स्थान नसावं. टीव्ही बेडरूममध्ये नसावा. टीव्हीवरचे कुठले कार्यक्रम मुलांनी बघावेत, हे पालकांनी ठरवावं. (सध्याचे आपल्याकडचे टीव्हीवरचे कार्यक्रम विचारात घेता ही निवड सुज्ञ पालकांसाठी फारच सोपी आहे. निदान ९० टक्के कार्यक्रम आपोआप बाद होतील!). मुलांनी टीव्ही किती वेळ बघावा, हेही महत्त्वाचं आहे. लहान मुलं जितका कमी बघतील तितकं चांगलं! मोठ्या मुलांसाठी शाळेच्या दिवशी जास्तीत जास्त एक तास आणि सुटीच्या दिवशी दोन तास (यात कम्प्युटर गेम्स, व्हिडीयो गेम्स हे सर्व आलं.). टीव्हीवरच्या आवडत्या कार्यक्रमांनुसार वेळेचं नियोजन करावं, आपल्याला वेळ आहे म्हणून टीव्ही लावलाय असं होऊ नये. गृहपाठ, खेळ या महत्त्वाच्या कार्यक्रमांनंतरच मुलांनी टीव्ही बघावा. झोपाण्याआधी निदान दोन तास तरी टीव्ही बंद होणं आवश्यक आहे. नाहीतर झोपेवर विपरीत परिणाम होतो. जेवताना (किंवा जेवण्यासाठी लालूच म्हणून) टीव्ही लावून देऊ नये. मुलांबरोबर पालकांनी काही कार्यक्रम बघावेत आणि त्या कार्यक्रमांविषयी मुलांशी चर्चा करावी. यामुळे मुलं कार्यक्रमातून काय घेतात हे कळतं. सर्वांत महत्त्वाचं हेच की पालकांनी स्वत:च्या टीव्ही बघण्याकडे आत्मपरीक्षणात्मक भूमिकेतून बघावं आणि त्यात योग्य ते बदल घडवावेत. आपल्या मुलांबद्दल जाणीवपूर्वक विचार करणाऱ्या पालकांसाठी हे सर्व आचरायला कठीण आहे का, हे तुम्हीच ठरवा. <br />
<br />
- डॉ. मनोज भाटवडेकर, मानसोपचारतज्ज्ञ <br />
</b>Anonymoushttp://www.blogger.com/profile/07785008605705105955noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3223166446058544329.post-70454610593779792672010-12-10T15:51:00.000+05:302010-12-10T15:51:44.234+05:30स्तुती : टॉनिक की विष?नमस्कार,<br />
सुजाण पालकहो ,<br />
आज बरेच दिवसांनी वेळ हि मिळाला आणि तुम्हाला सांगण्यासारखे काही लेख हि छान तो पुढे देत आहे .<br />
<br />
<br />
स्तुती : टॉनिक की विष?<br />
<br />
माझी मुलगी दहा वर्षांची आहे. अभ्यासात तिची फारशी गती नाही. मी आई म्हणून तिला समजून घेऊ शकते. पण, तिचे वडील तिला सतत यावरून बोलत असतात. माझं म्हणणं <br />
<br />
एकच, तिची चित्रकला चांगली आहे, गाणं चांगलं आहे त्याबद्दल तिची प्रशंसा करा. पण, ते ऐकत नाहीत. त्यांच्यासाठी काहीतरी सांगाल का? <br />
<br />
मुलाची आत्मप्रतिमा घडण्यामध्ये आईवडिलांचा खूप मोठा सहभाग असतो. सतत ऐकाव्या लागणाऱ्या टीकेमुळे मुलाची आत्मप्रतिमा नकारात्मक होते. कुठल्याही मुलात काहीतरी चांगलं असतंच. जे चांगलं असतं, त्याचं कौतुक जर पालकांनी केलं तर मुलाचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याची आत्मप्रतिमा सकारात्मक व्हायला मदत होते. त्यामधून ज्या गोष्टी फारशा चांगल्या नाहीत त्यांच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनही बदलायला मदत होते. तुमच्या मुलीमध्ये जे चांगलं आहे त्याला वाव देणं महत्त्वाचं आहे. त्यातून ती खुलेल. तिची मन:स्थिती आनंदी राहील आणि तिचा विकास योग्य दिशेने होईल. <br />
<br />
तिच्या वडिलांना मी हेच सांगेन, की तुमची मुलगी तुमच्या तोंडून आलेले तिच्याबद्दलचे चांगले उद्गार ऐकण्यासाठी आतुरलेली आहे यावर विश्वास ठेवा. तिच्या आयुष्यात आनंद आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तुम्ही निश्चितपणे जबाबदार ठरू शकता. <br />
<br />
द्य माझा मुलगा चार वर्षांचा आहे. त्याने कुठलीही गोष्ट केली, की त्याला त्याच्याबद्दल खूप जास्त स्तुती हवी असते. आम्ही ती करतोही. पण, आम्हाला सतत भिती वाटते, की त्याचीच त्याला सवय लागेल की काय? <br />
<br />
तुमची भिती रास्त आहे. आपण केलेल्या कृत्याची प्रशंसा मुलांनाच काय पण, भल्याभल्यांनाही हवी असते. मुलांच्या कुठल्याही कृत्याबद्दल त्यांची स्तुती केल्यास त्यांना 'आपण केलेलं कृत्य चांगलं होतं' हा संदेश मिळतो. या अथीर् स्तुती एक टॉनिक आहे. पण, स्तुती एखाद्या अंमली पदार्थासारखी असते. तिची चटक लागू शकते. स्तुती आपण कशी करतो आहोत, त्यावर ते अवलंबून असतं. अनेकदा 'तू काय गेट आहेस', 'तुझ्यासारखं कोणी नाही' , 'तुझं अमुक अमुक कसं नेहमीच छान असतं' अशी अवास्तव स्तुती आपण करतो. त्यातून मुलाला आपण नेमकं काय चांगलं केलं ते समजत नाही. 'आपण म्हणजे कुणीतरी सर्वश्रेष्ठ आहोत. आपलं कायम सर्वांनी कौतुकच केलं पाहिजे' ही कल्पना त्याच्या मनात दृढ व्हायला लागते. असं कौतुक नाही मिळालं, की त्याला अंमली पदार्थाची जशी 'विथड्रॉअल्स' येतात तसं काहीसं व्हायला लागतंं. अशा वेळी मुलं चिडचिडी होतात, हट्टी होतात, स्तुती ओरबाडून घ्यायला बघतात आणि अति आत्मकेंदित होतात. म्हणून मुलांची स्तुती करताना जपून करावी! <br />
<br />
मुलाने केलेल्या कृत्यातलं काय आणि कसं चांगलं आहे ते सांगावं. उदा. त्याने काढलेल्या चित्रातली रंगसंगती कशी योग्य आहे, त्यातला जिवंतपणा कसा मनाला आनंद देणारा आहे वगैरे गोष्टी त्याला सांगितल्या तर त्याच्या हे लक्षात येईल, की आपण काढलेलं चित्र छान आहे. त्यासाठी त्याला उगाचच हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याची गरज नाही. स्तुती करताना हे भान ठेवलं तर त्याचे दुष्परिणाम न होता चांगला उपयोग होईल. <br />
<br />
- डॉ. मनोज भाटवडेकर, मानसोपचारतज्ज्ञAnonymoushttp://www.blogger.com/profile/07785008605705105955noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3223166446058544329.post-41561159357457367812010-08-25T14:31:00.000+05:302013-08-21T16:06:08.024+05:30घर मुलांचंघर मुलांचं<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi6-EiDkMtqeDVEajLLhI-WjvP8CVS5uk1eEItY75-QV2heQiByfk19cTggagvJijT0cegu53K9Nhfaj02QzaTVnZHa3UUfbJ5ErwFmpQ0F5Z3o7ScgCA79aOBwCaG7d5A8C_Z2lrxJKps/s1600/kids1.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="288" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi6-EiDkMtqeDVEajLLhI-WjvP8CVS5uk1eEItY75-QV2heQiByfk19cTggagvJijT0cegu53K9Nhfaj02QzaTVnZHa3UUfbJ5ErwFmpQ0F5Z3o7ScgCA79aOBwCaG7d5A8C_Z2lrxJKps/s320/kids1.jpg" width="320" /></a></div>
<br />
हल्ली नवे आई-बाबा हौसेनं फ्लॅट घेतात इंटिरियर डेकोरेटरकडून तो सजवून घेतात. त्यात मुलांची खोली असते, तिथे कपाटं रंगीत, भिंती रंगीत, पलंग रंगीत, बाथरूम रंगीत एवढंच काय छत आणि पंखादेखील रंगीत असतो. ते सगळं पाहून हे मुलांना खरंच आवडत असेल का असा मला प्रश्न पडतो. मुलांना काय आवडावं ते आपण असं कुण्या परक्या माणसाच्या हाती कसं काय सोपवून टाकतो? आणि डेकोरेटर मंडळी कुठली तरी तयार पुस्तकं पाहतात, दाखवतात तो फोटो छान दिसतो म्हणून तशा रचना निवडल्या जातात; पण मला हे सगळं मुळीच `बालकेंद्री' वाटत नाही.<br />
<br />
जसं लहान मुलाला स्वत:च्या हातानं ते जेवायला लागलं की लहान ताट देऊ नये, मोठं ताट द्यावं.कारण ते मूल अन्न सांडतं, उडवतं, पसरतं. तसंच लहान मुलं लोळतात, त्यांना त्यांच्या मापाचा छोटा पलंग कसा चालेल? घरात अभ्यास करतानाही मुलानं त्याच्या छोट्या टेबलावर छोट्या खुर्चीवर अंग आखडून का बसायचं? छोट्या फळयावरच का चित्रं काढायची? लहान मुलांच्या हालचाली कशा जोरदार असतात ती तेवढा हात उंच करतात, भोवताली फेकतात तेवढी चित्रं काढायला जागा त्यांना मिळायला हवी.<br />
<br />
तासाभराच्या शिबिरातसुद्धा आपण पाहिलं तर मुलं कधीच `देवासारखी' मांडी घालून ताठ बसत नाहीत. ती एक पाय दुमडून बसतील, दोन्ही पाय आरामात मागे दुमडून बसतील, पालथी पडतील. त्यांच्या एकेक अवस्था पाहण्याजोग्या असतात. आपण `लाइफ स्टाइल'च्या मागे लागून त्यांना शारीरिक मर्यादा घालतो आहोत का? त्याचे परिणामही दिसत आहेत. मुलं कोलांटी उड्या मारू शकत नाहीत, मुलांची डोकी गुडघ्याला लागत नाहीत, ती सरसर झाडावर चढू शकत नाहीत. घरात हालचालीच्या मर्यादा आणि खाण्यात काहीच मर्यादा नाहीत, दोन्ही कारणं आहेत मुलांचा लवचीकपणा जायला.<br />
घरात सर्वांत काय आवडतं याचं उत्तर अनेक मुलं टीव्ही असं देतात. काहीजण कम्प्यूटर असं देतात. टीव्ही म्हटलं की मुलांची जी टकळी सुरू होते. आपण कधी न ऐकलेल्या अशा अनेक कार्यक्रमांची, मालिकांची, चॅनल्सची, शोज्ची नावं मुलं फटाफट सांगत असतात. कशातलं कुठलं पात्र मस्त असतं ते सांगतात. किती वेळ टीव्ही बघता याचं उत्तर आई ओरडेपर्यंत असं असतं.<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgzphSRiOOidzbmHnGbMrdUm4YzPZfuSH-Q4DulUc82lJt9Xz37lGBJaR6iimxI0HPRAUdbOloevXWSJusolfFQ-bD69vyj3YU2up1sCM5wJrBNtvAywYn79W5qRhVnwelkyp9JBSqg5dU/s1600/kids.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgzphSRiOOidzbmHnGbMrdUm4YzPZfuSH-Q4DulUc82lJt9Xz37lGBJaR6iimxI0HPRAUdbOloevXWSJusolfFQ-bD69vyj3YU2up1sCM5wJrBNtvAywYn79W5qRhVnwelkyp9JBSqg5dU/s320/kids.jpg" width="320" /></a></div>
<br />
घरात कॉम्पुटर वापरणाऱ्या मुलांची संख्याही बरीच आहे. आमच्याकडे पाच कॉम्पुटर आहेत. लॅपटॉपपण आहे, असंही सांगणारी मुलं भेटतायत आणि अनिर्बंध कम्प्यूटर वापरणारी मुलं-मुली आठव्या व नवव्या वर्षी बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंडची भाषा करू लागलीत. त्या नात्यांच्या मानसिक परिणामांना बळी पडू लागलीत. अभ्यासातलं लक्ष उडणं, घरात आई-वडिलांशी सतत वाद होणं, शाळेत जायचा कंटाळा असे अनेक प्रश्न वेगानं निर्माण होऊ लागलेत.<br />
शहरीकरणाच्या रेट्यात, पैशांच्या समृद्धीत, दिवाणखान्याला बळी पडताना, घराचं डेकोरेशन करताना आपण मुलांच्या गरजा किती वेगानं विसरत चाललो आहोत आणि हे सगळं हौसेनं ज्या मुलांसाठी करायचं ती काय म्हणतायत? ती काय सांगतायत?<br />
एक मुलगी म्हणत होती `मला घरातलं बाकी काही आवडत नाही; पण माझी छोटी बहीण आवडते.' एकजण सांगत होता `आजी नसली की मला घर आवडत नाही. आजी लाड करते.' एक म्हणाली, `मला आबा आवडतात.' एका मुलीने नाक उडवत सांगितलं, `माझं कपड्यांचं कपाट डॉल्स हाऊसच्या आकाराचं आहे ते मला मुळीच आवडत नाही.' एकीनं निषेध नोंदवला, `मला बाबांचं कपाट आवडत नाही ते कपडे कसेपण कोंबतात आणि वासपण येतो.' एकाने सांगितलं, `मला माझी खेळण्याची बास्केट आवडत नाही. कारण त्यात खूप मोडकी खेळणी तशीच ठेवलीत.' हे एकेक वाक्य आपल्या अभ्यासासाठी आहे असं मला वाटलं.<br />
शाळेत कुटुंबाचं `फॅमिलीचं' चित्र काढायला सांगितलं होतं तर एका मुलीनं आई-बाबा-मुलं, आजी, आजोबा, घरातली कामाची बाई, मांजर, कुत्रं, ड्रायव्हर काका असं चित्र काढलं, तर बाइंर्नी त्यावर काट मारली. सांगितलं, `आई-बाबा आणि तू एवढंच चित्र काढून आण.' हे ऐकून मी धन्य झाले! मुलांचं जगच वेगळं असतं. त्यांना घरातली माणसं एवढंच नाही तर नातेवाईक, शेजारी, प्राणी एवढंच काय घरातली पाल (शिल्लक ठेवली असेल तर) हीसुद्धा आप्तमंडळी वाटतात. घराचं चित्र काढायला सांगितल्यावर एकदा एका मुलाने नुसतंच फुलपाखरू काढलं त्याच्याबद्दल बोलताना तो अगदी नाचून सांगत होता, `आमच्या घरात हे येतं आणि असं खुर्चीवर बसतं, मग भिंतीवर बसतं, मग उडून जातं.' एका मुलाने घराचं चित्र म्हणून मोठं शेत काढलं होतं. त्यात हिरवं पिवळं गवत आणि एका कोपऱ्यात त्याचं स्वत:चं छोटंसं चित्र. म्हणाला, `मला घर नाही आवडत शेतच आवडतं.'<br />
एका मुलीने घराचं चित्र म्हणून बाबा आणि तीन मुली आणि मुलीच्या दोन्ही वेण्या पुढे जमिनीपर्यंत आलेल्या अशा काढल्या. तिच्या आईचे केस लांब आहेत का मी पाहिलं तर नव्हते. तिचेही नव्हते. बहिणीचेही कापलेले. मग तिनं असं का चित्र काढलं तर तिची आई म्हणाली, तिला लांब केस आवडतात म्हणून ती नेहमी मुली अशाच काढते.<br />
मुलांचं हे वागणं केवळ चित्रांपुरतंच खरं नाही. त्यांना काय आवडतं ते शोधून काढून ते करण्याची त्यांची धडपड अखंड चालू असते. त्यामुळे घरात मला सगळयात गॅलरी आवडते. तिथेच मी भातुकली खेळते. मला गच्चीच आवडते तिथे मी खूप खेळतो. चांगली खेळणी शोकेसमध्ये ठेवतात म्हणून मग मी मोडक्या खेळण्यांशीच खेळतो असं मुलं सांगत असतात. मुलांसाठी आणलेली पुस्तकंसुद्धा कपाटात बंद ठेवणारे नीटस आईवडील असतात.<br />
अर्थात ही उदाहरणं मुद्दाम लिहायचं कारण सुधारणा इथे हवी आहे. नाहीतर समंजस आई-बाबांचं प्रमाणही हळूहळू वाढताना दिसतं आहे, ही आनंदाची गोष्ट सांगायला हवीच.<br />
आपापली कामं करताना मुलं वाढवणं, त्यांना पुरेसा वेळ देणं ही नवी कौशल्यं आई-बाबा दोघांनीही आत्मसात करायला हवीत. मुलाची वाढ म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक वाढ हे सगळं कायम लक्षात असावं लागतं. कृतीत उतरावं लागतं. तसं भान असलेले आई-वडीलही मला दिसायला लागलेत. फक्त भीती अशी वाटते की भरपूर पैसे मिळवणं हा मार्ग एकदा मान्य केला की त्या वाटेवर अनेक गोष्टी हरवतच जाणार की काय! वेळ हरवणार, नाती हरवणार, स्वास्थ्य हरवणार, आणखी कितीतरी !<br />
पण आपण असा नकारार्थी विचार करून चालणार नाही. काय हरवता कामा नये हे कायम लक्षात ठेवायला हवं. त्यात प्रेम हरवता कामा नये. घरातली शांती हरवून चालणार नाही. निरपेक्षपणे इतरांसाठी काम करण्याची आपली संस्कृती विसरून चालणार नाही. सातत्यानं चांगल्या गोष्टी करत राहण्याच्या सवयी घरात रुजायला हव्यात. मुलांचा उत्साह आयुष्यभर शिल्लक राहील असा आनंदाचा आणि कामसूपणाचा पाया भक्कम करायला लागेल. कितीही लाटा आल्या आणि रेटे वाढले तरी आयुष्यात कोणती मूल्यं कधीच विसरायची नाहीत त्याची पक्की तयारी आई-वडिलांचीच असायला हवी, तर ती मुलांपर्यंत पोचेल. स्पर्धा स्पर्धा म्हणून नको ते ताण मुलांवर लादणं बंद व्हायला हवं. आयुष्य वैयक्तिक झेंडे लावण्यासाठी नसून सामाजिक गरजा, सामाजिक न्यायासाठी, डोळसपणे कामं करण्यासाठी आहे हे पटलं तर मुलं फार सुजाणपणे आपले मार्ग शोधतात. भारतात जन्मलेल्या माणसांना तरी आपल्या भोवतालच्या गरीब जगाचा विसर पडून चालणारच नाही आणि या पृथ्वीचं जे काही वाटोळं आजवर आपण केलं ते यापुढे करत राहणार नाही या विचारामागे वेगानं जात राहण्याला पर्यायच नाही. या सगळया गोष्टी घरानंच शिकवायच्या आहेत.<br />
जगाचा प्रगतीचा वेग वाढला असेल तर घर अनभिज्ञ असून कसं चालेल? ज्या घरात भावी काळातलं जग उमलत असतं, आकार घेत असतं ते मुलांचं घर किती सुजाण व्हायला हवं!<br />
<br />
- शोभा भागवत,Anonymoushttp://www.blogger.com/profile/07785008605705105955noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-3223166446058544329.post-1261524106791152652010-08-24T15:37:00.000+05:302010-08-24T15:37:39.066+05:30आनंदाचे रोपटे !परिपूर्ण शिक्षण म्हणजे जीवनाचा अनुभव, जगण्यातील मजा, विविध वस्तू, प्रक्रिया यांचं अवलोकन आणि निरीक्षण. कोवळ्या मुलांवर नाही ती ओझी लादून आपण काय मिळवतो? त्यांच्या सर्जनशीलतेला किती वाव देतो? आम्ही यातून बाहेर पडलो आहोत आणि भोवताली पसरलाय आनंद आणि आनंदच...<br />
<br />
दहा ऑगस्ट २००९, आमच्या आयुष्यातील एक क्रांतिकारी दिवस ठरला. आमची दोन्ही मुलं एका प्रथितयश कॉन्व्हेंट शाळेत शिकत होती. मुलगी होती पहिलीला आणि मुलगा sr. K.G.मध्ये english Medium (कॉन्व्हेंट)ला. अट्टहासामुळे त्यांची होणारी मानसिक घुसमट आम्ही रोज अनुभवत होतो. शाळेमध्ये होणारा इंग्रजी संभाषणाचा अट्टहास, रनिंग लिपी समजावून घेण्यासाठी होणारी मुलांची घुसमट, दप्तरांचं ओझं आणि या समस्या "रॅट रेस'मध्ये आपापली लेकरं पुढं दामटण्यासाठी मुलांवर शाळेच्या वेळांव्यतिरिक्त खासगी ट्यूशनचा अत्याचार, हे सगळं सगळं मुळापासून उखडून टाकावंसं वाटत होतं. पण, त्यासाठी आपल्या संस्कारांची, मातृभाषेची किंमत मोजायची तयारी नव्हती. जीवनाचा वेग समजत होता; परंतु त्यासाठी कोवळ्या मनांचा, अल्लड बालपणाचा बळी द्यायचा नव्हता आणि या सगळ्या मानसिक आंदोलनात एक आशेचा किरण दिसला, जिथं इंग्रजी शिक्षण होतं, संभाषण होतं, परंतु त्याचा अट्टहास नव्हता. मायेच्या ऊबेत त्यांच्या कोवळ्या मनाचा विचार करून लडिवाळ मातृभाषेतून इंग्रजी समजावून सांगण्याचा प्रयत्न होताना दिसत होता. जिथं कवितेचं गाणं होत होतं आणि धड्याचं जीवन अनुभवाशी नातं जोडलं जात होतं.<br />
<br />
मनाचा धीर एकवटला. इंग्रजी शाळेच्या विळख्यातून आधुनिकतेच्या नावाखाली मुलांच्या मन मारण्याच्या प्रक्रियेला फाटा दिला आणि दोन्ही मुलांची ऑगस्ट २००९ च्या मध्यात कॉन्व्हेंट शाळेतून नावं काढली आणि महाराष्ट्र विद्या मंडळाच्या नवीन पद्धतीने सुरू झालेल्या सेमी इंग्रजी शाळेत त्यांचा प्रवेश घेतला. आज सुमारे एक वर्षाने आम्ही जेव्हा मनाला प्रश्न विचारला, की या एक वर्षात आम्ही काय मिळवलं, तर त्याचं उत्तर आनंद, आनंद आणि आनंदच!<br />
<br />
कशाकशाचा म्हणून सांगावा आनंद! सर्वप्रथम मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद. रोज शाळेतून घरी आलं, की आपण फक्त काय काय झालं विचारायचा अवकाश, त्यांच्या उत्तरांची मालिकाच. आज मटकी शिजत घातली, मेथीची भाजी निवडली, वर्तमानपत्राच्या ऑफिसात गेलो, कवितेवरचं गाणं सादर केलं, शेतीवरच्या कार्यक्रमामध्ये मी शेतकरी झालो आणि एवढंच नाही तर पाढ्यांची गाणी, संगीत सुरवटींची प्राथमिक ओळख, इंग्रजीमधून आपापला परिचय. रोजच्या रोज व्यायामाचे धडे. रोज परिपूर्ण आहार, प्रत्यक्ष झाड लावण्याचा अनुभव या आणि अशा अनेक गोष्टी.<br />
<br />
चांगलं शिक्षण म्हणजे नेमकं काय? चांगलं इंग्रजी संभाषण म्हणजे पूर्ण शिक्षण नाही. तो एक अत्यावश्यक भाग आहे. परंतु, परिपूर्ण शिक्षण म्हणजे जीवनाचा अनुभव, जगण्यातली मजा, विविध वस्तू, प्रक्रिया यांचं अवलोकन आणि निरीक्षण. विविध कलांचा रसास्वाद, चांगलं काय, वाईट काय ते समजून चांगल्याचं अनुकरण, प्रयोगशीलता, नावीन्याची आवड, निसर्गासंबंधी कुतूहल, कलांचा रसास्वाद.<br />
<br />
हे सगळं आम्ही आमच्या मुलांद्वारे अनुभवत आहोत. प्रत्येक महिन्याच्या शेवटी मुलांनी केलेल्या विविध प्रात्यक्षिकांचं एक प्रदर्शन शाळा भरवते. ते पाहून असं वाटतं खरंच आपल्या मुलांनी हे केलं, एक पालक म्हणून आणखी काय हवं?<br />
<br />
या सर्व प्रवासात आणखी एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे पालक म्हणून आपली नेमकी जबाबदारी काय? चांगल्या संस्थेची, शाळेची निवड, हवी ती पुस्तके, वह्या, गणवेश घेऊन देणे, शाळेत दिलेले होमवर्क मारून-मुटकून, घोकंपट्टी करून प्रसंगी स्वतःचं करून, ट्यूशनचा भडिमार करून पालक म्हणून आपली जबाबदारी संपते? नक्कीच नाही. मुलांना अशी "प्रॉडक्ट ओरिएंटेड ट्रीटमेंट' देऊन ती सुजाण नागरिक बनू शकतील? एखादी वस्तू तयार होताना जशी उत्पादनाची साखळी असते, त्याप्रमाणे पहिली ते दहावी मुलांना एस.एस.सी. बोर्डाच्या फॅक्टरीत चढवले, की बहुतांश त्यातून कृतीपेक्षा पुस्तकी ज्ञानाला कवटाळणाऱ्या पिढ्या तयार होत जातात. हे सर्वांना माहीत असतं, कळत असतं आणि म्हणूनच "थ्री इडियट'सारखा परंपरेला छेद देणारा, नवीन विचार मांडणारा चित्रपट मनाला भावून जातो. पण, हा विचार प्रत्यक्षात आणायचा असेल तर प्रत्येक पालकाला कृतिशील व्हावं लागेल. पुस्तकी ज्ञानाला अनुभवाची जोड द्यावी लागेल. प्रत्येक पाठ वाचून त्याचे कृतीत कसे रूपांतर करता येईल हे पाहायला लागेल. प्रयोगशीलता प्रत्येकाने अंगी बाणावयास पाहिजे. उदा. झाडांबाबतचा पाठ प्रत्यक्ष झाड लावून, जोपासून, झाड, जमीन, पाणी, पक्षी, मानव, सूर्यप्रकाश, हवा अशा अनेक अंगांची ओळख, त्याचा जीवनानुभव मुलांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करायला हवा.<br />
<br />
शाळांमध्ये असलेली मुलांची संख्या, अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याची धावपळ, स्नेहसंमेलने, स्पोर्टस डे, शिक्षकांवर लादलेली इतर कामे यांमुळे सर्वच गोष्टी आपण शाळेकडून अपेक्षित करू शकत नाही. म्हणून आपण पालकांनीच आता खऱ्या अर्थाने शिक्षक बनायला हवं. आपल्या पाल्यासाठी वेळ काढायला हवा. हे सोपं नाही, परंतु अशक्य मात्र नक्कीच नाही.<br />
आजकाल रविवारी काय करायचं, मुलांच्या सुट्यांमध्ये काय करायचं, अशा प्रश्नांचं उत्तर असतं - शाळा संपली की आता त्यांना शिबिरांमध्ये टाकू. जिथं संस्कार, शिक्षण, छंद "गॅरेंटेड' विकलं जातं. अशा विकाऊ शिबिरांत मुलं स्मार्ट बनत असतील; जिज्ञासू बनत असतील? कला, कौशल्याची तोंडओळख होत असेल; परंतु कलेचा रसास्वाद घेण्याइतका त्यांच्याकडे वेळ तरी कुठे असतो? आणि एका वेळेला पन्नास मुलांच्या क्रियाशीलतेला वाव मिळत असेल? ही शिबिरांवर टीका नाही; वस्तुस्थिती आहे. पालकांना जागं करायचा प्रयत्न आहे.<br />
आपल्या मुलांच्या आवडीनिवडी, त्यांचे कलागुण, आकलन शक्ती, निरीक्षण शक्ती आपल्यालाच माहीत असतात. त्यांना योग्य तो वाव, न्याय आपणच दिला पाहिजे. सेन्सेक्स कितीने वाढेल, हे सांगता येत नाही. बॅंकेचे व्याजदर कमी का जास्त होतील, हे सांगता येत नाही; परंतु आपल्याकडे असलेलं आनंदाचं रोपटं घडवूयात. त्यांना खत, पाणी घालूयात आणि त्यांची वाढ होतानाची पर्वणी पुरेपूर लुटूयात.<br />
<br />
यामध्ये कुठेही शिक्षणाला कमी लेखण्याचा प्रयत्न नाहीये; परंतु शालेय शिक्षणाला कृतिशील अनुभवांची जोड अत्यंत जरुरी आहे. विविध खेळ, छंद, साहित्य, कथा, कविता, नाटक यातून माणसाला माणूस म्हणून समजावून घेण्याची, अंतर्मनाला साद घालण्याची संधी मिळत असते. जीवनाचा रसपूर्ण आनंद पालकांनी पाल्याबरोबर उपभोगला पाहिजे. परंतु, हे तू केलंच पाहिजे, याची बळजबरी नको; तुलना तर मुळीच नको. आपला अहंकार जोपासण्यासाठी त्यांना वेठीस धरायला नको. हे बदलायला हवं. प्रत्येक मूल हे निसर्गाचा एक चमत्कार आहे, एक प्रतिभाशाली धगधगतं रसायन. भगवंताने ते आपल्या हाती सोपवलं आहे. त्याला योग्य तो न्याय आपण दिलाच पाहिजे. नाही तर यातून पुढं उभ्या राहणाऱ्या गंभीर समस्या आपण रोज वाचतोय. कोवळ्या मुलांच्या आत्महत्या, तरुणांचे अश्लील चाळे, मोबाईल इंटरनेट यांच्या विळख्यात सापडलेली आजची तरुण पिढी, चोऱ्यामाऱ्या, खून, दरोडे हे सर्व करणारी मंडळी केव्हा तरी लहान मुलंच असतील ना? ही सर्व कृत्ये करायला हे धजावले कसे? यांचं बालपण नेमकं कसं गेलं? आई-वडिलांकडून यांना योग्य तो वेळ, मायेची ऊब, वेळप्रसंगी शिक्षा, जाब विचारणं झालं असेल का? एक जबाबदार पालक म्हणून मी या सर्व गोष्टींचा विचार करतो का? मी माझ्या पाल्यासाठी काय देऊ शकतो? सुजाण समाज बनण्यासाठी माझ्या पाल्याला सुजाण करणं, त्याच्या चैतन्याला चांगला आकार देणं आणि हेच आपलं प्रथम कर्तव्य आहे, असं मला वाटतं. <br />
<br />
बाळकृष्ण दामले, पुणेAnonymoushttp://www.blogger.com/profile/07785008605705105955noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3223166446058544329.post-42449944640357392512010-08-20T16:18:00.001+05:302010-08-20T16:20:50.997+05:30मेंदू क्रांतीअनादी काळापासून मानवाच्या मेंदूत अनेक बदल होत गेले. शास्त्रज्ञांच्या म्हण्यानुसार मेंदूची क्षमता अफाट असून त्याचा वापर मात्र माणूस शंभर टक्के करुन घेत नाही असे लक्षात आले आहे. बालकाच्या मेंदूची वाढ ही पहिल्या तीन वर्षात सर्वात अधिक होते. त्यानंतर वाढीचा वेग कमी होत दहाव्या वर्षापर्यंत स्थिरावतो. <br />
सर्वसाधारण समज आहे की बाळाचे भाषिक ज्ञान शाळेत गेल्यावर सुरु होते परंतु हे खरे नाही. जन्मापासून त्याचे पालक आणि नातेवाईक जेव्हा बाळाशी बोलतात, संवाद साधतात, खेळतात, चित्र काढायला शिकवतात, तेव्हापासूनच 'ब्रेन स्टीम्यूलेशन' चालू होते. लहान बालकाची माहिती साठविण्याची क्षमता नॅशनल आर्काइव्जपेक्षा दसपट असते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मेंदू अभ्यासक डॉ. ग्लेन डोमन http://www.internationalparentingassociation.org/Early_Learning/accelerate.html ह्या साईटवर म्हणतात लहान बालकांची शिकण्याची क्षमता अति प्रचंड प्रमाणात असते. वाढत्या वयानुसार ती कमी होत जाते. जसे की एक वर्षाच्या बालकाची शिकण्याची क्षमता सहा वर्षापेक्षा अधिक असते. डॉ. डोमन ह्यांनी नवजात शिशू ते दहा वर्षांच्या बाळांचा विशेष अभ्यास केला त्यासाठी ते जगभर फिरले. त्यात त्यांनी मानसिक अपंग आणि अर्धांगवायू झालेल्या बालकांना त्यांचा खास असा 'ब्रेन डेव्हलपमेंट' प्रोग्रॅम नुसार प्रशिक्षण दिले. आणि काय आश्चर्य त्यातली बहुतेक मुले वाचायला, बोलायला, खेळायलाही शिकली. आपल्या ह्या संशोधनाचा सर्वांना फायदा व्हावा म्हणून डॉ. डोमन ह्यांनी फिलाडेलफिया मध्ये १९५५ साली THE INSTITUTES FOR THE ACHIEVEMENT OF HUMAN POTENTIAL® (http://www.iahp.org/) ह्या संस्थेची स्थापना केली. आज त्यांचे कार्य जगभर पसरले आहे.<br />
प्रत्येक पालकांना वाटते आपल्या बाळाची हुशारी वाढवायची कशी ? त्यासाठी आधी मेंदूचे कार्य आणि वाढ समजावून घेऊ या. गर्भाशयात मेंदूची बांधणी चालू असतांना प्रत्येक मिनीटांना २,५०,००० नवीन 'न्यूरॉन्सची' निर्मिती होत असते. ही निर्मिती जन्माच्या वेळेपर्यंत बरीचशी पूर्ण होते. तरी सुध्दा जन्मानंतरही काहीप्रमाणात न्यूरॉन्सची बांधणी चालूच असते. वयाच्या दोन वर्षापर्यंत माणसाचा ८०% मेंदू विकसीत झालेला असतो.<br />
बालकाच्या जन्मानंतर तुम्ही त्याला नवीन किती गोष्टींचे ज्ञान देता, स्पर्श, गंध, रंग, ध्वनी, चव ह्या पंच अवयवांना वेगवेगळे अनुभव देता त्यावर त्याच्या उरलेल्या न्यूरॉन्सची बांधणी अधिक होते आणि पर्यायाने तुमचे मूल हुशार होते. ह्यामध्ये आहार आणि भावनिक प्रेमालाही खूप महत्त्व आहे. ज्या बाळांना सकस आणि परिपूर्ण आहार दिला जातो, शब्द आणि स्पर्शातून पालकांचे प्रेम मिळते त्या बालकांची न्यूरॉन्सची बांधणी अधिक वेगाने होते. ह्याचाच अर्थ हुशार माणसाच्या मेंदूच्या न्यूरॉन्सचे जाळे हे अधिक दाट असते. सर्वसाधारणपणे परिक्षेत चांगले मार्क मिळवणा-या मुलांना हुशार समजले जाते. परंतु हुशारीची व्याख्या फक्त मार्क मिळवण्यापूर्ती संकूचित नसावी. अमेरिकेचे मेंदू शास्त्रज्ञ डॉ.हॉवर्ड गार्डनर ह्यांनी हुशारी किंवा बुध्दांक हा नऊ प्रकारे मोजला जातो हे सर्वप्रथम मांडले. निसर्ग, संगीत, तर्क/गणित, मानवी अस्तित्व, भाषिक, खेळाडू/नर्तक, परस्पर सुसंवाद, कलाकृती, स्वत्त्वाची जाणिव ह्या विविध प्रकारे बुध्दांक मोजला जातो. आतातर यशस्वी माणसांसाठी बुध्दांका बरोबर भावनांकही तितकाच महत्त्वाचा आहे. बुध्दांक मोजण्याच्या विविधतेवरुन 'मलटीपल इन्टलिजन्स'ची (Multiple Intelligence) संकल्पना पुढे आली. सर्वसाधारणपणे गणित आणि भाषेत उत्तम असणारया मुलांना 'हुशार' म्हटले जाते. पण डॉ.गार्डनर ह्यांनी हा समज ठामपणे 'मलटीपल इन्टलिजन्सच्या' आधारावर मोडून काढला आहे. त्यांच्या मते गणित, भाषेत हुशार नसणारे एखादे मुल खेळात, संगीतात, चित्रकलेत अगदी निसर्गात रमणारे असेल. गरज आहे त्यातली ही विविध बुध्दीमत्ता ओळखण्याची आणि फुलवण्याची. मलटीपल इन्टलिजन्स समजून घेण्यासाठी …………….<br />
आपल्या मेंदूचे दोन विभाग आहेत, डावा मेंदू आणि उजवा मेंदू. शाळेत किंवा व्यवहार्य जगण्यात अधिक भर डाव्या मेंदूवर दिला जातो. डावा मेंदू हा भाषा, गणित, व्यवहार, संशोधन आणि अचूकपणासाठी जवाबदार असतो त्या उलट उजवा मेंदू सृजनशिलता, कल्पकता, भावना, नेटकेपणा आणि विविध कलांशी निगडीत असतो. दोन्ही भागांच्या मेंदूचे कार्य विरुध्द परंतु परस्परपूरक आहे. डावा मेंदू माहिती हळूहळू आणि सातत्याने (repetitive) घेतो तर उजवा मेंदू ही माहिती काही क्षणात घेतो व त्याला सातत्याची आवश्यकता नसते. जेव्हा गरज पडेल तेव्हा उजव्या मेंदूला ही माहिती काही सेकंदात आठवते ह्याला 'फोटोग्राफीक मेमरी' म्हणतात. जपानचे डॉ. सिशीदिया मॅकातो ह्यांचा त्यावर गाढा अभ्यास होता व त्यांनी जपानमध्ये प्रिस्कूलर्ससाठी अश्या ३५० संस्था काढल्या आहे. ह्याच अर्थ सहा वर्षाच्या आधी आपण उजव्या मेंदूची वाढ होण्यासाठी प्रयत्न करु शकतो म्हणजेच मलटीपल इन्टलिजन्स आपल्या मुलामध्ये जागवू शकतो. संशोधनात असे सिध्द झाले आहे की अपूरा आणि निकृष्ट आहार, विशिष्ट इन्फेक्शन किंवा औषधे, प्रदुषित वातावरण आणि जास्तीचा स्ट्रेस हा मेंदूच्या वाढीत अडथळे निर्माण करतो. मेंदूच्या वाढीसाठी चारवेळा सकस आणि पौष्टीक आहार, योग्य प्रमाणात पाणी आणि कमीतकमी ताणतणाव हे सर्व आवश्यक आहे. मेंदूचे कार्य समजावून घेतल्यावर आपल्या पाल्यांसाठी आपण जरुर उपयोग कराल ही आशा. <br />
<br />
भाग्यश्री केंगे<br />
marathiworld.comAnonymoushttp://www.blogger.com/profile/07785008605705105955noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3223166446058544329.post-32280030732023539472010-08-20T15:47:00.000+05:302010-08-20T15:47:11.757+05:30पालकत्व पेलतांनाएकवेळ आईबाबा होणं सोप पण मुलांचे पालक होणं अधिक अवघड आणि आव्हानात्मक आहे. उत्तम पालक होण्याचे कुठलेही विशिष्ट नियम अथवा पध्दती नाहीत त्यामुळे प्रत्येक पालक आणि त्यांचे मुलं हे एक स्वतंत्र आणि वैशिष्टयपूर्ण व्यक्तीमत्व आहे. बाळ राजाच्या आगमनापासूनच त्याचे आईबाबा उत्तम पालक होण्यासाठी प्रयत्न सुरु करतात. मोठयांचे सल्ले, समवयस्क पालकांचे अनुभव, पुस्तके आणि आता इंटरनेटच्या माध्यमातून होतकरु पालक अधिकाअधिक प्रगल्भ होत जातात. एव्हढी सगळी पूर्व तयारी करुनही प्रत्यक्ष आपल्या मुलाचा स्वभाव, वागणे, प्रतिक्रीया पाहूनच पालक आपआपली भूमिका निभावत असतात. हे करत असतांना त्यांच्या अनेक चुका होतात, तोल सुटतो, राग येतो, हताश होतात, निराश होतात पण आपल्या बछडयाच्या प्रेमापोटी सारे विसरुन परत नव्याने पालकाच्या भूमिकेत शिरतात. पालकत्व अर्थात Parenting ही काही दिवसांची कामगिरी नसून दीर्घकाळाची प्रक्रीया आहे आपल्या मुलाला जन्म देऊन, त्याचे प्रेमाने संगोपन आणि शिक्षण देऊन एक चांगली व्यक्ती घडवण्याची. ह्या व्याख्येत मुख्यता आपले स्वतःचे मूल गृहीत आहे पण त्याबरोबर दत्तक किंवा अनाथ मुलांचेही पालकत्व स्विकारता येते. <br />
http://en.wikipedia.org/wiki/Parenting ह्या लिंकवर पालकत्वाचा अर्थ सांगितला आहे.<br />
<br />
ह्यात आपल्या मुलाची शारिरीक, मानसिक आणि भावनिक संरक्षण, संवर्धन आणि वाढ अपेक्षित आहे. तसेच त्याच्या शिक्षणासाठी, आकस्मित आपत्तींसाठी आणि भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणेही अपेक्षित आहे. येथे आपल्याला पालकत्वाचे वेगवेगळे टप्पेही वाचायला मिळतात. आपल्या मुलाच्या प्रत्येक वाढीच्या टप्प्यावर जसे बाल्य, शिशू, बालक, विद्यार्थी, पौगंडावस्था, तारुण्य; पालक आपली भूमिका बदलत असतात. आपल्या मुलाच्या वाढी बरोबरच पालक म्हणूनही ते वाढत असतात, अधिक समृध्द होत असतात.<br />
इंटरनेटवर पालकत्व विषयावर सर्च करतांना असे आढळून येते की बालसंगोपनाविषयीच अधिक मजकूर आपल्याला वाचायला मिळतो. वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांविषयी तुलनेने फरशी माहिती उपलब्ध नाही.<br />
परंतु http://www.indiaparenting.com/ ही साईट अतिशय माहितीपूर्ण आणि वाचनीय आहे. गर्भारपण, संगोपन, स्त्री आरोग्य ह्या विषयांना ही साईट स्पर्श करतेच परंतु कौटूंबिक बाबींवरही प्रकाश टाकते. Raising Children ह्या सदरात वेगवेगळ्या वयात मूल वाढवतांना येणारे संभाव्य अडथळे, अडचणी अनुसरुन वेगवेगळ्या उपविभागात त्यानुरुप माहितीपूर्ण लेख आहेत. एकटे मूल, दोन भावंडे, भाषा विकास, वागणूक, भिती, अस्वस्थता, सामाजिक जवाबदारी अश्या अनेक विषयांवर लेख वाचायला मिळतात. ह्या मध्ये अनेक विषयांवर भारतीय तसेच परदेशी पालकांचे, तज्ञांचे लेख आहेत. ह्या लेखांमध्ये 'प्रसन्न सकाळ' हा वेगळया विषयावरचा लेख आहे. आजच्या गतीमान जीवनानुसार प्रत्येकाची सकाळ धावपळीची असते. आईबाबा दोघेही नोकरी करणारे असल्यास बहुतेकदा त्याचा फटका मुलांना बसतो आणि नकळत त्याचा ताण मुलांवर येतो. आपल्या मुलाची प्रत्येक सकाळ प्रसन्न आणि उत्साहपूर्ण असली पाहिजे ही जबाबदारी पालकांनी ओळखली पाहिजे. त्यासाठी आदल्या दिवशी रात्री सर्व पूर्व तयारी करुन ठेवल्यास घाई गडबड टाळता येऊन संपूर्ण कुटूंबाची दिवसाची सुरुवात चांगली होईल.<br />
अश्याप्रकारे 'महिलांचा आदर' हाही लेख वेगळा आहे. आपल्या घरातला मुलगा आणि मुलगी वाढवतांना पालकांनी महिलांचा आदर राखण्याचे विशेष भान जागरुकपणे मुलांना दिले पाहिजे. मुलाला घरकामास प्रवृत्त करणे, महिलांविषयी विनोद अथवा अनादराने न बोलणे, मुलगा म्हणून विशेष वागणूक न देणे ह्या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत. आईने सतत बाबांवर अवलंबून राहण्यापेक्षा मुलाला स्वतःहून विविध गोष्टींची माहिती पुरवणे, बाबांनीही आईला सल्ला विचारणे अश्या सारख्या छोटया छोटया गोष्टी पाळल्यास मुलालाही आपल्या आईची क्षमता कळून तिच्या विषयी आदर वाढेल. ह्या सगळ्या गोष्टींमुळे अर्थातच मोठा होत असतांना महिलांविषयीही त्याचा आदर वाढेल आणि एक सभ्य व्यक्ती समाजाला मिळेल. अश्या प्रकारचे वाढत्या वयासंबंधी अनेक लेख आपल्याला ह्या साईटवर वाचायला मिळतात.<br />
आजच्या युगात Parenting Skills ला अधिक महत्त्व आहे. आपल्या जवळ असलेला कमी वेळ आपण Quality time म्हणून कसा उपयोगात आणतो ह्यावर पालकत्वाची कौशल्ये अवलंबून आहे. http://www.theparentszone.com/category/parenting-skills/ ह्या लिंकवर आपल्या मुलांमध्ये वेगवेगळी कौशल्ये जसेकी घरकाम, पैशाचे व्यवस्थापन, संभाषण, अभ्यास अशी अनेक कौशल्ये वाढविण्यासाठीची माहिती दिली आहे. आपले मुल वाढत असतांना आपल्याला अनेक प्रश्न पडतात, "माझी मुलगी शाळेत शांत असते पण घरी मात्र भरपूर हट्टीपणा करते असे का? ", ''माझा पाच वर्षाचा मुलगा अंधाराला खूप घाबरतो" , ''लहानपणी हुशार असणारा माझा मुलगा मोठया इयत्तेत गेल्यावर कमी मार्क मिळवायला लागला आहे", " माझ्या वयात आलेल्या मुलीला मी ह्या वयात बाळगायची सावधगिरी कशी सांगू" हे आणि असे असंख्य प्रश्न प्रत्येक पालकांना कधीतरी पडतातच. अश्या वेळी कुणा तज्ञांचा सल्ला मिळाल्यास दिलासा वाटतो. त्यासाठी http://www.raisingkids.co.uk/ ह्या साईटवर वयोगटा प्रमाणे आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. आपले वेगळे प्रश्न असल्यास तेही आपण विचारु शकता. पालकत्वा विषयी अधिक वाचायचे असल्यास www.sitagita.com/view.asp?id=8994 , www.goodparenting.co.in<br />
ह्या साईटही उपयुक्त आणि माहितीपूर्ण आहेत.<br />
http://www.lifepositive.com/mind/parenting/spiritual-parenting.asp ह्या लिंकवर spiritual Parenting अर्थात अध्यात्मिक पालकत्वाची संकल्पना मांडली आहे. येथे पालकांचे विविध अनुभव वाचतांना आपल्याच घरात घडणारे प्रसंग आहेत असे वाटत राहते. सुजाण पालकत्वासाठी कुठलही शॉर्टकट नाही. काहीजण पालकत्व जाणीवपूर्वक शिकतात, काही आपल्या चुकातून आणि अनुभवातून शिकतात तर काही कधीच शिकत नाहीत. अध्यात्मिक पालकत्वानुसार आपण आपल्या मुलांचे फक्त 'पालक' असतो. देवाने दिलेली ही अमूल्य भेट आपण फक्त वाढवायची आणि फुलवायची. त्यांच्यात सृजनशिलता, आत्मविश्वास, आत्मनिर्भरता आणि आपल्या मनापेक्षा हृदयाचे ऐकण्याची, वेगळ्या वाटेवरुन जाण्यासाठीचे धैर्य त्यांना मिळावे ह्यासाठी पालकांनी अथक परिश्रम घ्यायला हवेत. त्यासाठी त्यांनी देवाबरोबर भागीदारी करायला हवी. पंधरावीस वर्षे ह्या पालकत्वाच्या वाटेवरुन जातांना वेळोवेळी पालकांना स्वयंशिस्त, निस्वार्थी, दयाळू, क्षमाशिल, सहनशिल, परिवर्तनशिल, तर असलेच पाहिजे त्याबरोबर कुठलीही अपेक्षा न ठेवता मुलांवर निस्वार्थ प्रेम करता आले पाहिजे. फक्त आपलेच घोडे पुढे न दामटता मुलांना बोलायची संधी देऊन त्यांचे ऐकून घेतल्या आपल्या पालकत्वाच्या कक्षा अधिक रुंदावतील ह्यात शंकाच नाही. ह्या अवघड वाटेवरुन चालतांना मुलांवर पैसा अधिक खर्च करण्यापेक्षा अधिक वेळ दिल्यास अनेक गोष्टी सोप्या होतील.<br />
<br />
भाग्यश्री केंगे<br />
marathiworld.comAnonymoushttp://www.blogger.com/profile/07785008605705105955noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3223166446058544329.post-60259095287147627072010-08-19T15:21:00.000+05:302010-08-19T15:21:53.748+05:30एक विचार टागोरांचा.. विद्यार्थी घडविताना !रवींद्रनाथ टागोर हे जसे ‘विश्वकवी’ होते तसेच ‘गुरुदेव’ही होते. रवींद्रनाथांचं व्यक्तिमत्त्व तसं बहुरंगीच होतं. जन्मत:च ते मनाने कवी होते. आणि म्हणून निसर्गाचं जणू त्यांना वेडच होतं. त्यांच्या या सौंदर्यवेडातूनच शब्दांची जुळवाजुळव सुरू झाली. हळूहळू त्या शब्दांमध्ये नाद भरू लागला, ताल येऊ लागला. लवकरच त्यातून कविता अवतरली. लहान वयातच ते भराभर कविता लिहू लागले. रवींद्रनाथ विश्वकवीच ठरले. परंतु रवींद्रनाथांचा हा विकास किंवा प्रवास तथाकथित शाळांमधून दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून घडला नाही. निसर्गाच्या उघडय़ा शाळेतूनच ते पुष्कळ शिकले आणि आपल्या या अनुभवातूनच रवींद्रनाथांची स्वत:ची अशी एक शिक्षणदृष्टी किंवा विचार निर्माण झाला.<br />
१९०१ साली रवींद्रनाथांनी ‘शांतिनिकेतन’ नावाची आपली शाळा सुरू केली. त्यांचं हे ‘शांतिनिकेतन’ होतं कलकत्त्यापासून लांब, मोकळ्याढाकळ्या माळावर शाल वृक्षांच्या सावलीत. ही शाळा काढताना ते म्हणाले होते, ‘माझी ही शाळा म्हणजेसुद्धा एक काव्यच आहे! त्याला कदाचित शब्दांचं माध्यम नसेल, ते निर्जीव, रूक्ष कागदावरही लिहिलेलं नसेल, परंतु ते एक जीवनाचं काव्य असल्याकारणानं जीवनाच्या माध्यमातून आणि संपूर्ण जीवनासाठी लिहिलेलं असेल!’ ज्याला आपण पालक किंवा शिक्षक मंडळी शिक्षण- शिक्षण म्हणतो, त्या शिक्षणाबद्दल रवींद्रनाथांना कधीच प्रेम, आपुलकी आस्था वाटली नाही. त्याची उपयुक्तताही पटली नाही. या असल्या औपचारिक शिक्षणामुळे माणूसही औपचारिक बनतो, कृत्रिम होतो व निखळ मनुष्यत्व गमावून बसतो. त्या काळच्या शाळा म्हणजे तर कोंडवाडेच होते. आजही असे कोंडवाडे अनेक ठिकाणी आहेतच. या कोंडवाडय़ातून वेळापत्रकाप्रमाणं चालणारा ठराविक अभ्यासक्रम रवींद्रनाथांना कधीच आवडला नाही. त्यांनीच म्हटलं आहे, ‘नाजुक फुलांवर ऊंचावरून होणाऱ्या जोरदार गारांच्या वर्षांवाप्रमाणं आमच्यावर पाठांचा मारा होत असे आणि वस्तुसंग्रहालयातील निर्जीव चित्रांप्रमाणे आम्हाला तो गुपचूप बसून सहन करावा लागत असे.’ ‘या शाळा निसर्ग आणि वास्तव जीवन यांपासून फार फार दूर असत. शिक्षण आणि जीवन यात भक्कम भिंतच उभी असे! वर्गातील साहित्य, अध्यापनपद्धती आणि एकूण सर्व वातावरणच मुलांच्या नैसर्गिक प्रवृत्तींच्या विरुद्ध असे. त्यामुळे मुलांच्या नैसर्गिक शक्तीवर आणि उत्साहावर पाणी पाडलं जात असे. ती शक्ती आणि तो उत्साह दडपून टाकला जात असे.’ रवींद्रनाथांनी अशा शाळा आणि त्यातील शिक्षण यांच्याविरुद्ध जणू बंडच पुकारले आणि ‘शांतिनिकेतन’ ही एक अभिनव मोकळीढाकळी शाळा काढली. मुलं म्हणजे उत्साह, आनंद यांचा कंद आणि चैतन्याचा सळसळता कोंभ असतात, हे रवींद्रनाथांनी स्वानुभवावरून जाणलेलं होतं. म्हणून मुलांची शाळा आणि तिथलं शिक्षणदेखील आनंदमय व चैतन्यदायी असायला हवं, असा त्यांचा आग्रह होता. त्यांची बालकांकडे बघण्याची दृष्टी किंवा बालमानसशास्त्र हे बालकाबद्दल त्यांना वाटणाऱ्या अथांग प्रेमावर आणि उदंड सहानुभूतीपूर्ण वात्सल्यावर आधारलेलं होतं. रवींद्रनाथ म्हणत असत, ‘बालक म्हणजे मानवी जीवनाच्या वेलीवर उमलणारी फुलंच! त्यांना जितका मोकळेपणा व स्वातंत्र्य मिळेल तितकी ती प्रफुल्लित आणि टवटवीत बनतील. या स्वातंत्र्यामुळंच बालांना आनंदाचा आणि सौंदर्याचा रसास्वाद घेता येतो. बालकांचं कोवळं मन त्यांच्या अवतीभवतीच्या वातावरणातून उत्तमोत्तम संस्कार टिपण्यासाठी सतत जागृत आणि उत्सुक असतं. बालांना प्रौढांनी, म्हणजे पालकांनी किंवा शिक्षकांनी ज्ञान भरवण्यापेक्षा ते त्यांचं त्यांनीच आपल्या विविध प्रकारच्या धडपडीतून मिळवणं, हे रवींद्रनाथांना फार फार उपयुक्त वाटत असे.’<br />
निसर्ग हाच एक मित्ररूप शिक्षक आहे. म्हणून निसर्गाच्या सान्निध्यात स्वत:च्या प्रयत्नानं मुलं रममाण होऊन जेवढं काही चांगलं शिकू शकतील आणि स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करू शकतील, तेवढं शिक्षण आणि विकास अन्य कुठल्याही मार्गाने होऊ शकत नाही. रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतन या शाळेविषयी पु. ल. देशपांडे यांनी आपल्या एका व्याख्यानात रवींद्रनाथांचा शिक्षणविषयक दृष्टिकोन फार चांगल्या रीतीनं विशद केलेला आहे. ते म्हणतात, ‘ज्ञान हा केवळ पुस्तकाकडून पुस्तकाडं चालणारा व्यवहार नसून ज्ञानाची आणि कर्माची सारी इंद्रियं ज्यामुळं चैतन्यमय होतील अशी शिक्षणपद्धती या देशात आल्याशिवया इथं प्रगती, प्रबोधन, संस्कृती, स्वातंत्र्य वगैरे कल्पनांचा खरा अर्थच लोकांना कळणार नाही. एखाद्या वृक्षाच्या आश्रयाला येणाऱ्या माणसाची त्या वृक्षाकडून फूल, फळ व छाया लाभावी अशी अपेक्षा असते. तसलीच इच्छा धरून विद्यार्थी शाळेकडं आला तरच शिक्षणाला काही अर्थ आहे, हे रवींद्रनाथांनी ओळखलं, निर्मितीक्षम प्रतिभा, चिंतन, व्यासंगानं सबल झालेली प्रज्ञा आणि अनेक प्रकारच्या माणसांच्या स्नेहातून, त्यांच्या सुख-दु:खाच्या कथा ऐकून मनात उपजलेलं प्रेम आणि करुणा या साऱ्या गुणांच्या समन्वयातून रवीन्द्रांची शाळा जन्माला आली.<br />
रवींद्रनाथांचा आग्रह मुलांना त्यांच्या मातृभाषेतूनच शिक्षण मिळालं पाहिजे, असा होता. स्वत:च्या भाषेतून मुलांना आपले विचार जेवढे नीटनेटके आणि स्पष्ट मांडता येतात, तेवढे परकीय भाषेतून येत नाहीत. परकीय भाषेमुळे त्यांच्या अभिव्यक्तीत अनंत अडचणी निर्माण होतात. याचा परिणाम त्यांच्या विकासावरही होतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावरही होतो. त्यांची अभिव्यक्ती कुंठित बनते. म्हणून परकीय भाषेचं आकर्षण टाळून मातृभाषेतूनच मुलांचं शिक्षण झालं पाहिजे. ‘शांतिनिकेतन’ म्हणजे रवींद्रनाथांची शिक्षणविषयक कल्पनांची प्रयोगभूमीच होती. या शाळेतील विद्यार्थ्यांना भरपूर स्वातंत्र्य व भरपूर आनंद कसा मिळेल, याचीच दक्षता घेतली जात असे.<br />
‘अमूक एक गोष्ट करा’, असं रवीन्द्रनाथ मुलांना कधीच सांगत नसत. ‘आपण काय करायचं’ हे मुलंच ठरवीत असत. याबाबत त्यांचा मुलांवर फार फार विश्वास होता आणि त्यांच्या या विश्वासाला मुलंही तेवढय़ाच विश्वासूपणानं प्रतिसाद देत असत. शिस्तीचे प्रश्न कधी कधी उपस्थित होत असत, पण ते सोडवण्यासाठी मुलांचंच न्यायमंडळ होतं. रवीन्द्रनाथांनी कधीच कोणाला शिक्षा केली नाही. एकदा काही विद्यार्थी वर्गातील नेहमीच्या तासाला हजर नव्हते. त्यांच्याविरुद्ध शिक्षकांनी तक्रार केली. त्या विद्यार्थ्यांना शालेय वातावरणात समरस करून घेण्यासाठी रवीन्द्रनाथांनी एका नाटकाच्या प्रयोगात त्यांना सहभागी करून घेतलं. शांतिनिकेतनमधील दिवसाची सुरुवात आणि शेवट संगीताच्या मधुर आलापात होत असे. बहुतेक सर्व गीतांची रचना रवीन्द्रनाथांनीच केलेली होती. त्यातून मुलांना आत्मिक व मानसिक आनंद भरभरून मिळत असे. शाळेतील सर्व वातवारणच नृत्य, नाटय़, चित्र, संगीत यांनी चैतन्यमय होत असे. शिक्षण ही एक आनंदयात्राच आहे, अशीच आनंदयात्री रवीन्द्रनाथांची श्रद्धा होती. एकूणच रवीन्द्रनाथांचे शिक्षणविषयक विचार हे मुलांना आयुष्यभरातून येणाऱ्या अनुभवातून घडविण्यास हातभार लावणारेच आहेत आणि ते आजच्या शिक्षण पद्धतीतही जसेच्या तसे लागू पडतात. त्यांच्या विचारांची कास धरली तर नक्कीच आजचा विद्यार्थी उद्याचा सुजाण, सर्जनशील नागरिक म्हणून चमकू शकतो अन् अशा विद्यार्थ्यांना घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. रवीन्द्रनाथांच्या मते, शिक्षक हा सहानुभूतीपूर्ण, प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांला घडविणारा असावा व स्वत: आयुष्यभर नवीन गोष्टी शिकण्याची कास धरणारा असावा आणि म्हणूनच ते म्हणत की, <br />
<br />
“A lamp can never light another lamp unless it cantinues to burn its own flame.”Anonymoushttp://www.blogger.com/profile/07785008605705105955noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3223166446058544329.post-12951030394986738602010-08-19T15:16:00.000+05:302010-08-19T15:16:26.030+05:30बालस्वातंत्र्यबालस्वातंत्र्याचा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीरपणे समजून घेऊन विचार करण्याचा आहे. राष्ट्राच्या विकासासाठी योग्य समाज निर्माण करण्याची जबाबदारी पालक व शिक्षकांवर आहे. वैचारिक देवाणघेवाण साधण्यासाठी अभ्यासगट, चर्चासत्रं, शिक्षणतज्ज्ञांचं या विषयावरील लिखणाचं वाचन आणि त्यावर चर्चा होणं आवश्यक आहे. <br />
शिक्षक, पालकच नव्हे तर एकूणच समाज निरागस, सहज उमलणाऱ्या बालकांवर स्पधेर्ची भीती आणि सक्तीचा बडगा दाखवून त्यांच्या नैसगिर्क प्रवृत्ती आणि क्षमता यांचं खच्चीकरण करत असतात. त्याला आवर घालण्याचा हा एक प्रयत्न आहे. <br />
<br />
बालकांना स्वातंत्र्य द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे कोणी समजून घेत नाही. त्याचं महत्त्व कोणी लक्षात घेत नाही. आजचा बालक हा भावी काळातील नागरिक बनणार असतो. त्याला स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घ्यायचे असतात. येणाऱ्या प्रसंगांना आत्मविश्वासाने तोंड द्यायचं असतं. सृजनशील नागरिक बनण्यासाठी त्याच्या अंगात असणाऱ्या सर्व क्षमतांचा विकास व्हायला हवा आणि हा विकास छडी लागे छमछम या पद्धतीने किंवा घोकंपट्टी करून आणि केवळ परीक्षाथीर् बनून घडणार नाही. तात्पुरता त्याचा परिणाम चांगला दिसला तरी तो चिरकाल टिकणारा नसतो आणि म्हणूनच तो निरुपयोगी ठरतो. <br />
<br />
माणसाचा भविष्यकाळ त्याच्या बाल्यातून आकारास येत असतो. त्याच्या हिताच्या दृष्टीने येणाऱ्या पिढीचं जतन करणं, तिची जोपासना करणं आणि नवजीवनाला तिला तयार करणं हे प्रत्येक प्रौढ पिढीचं आद्यकर्तव्य आहे. संपूर्ण प्राणीविश्वात माणसाचं मूल सर्वात जास्त काळ परावलंबी असतं. ही नैसगिर्क गोष्ट लक्षात घेऊन त्याचं संरक्षण करणं, त्याला फक्त आवश्यक ती मदत देऊन ते लवकरात लवकर नैसगिर्करित्या स्वावलंबी कसं बनेल, याचा विचार कुटुंबाने करायला हवा. बालकाला स्वावलंबी करण्याच्या प्रयत्नात त्याचं बालपण हरपणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. लहान मुलं ही मोठ्या माणसाची छोटी आवृत्ती असते म्हणजे शक्तीने, ज्ञानाने व अनुभवाने लहान असलेल्या बालकाला मोठ्यांप्रमाणे संपूर्ण शरीर, संपूर्ण मन, भावना, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती असणं याची दखल आपण घेतली पाहिजे. त्याला लाभलेल्या उपजत बुद्धिमत्तांचा शोध घेण्यासाठी त्याला अनुभवयुक्त शैक्षणिक संधी मिळवून देणं म्हणजे खऱ्या अर्थाने बालकाचं संगोपन करणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. <br />
<br />
प्रत्येक मुलाची क्षमता, त्याचे कल, त्याची गती भिन्न असल्याचं लक्षात घेऊन जात, धर्म, वर्ग, लिंग आदी त्यांना मिळणाऱ्या संधीच्या आड येता कामा नयेत, याचाही विचार व्हावा. बालकांमधील लहरीपणा, हट्टीपणा, एखाद्या गोष्टीचा बाऊ करणं अशी लक्षत काही मुलांमध्ये दिसतात. पण ते त्यांचं व्यक्तित्व नसतं,हे लक्षात घ्यायला हवं. त्याला अशा गोष्टींपासून दूर ठेवायला हवं. <br />
<br />
<br />
ताराबाई मोडकAnonymoushttp://www.blogger.com/profile/07785008605705105955noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3223166446058544329.post-31120255606385300902010-08-19T15:10:00.000+05:302010-08-19T15:10:58.377+05:30आमच्या भावी आई–बाबानोमुलांना जर आई वडील निवडण्याची संधी असती तर त्यांनी हे प्रश्न निशित विचारले असते <br />
आई बाबा ,तुम्हाला आम्ही हवे आहोत म्हणता तर ,<br />
<br />
१.लहान मुलाची काळजी कशी घ्यायची याचा तुम्ही काही अभ्यास केलाय का<br />
<br />
२.आम्हाला तुम्ही खायला- प्यायला केव्हा काय-काय देणार, हे माहित आहे का<br />
<br />
३.आमच्या रडण्याची कारणे तुम्हाला माहित आहेत का <br />
<br />
४.आमची वाढ कशी होते , ते तुम्ही कुठे वाचलंय का ? <br />
<br />
५.आमच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी काय करणार आहात तुम्ही ?<br />
<br />
६.आमची प्रेमाची भूक भागवणार आहात का तुम्ही ? <br />
<br />
७.आमच्या तुम्ही दोघेही काही वेळ राखून ठेवणार आहात का ? <br />
<br />
८.आम्हाला मोकळे पणी वाढू देणार आहात का ? कि तुमच्या अपेक्षांच्या कात्रीने<br />
सारख्या आमच्या प्रेरणा छाटणार आहात ?<br />
<br />
९.मुलाशी कसं वागायचं ,याबद्दल मुळात तुमच दोघांचे एकमत आहे का ?<br />
<br />
१०.आणि हो सर्वात महत्वाचं ... आई -बाबा आम्ही तुम्हाला कशासाठी हवे आहोत ? <br />
आपले भावी <br />
<br />
मुल हे प्रश्न विचारू शकत नाही हे किती बर आहे नाही ? --शोभा भागवत (आपली मुल)<br />
<br />
______________________________________<br />
आणि हो खरेच जर हे प्रश्न आपण एक पालक म्हणून आपल्या पुढे आले तर आपल्या हयातीत किती गोष्टीची सखोल माहित आहे , आणि जर नसेल तर माहित करून घ्यायाल वेळ आहे का ?Anonymoushttp://www.blogger.com/profile/07785008605705105955noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3223166446058544329.post-88849442501875126242010-08-18T12:21:00.000+05:302010-08-18T12:21:39.987+05:30मूल वाढवायचे म्हणजे काय ?मूल वाढवायचे म्हणजे काय? चांगला पालक व्हायचे म्हणजे काय? मुलाला स्पधेर्चा घोडा न बनवता फुलवायचे म्हणजे काय? त्याचे परिसराशी नाते जोडायचे म्हणजे काय? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी हवे आहे बालभवन. आज पालक सुजाण होण्यासाठी गरज आहे ती त्यांच्या प्रशिक्षणाची. मूल जसे गरिबीत बिघडू शकते तसे आणि तितकेच ते समृद्धीतही बिघडू शकते. आपण सर्वांनी उद्याची ही पिढी 'नॉर्मल' बनवायला हवी... <br />
............... <br />
<br />
एखादं मूल पुरेसं बोलत नाही, इतरांशी मैत्री करत नाही, कधी वय वाढलं तरी चालू शकत नाही, मनानं अस्वस्थ आहे, घरी आई-वडिलांचं न पटण्याचा गंभीर प्रश्न आहे, शाळेत मागे पडत आहे, अशा समस्या जाणवून बऱ्याचदा मुलांचे डॉक्टर्स मुलांना 'बालभवना'त पाठवा, असा सल्ला पालकांना देतात. अशा मुलांना आम्हीही बालभवनात लगेच सामावून घेतो आणि बऱ्याचदा त्यांचे प्रश्न काही काळातच सुटतात. बरोबरच्या २०-२५ मुलांच्यात रोज संध्याकाळी मैदानावर खेळणं, त्यांची भाषा कानावर पडणं, अनेक आनंददायक उपक्रमात सामील होणं, या सगळ्याने खूप मदत होते प्रश्न सुटायला. <br />
<br />
जेव्हा असं जाणवतं की प्रश्न मुलांचा नाही, त्यांच्या पालकांचाच आहे, तेव्हा त्यांनी समुपदेशकाकडे जायलाच हवं, असा आग्रह आम्ही धरतो. <br />
<br />
चार वर्षांची मुलगी हाका मारल्या तरी जेवायला येत नाही, म्हणून रागानं तिच्या गालाला गरम उलथनं लावणारी आई होती, घरातल्या आई-वडलांच्या भांडणात मिटून गेलेली आणि चित्र रंगवताना कायम काळाच रंग वापरणारी मुलगी होती. घरीदारी 'हा वाईट मुलगा आहे' असा शिक्का बसलेला आणि त्यामुळे वस्तूंची तोडफोड करणारा, शिव्या देऊन थुंकणारा मुलगा होता, सहलीला यायला उशीर झाला, बस निघून गेली म्हणून राग असह्य होऊन रस्त्यातच मुलाला लाथाबुक्क्यांनी मारणारी आई होती. <br />
<br />
कधी मुलांच्या चित्रांमधून, कधी त्यांच्या वेगळ्या वागण्यामधून तर कधी पालकांच्या वागण्या-बोलण्यातून प्रश्न जाणवतात. त्यांच्यावर जेवढ्या लवकर उपाय होतील, तेवढे ते मुलाच्या हिताचं असतं. कारण मूल फार भरभर वाढत असतं. कुठलेतरी प्रश्न , अस्वस्थता, विकृती घेऊन ते वाढलं तर त्याच्या सबंध आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच मुलाचं दुसरं नाव 'आज' आहे, असे म्हणतात. त्याच्या गरजांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. म्हणूनच मुलाशी ज्यांचा ज्यांचा संबंध येतो, त्या सर्व प्रौढांना या प्रश्ानंची समज असायला हवी. आमच्याकडे मुलांचे काहीच प्रश्न नाहीत, असे शाळांनी म्हणू नये तर हे प्रश्न समजण्याची दृष्टी सर्व शिक्षकांना द्यायला हवी. त्या मुलाची, त्याच्या चमत्कारिक वागण्याची, त्याच्या पालकांची चेष्टा न करता त्यांना खूप मनापासून शक्य ती सगळी मदत करायला हवी. <br />
<br />
कित्येकदा असं आढळतं की पालकांशी मोकळेपणाने बोलल्यानेही त्यांना खूप मदत होते. आपण पालक म्हणून कसे आहोत, कसं असायला हवं, याबद्दल बोलायला लागतं, आपलं मूल कसं आहे, ते त्यांना समजून सांगावं लागतं, आपलं घर आज मुलांना काय देत आहे, याबाबत पालकांची जागरूकता संवादातून वाढवावी लागते. मुलांशी चांगला संवाद कसा करावा, याची पथ्ये शिकवावी लागतात. मुलांकडे दुर्लक्ष न करणं, त्यांना धमक्या न देणं, त्यांची इतरांशी तुलना न करणे, त्यांचे निर्णय परस्पर न घेणं, त्यांच्यावर शिक्के न मारणं, त्यांना न रागावणं, मारणं टाळणं अशी कितीतरी पालकत्वाची कौशल्ये अंगवळणीच पाडावी लागतात. पालकांनी स्वत:चं आणि मुलांचं जग मोठं करण्याची गरज असते. याची जाण आली तर प्रश्न सुटायला मदत होते. आपण कुठे चुकतो हे पालकांच्या लक्षात येतं. मुलं लहान असताना पालकांना हे पालकत्वाचं शिक्षण देणं ही जाणत्या माणसांची मोठी जबाबदारीच आहे. त्यातून खूप मुलांचा समस्यांपासून बचाव होईल. पालक शिक्षणाचं हे काम नुसती विविध विषयांवर भाषणं देऊन होत नाही हे शाळांनी लक्षात घ्यायला हवं. हे कौशल्याचं शिक्षण आहे. त्यामुळे त्यासाठी बालवाडीच्या वयापासून पालकांसाठी अभ्यासक्रम आखायला हवेत. तरच मुलांना त्याचा उपयोग होईल. <br />
<br />
आजचे तरुण पालक असे आहेत की त्यांचा स्वत:चा जन्म स्वतंत्र कुटुंबात झाला आहे. स्वत:ला मूल होईपर्यंत त्यांनी लहान मूल हाताळलेलं नाही सांभाळलेलं नाही. घरात मोठी माणसं नाहीत. त्यामुळे मूल ही त्यांना न पेलणारी जबाबदारी वाटते. त्यातच नवरा-बायकोचं पटत नसेल तर अधिकच ताणातून कुटूंब जात असतं. आज कित्येक घरं अशी आहेत, की त्यातले बाबा कामानिमित्त दूरगावी किंवा परदेशात असतात. कधी आईपण अशी लांब गेलेली असते. याचा घरातल्या माणसांवर मुलांवर अतिरिक्त ताण असतो. सतत अस्वस्थ असलेल्या मोठ्या माणसांच्या सहवासात मुलांनी मग लवकर मोठं होण्याची अपेक्षा असते. बालपण जसं गरिबीत हिरावलं जातं. तसं ते आथिर्क संपन्नतेतही हिरावलं जातं. तो निवांतपणा, ती मोकळीक, चुकलं तर चुकलं जाऊ दे असं प्रेमानं म्हणणारी मोठी माणसं या सगळ्या बालपणाच्या गरजाच आहेत. चार खेळणी कमी मिळाली तर काही बिघडत नाही. मुलं कशातूनही खेळ शोधून काढू शकतात. पण पालकांच्या मनाचं स्वास्थ्य फार फार महत्त्वाचं आहे. <br />
<br />
घरं लहान, खेळायला मुलं नाहीत, मित्र नाहीत, सर्व दारं बंद अशा सोसायट्यांमध्ये असंख्य मुलं आज गुदमरत आहेत. आई-वडील त्यांच्या नोकरी-व्यवसायात बांधले गेलेले. मग कुणावरतरी मुलं सोपवायची! पाळणाघर ते शाळा. पाळणाघर ते ग्राऊंड. पाळणाघर ते क्लास अशी मुलं दिवसभर फिरवली जातात. एक मूल 'मला बालभवनात नाही जायचं' म्हणून कळवळून रडायचं. त्याची आई मला हा माझाच दोष असा ठपका मनात बाळगून भांडायला आली. त्याचा दिनक्रम पाहिला तर ते मूल सकाळी सहा वाजल्यापासून घराबाहेर असायचं. त्याला आई-वडील भेटायचेच नाहीत. पाळणाघर-शाळा-क्लास हे चक्र संपलं की त्याला घरी जावंसं वाटलं तर त्याची काय चूक? त्याला 'खरंच सध्या बालभवनात पाठवू नका' अशी मी त्या आईला विनंती केली. त्याला आई हवी होती. ती मिळाल्यावर त्याचा प्रश्न आपोआप सुटला. <br />
<br />
पालकांच्या बेबंद अपेक्षांपासूनही मुलांचा बचाव करायला हवा आहे. मला माझ्या मुलाला क्रिकेटिअरच करायचा आहे. माझी मुलगी नृत्यांगना व्हायलाच हवी, मुलाला स्केटिंगला घातलं की, त्यानं सुवर्णपदकच मिळवायला हवीत. चौथ्या वर्षापासूनच खरोखर अशा व इतक्या 'स्पेशलायझेशनची' गरज आहे का? महत्त्वाकांक्षी पालकांना वाटतं 'बालभवन'मध्ये २० मुलांच्यात 'जनरल' शिकून काय होणार? पण मग आपली मुलं मातीत, वाळूत, पाण्यात कधी खेळणार? ती इतरांशी मैत्री कधी करणार? स्वत:च्या हातांनी नवनव्या गोष्टी करायचा आनंद ती कधी मिळवणार? ती शेती कधी करणार? आज शहरी आयुष्यात मुलांना एका बंदिस्त कोशात आपण वाढवतो आहोत. स्पधेर्त धावणारी घोडी आपण तयार करतो आहोत. इतरांकडे त्यांनी लक्ष द्यायचं नाही, इतरांसाठी काही करायचं नाही, घरातली साधी साधी कामं त्यांनी करायची नाहीत. काय होईल मोठेपणी अशा मुलांचं? त्यांच्या भविष्यात मानसिक अस्वास्थ्य तर लिहून नाही ना ठेवलं जात? <br />
गरीब वस्त्यांमधली मुलं 'बालभवन'मध्ये खेळताना आम्ही पाहतो. तेव्हा १४-१५ व्या वर्षी एखाद्या मुलीचं लग्न झालं की खूप वाईट वाटतं. तिच्या आईची असहायता दिसत असते. वर्षभरात या खेळणाऱ्या-बागडणाऱ्या मुलीला मूल होतं. नंतर येऊन जेव्हा ती सांगते की बालभवनातला काळ तिच्या आयुष्यातला सर्वांत चांगला काळ होता. छान खेळता आलं. वाचता आलं. अजूनही ती कधी सुटीच्या दिवशी येऊन बालभवनात खेळू शकते. आई म्हणून ती मुलाचा वेगळा विचार करते. मुलांच्या गाण्यांकडे, गोष्टींकडे, खेळाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहते. तेव्हा लक्षात येतं की बालपणातला आनंद सुजाण पालकत्वालाही जन्म देत असतो. <br />
<br />
घरात आणि शाळेत बसून बसून आणि बसूनच राहून मुलांना धावता येत नाही, उड्या मारता येत नाहीत, कोलांटीउडी मारता येत नाही. त्यांच्या शरीराचा लवचिकपणा तिसऱ्या वर्षापासूनच कमी होतो आहे. त्यांच्या आहाराचा विचार करायला पालकांना वेळ नाही. सहलीला खाऊ म्हणून मुलं तयार वेफर्सची मोठाली पाकिटं आणतायत. टीव्ही व कॉम्प्युटर हेच त्यांचे मित्र. त्यांच्याशी गप्पा मारायला कुणाला वेळ नाही. अशा वातावरणात मुलं विकृत झाली नाहीत तरच नवल! <br />
<br />
शोभा भागवतAnonymoushttp://www.blogger.com/profile/07785008605705105955noreply@blogger.com0